शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

परीक्षा केंद्र सुविधांत नापास

By admin | Updated: February 21, 2015 01:29 IST

वर्षभर अभ्यास करून परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना

यवतमाळ ल्ल लोकमत चमूवर्षभर अभ्यास करून परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. परीक्षा केंद्रावरील असुविधांनी त्यांच्या मन:स्तापात भर पडत असून परीक्षेतही मन लागत नाही. ‘लोकमत’ने १६ ही तालुक्यातील निवडक शाळांचे स्टिंग आॅपरेशन केले. त्यावेळी अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले. वीज, पाणी आणि प्रसाधनगृहांचा अभाव दिसून आला. काही ठिकाणी ऐन परीक्षेच्या आदल्यादिवशी शुकशुकाट होता. तर काही केंद्रांवर पंख्यांची डागडुजी सुरु होती. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देत आहे. शासनाने सर्व परीक्षा केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहे. शहरी भागातील काही शाळांचा अपवाद वगळता ग्रामीण भागातील शाळांमधील परीक्षा केंद्रावर आनंदी आनंदच दिसून आला. पुसद तालुक्यातील सांडवा येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या आदल्यादिवशी शुकशुकाट होता. प्राचार्यांनी शाळेला सुटी दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची टाकी उघड्यावरच आढळून आली. अनेक ट्युब लाईन आणि पंखेही नादुरुस्त असून डेस्क बेंचही अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. यवतमाळ या जिल्हा मुख्यालयी असलेल्या परीक्षा केंद्रावरच सुविधांचा अभाव आहे तर इतर केंद्रांबाबत न बोललेलेच बरे. यवतमाळच्या गोदनी मार्गावर जिल्हा परिषद शासकीय मुलांची शाळा आहे. परीक्षेसाठी १४ खोल्या आरक्षित करण्यात आल्या. परंतु या शाळेत समस्यांचा डोंगर आहे. सहा महिन्यापूर्वी थकीत बिलामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. कोणत्याही वर्गात पंखाच काय लाईटही नाही. अशा स्थितीत विद्यार्थी परीक्षा देणार असून प्रसाधनगृहाचीही अवस्था अतिशय वाईट आहे. दारव्हा येथील जिल्हा परिषद ऊर्दू विद्यालयात डेस्क बेंच, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असली तरी शौचालयात मात्र जाणे कुणालाही शक्य नाही. महागाव तालुक्यातील सवना येथील शिवाजी विद्यालयात तर परीक्षेच्या आदल्यादिवशी वर्ग खोल्यातील पंखे आणि लाईटची दुरुस्ती सुरू असल्याचे दिसून आले. उमरखेड शहरातील जिल्हा परिषद शाळेची तर व्यथाच न्यारी. दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत बारावीचे परीक्षा केंद्र आहे. परीक्षेमुळे येथील शाळा सकाळच्या सत्रात घ्यावी लागते. परीक्षा केंद्रावर नेमक्या कोणत्या सुविधा हव्या आणि काय करायला हवे याबाबत निश्चित कुणालाच माहीत नाही. वणी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. मात्र भाडे कोण देणार हा प्रश्नच आहे. इतर परीक्षा केंद्रावर शिक्षक धावपळ करताना दिसत होते. बारावीच्या परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविले जाते. मात्र विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी साधे स्वच्छता अभियानही राबविले जात नाही.