शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

ऐन हंगामात तुरीचे दर घसरल्याने शेतकरी हादरले

By admin | Updated: February 23, 2015 00:09 IST

कपाशी आणि सोयाबीनने दगा दिल्यावर एकमेव आशा असलेल्या तुरीचे दरही ऐन हंगामात घसरले आहे. क्ंिवटल मागे ५०० रुपयांची घसरण झाल्याने ...

यवतमाळ : कपाशी आणि सोयाबीनने दगा दिल्यावर एकमेव आशा असलेल्या तुरीचे दरही ऐन हंगामात घसरले आहे. क्ंिवटल मागे ५०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी चांगलेच हादरले असून यामागे व्यापाऱ्यांची नफेखोरी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. कापूस आणि सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून आठ लाख हेक्टरवर तूर होती. आधीच उशिरा झालेल्या पेरणीने तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाला. इतकेच नव्हे तर मध्यंतरी आलेल्या पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला. त्यामुळे तुरीचा बहर गळला होता. ओलिताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला. विविध संकटे झेलत शेतकऱ्यांची तूर काढणीला आली. एकरी एक ते दोन क्ंिवटल उतारा आला. त्यामुळे लावलागवडीचाही खर्च निघणे शक्य नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आपली तूर बाजारात नेली. सुरुवातीला तुरीचे दर चार हजार रुपये प्रति क्ंिवटलवरून सहा हजार ५०० रुपयापर्यंत वाढत गेले होते. त्यामुळे शेतकरी समाधानी होते. आणखी भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी तूर विकली नाही. मात्र काही दिवसातच ही स्थिती बदलली. गेल्या आठवड्यात तुरीच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली. म्हणायला दर ६ हजार रुपये क्ंिवटल असले तरी बहुतांश शेतकऱ्यांना ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० पर्यंतच दर मिळत आहे. बाजारात तुरीची कुठलीही आवक नाही. तुरीचे चांगले उत्पादन नाही. अशा स्थितीत तुरीचे दर का घसरले हा संशोधनाचा विषय आहे. या घसरणीमागे व्यापाऱ्यांची नफेखोरी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)