शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
14
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
15
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
16
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
17
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
18
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
19
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
20
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी

ऐन हंगामात तुरीचे दर घसरल्याने शेतकरी हादरले

By admin | Updated: February 23, 2015 00:09 IST

कपाशी आणि सोयाबीनने दगा दिल्यावर एकमेव आशा असलेल्या तुरीचे दरही ऐन हंगामात घसरले आहे. क्ंिवटल मागे ५०० रुपयांची घसरण झाल्याने ...

यवतमाळ : कपाशी आणि सोयाबीनने दगा दिल्यावर एकमेव आशा असलेल्या तुरीचे दरही ऐन हंगामात घसरले आहे. क्ंिवटल मागे ५०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी चांगलेच हादरले असून यामागे व्यापाऱ्यांची नफेखोरी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. कापूस आणि सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून आठ लाख हेक्टरवर तूर होती. आधीच उशिरा झालेल्या पेरणीने तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाला. इतकेच नव्हे तर मध्यंतरी आलेल्या पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला. त्यामुळे तुरीचा बहर गळला होता. ओलिताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला. विविध संकटे झेलत शेतकऱ्यांची तूर काढणीला आली. एकरी एक ते दोन क्ंिवटल उतारा आला. त्यामुळे लावलागवडीचाही खर्च निघणे शक्य नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आपली तूर बाजारात नेली. सुरुवातीला तुरीचे दर चार हजार रुपये प्रति क्ंिवटलवरून सहा हजार ५०० रुपयापर्यंत वाढत गेले होते. त्यामुळे शेतकरी समाधानी होते. आणखी भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी तूर विकली नाही. मात्र काही दिवसातच ही स्थिती बदलली. गेल्या आठवड्यात तुरीच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली. म्हणायला दर ६ हजार रुपये क्ंिवटल असले तरी बहुतांश शेतकऱ्यांना ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० पर्यंतच दर मिळत आहे. बाजारात तुरीची कुठलीही आवक नाही. तुरीचे चांगले उत्पादन नाही. अशा स्थितीत तुरीचे दर का घसरले हा संशोधनाचा विषय आहे. या घसरणीमागे व्यापाऱ्यांची नफेखोरी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)