शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

अतिक्रमणधारक धडकले जिल्हाकचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:45 IST

तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी....

ठळक मुद्देस्थायी पट्टे देण्याची मागणी : युवा परिवर्तनचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी बुधवारला युवा परिवर्तन की आवाज या संघटनेच्या नेतृत्त्वात झाशी राणी चौकातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यावर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.मोर्चात संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक सहभागी झाले होते. अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबियांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमजुर, गवंडी बांधकाम कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. हे व्यक्ती आपल्या कुटूंबाच्या निवाºयासाठी जमीन विकत घेऊ शकत नाहीत. सद्यस्थितीत त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून संसार थाटला आहे. सदर अतिक्रमण धारकांकडून दंडाच्या स्वरूपात रक्कम संबंधीत प्रशासन घेते. परंतु, त्यांना जमिनीचे स्थायी पट्टे न देण्यात आल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही.लोकप्रतिनिधींकडून या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तालुक्यातील २५ गावांमधील अतिक्रमण धारकांना राहत असलेल्या जागेचे स्थायी पट्टे देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अतिक्रमण धारक आपल्या न्यायीक मागणीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.मोर्चाचे नेतृत्त्व निहाल पांडे, पलाश उमाटे, राहूल मिश्रा, गौरव वानखेडे, सुरज गायकवाड, शुभम मोकलकर, सौरभ माकोडे, अभिषेक बाळबुधे, साहिल नाडे, शुभम कुरील, ऋषभ मेंढुले, धरम शेंडे, सोनु दाते, अक्षय बाळसराफ व आदींनी केले. मोर्चात सावंगी(मेघे), पिपरी(मेघे), म्हसाळा, नालवाडी, गणेशपूर, पुलई, मांडवा, नागापुर, कुरझडी (जामठा), सेलसुरा, सिंदी(मेघे), पांढरकवडा, मांडवगड, वायगाव (नि.), पालोती, भुगाव, करंजी भोगे, सोनेगाव (स्टे.) येथील अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.