शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

परीक्षा केंद्र सुविधांत नापास

By admin | Updated: February 21, 2015 01:29 IST

वर्षभर अभ्यास करून परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना

यवतमाळ ल्ल लोकमत चमूवर्षभर अभ्यास करून परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. परीक्षा केंद्रावरील असुविधांनी त्यांच्या मन:स्तापात भर पडत असून परीक्षेतही मन लागत नाही. ‘लोकमत’ने १६ ही तालुक्यातील निवडक शाळांचे स्टिंग आॅपरेशन केले. त्यावेळी अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले. वीज, पाणी आणि प्रसाधनगृहांचा अभाव दिसून आला. काही ठिकाणी ऐन परीक्षेच्या आदल्यादिवशी शुकशुकाट होता. तर काही केंद्रांवर पंख्यांची डागडुजी सुरु होती. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देत आहे. शासनाने सर्व परीक्षा केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहे. शहरी भागातील काही शाळांचा अपवाद वगळता ग्रामीण भागातील शाळांमधील परीक्षा केंद्रावर आनंदी आनंदच दिसून आला. पुसद तालुक्यातील सांडवा येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या आदल्यादिवशी शुकशुकाट होता. प्राचार्यांनी शाळेला सुटी दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची टाकी उघड्यावरच आढळून आली. अनेक ट्युब लाईन आणि पंखेही नादुरुस्त असून डेस्क बेंचही अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. यवतमाळ या जिल्हा मुख्यालयी असलेल्या परीक्षा केंद्रावरच सुविधांचा अभाव आहे तर इतर केंद्रांबाबत न बोललेलेच बरे. यवतमाळच्या गोदनी मार्गावर जिल्हा परिषद शासकीय मुलांची शाळा आहे. परीक्षेसाठी १४ खोल्या आरक्षित करण्यात आल्या. परंतु या शाळेत समस्यांचा डोंगर आहे. सहा महिन्यापूर्वी थकीत बिलामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. कोणत्याही वर्गात पंखाच काय लाईटही नाही. अशा स्थितीत विद्यार्थी परीक्षा देणार असून प्रसाधनगृहाचीही अवस्था अतिशय वाईट आहे. दारव्हा येथील जिल्हा परिषद ऊर्दू विद्यालयात डेस्क बेंच, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असली तरी शौचालयात मात्र जाणे कुणालाही शक्य नाही. महागाव तालुक्यातील सवना येथील शिवाजी विद्यालयात तर परीक्षेच्या आदल्यादिवशी वर्ग खोल्यातील पंखे आणि लाईटची दुरुस्ती सुरू असल्याचे दिसून आले. उमरखेड शहरातील जिल्हा परिषद शाळेची तर व्यथाच न्यारी. दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत बारावीचे परीक्षा केंद्र आहे. परीक्षेमुळे येथील शाळा सकाळच्या सत्रात घ्यावी लागते. परीक्षा केंद्रावर नेमक्या कोणत्या सुविधा हव्या आणि काय करायला हवे याबाबत निश्चित कुणालाच माहीत नाही. वणी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. मात्र भाडे कोण देणार हा प्रश्नच आहे. इतर परीक्षा केंद्रावर शिक्षक धावपळ करताना दिसत होते. बारावीच्या परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविले जाते. मात्र विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी साधे स्वच्छता अभियानही राबविले जात नाही.