शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

आठ उपसा सिंचन योजनांना कायमचे टाळे

By admin | Updated: August 22, 2015 02:32 IST

सिंचनातून समृद्धीसाठी जिल्ह्यात सुमारे २५ वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या आठ उपसा सिंचन योजनांना कायमचे टाळे लावण्यात आले.

थकीत वीज बिल : शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न अपूर्ण यवतमाळ : सिंचनातून समृद्धीसाठी जिल्ह्यात सुमारे २५ वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या आठ उपसा सिंचन योजनांना कायमचे टाळे लावण्यात आले. जेमतेम वर्षभर सुस्थितीत चालल्यानंतर या संस्थांकडे विजेचे बिल थकले. यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या हिताच्या संस्था कायमच्या बंद पडल्या आहेत. सिंचन प्रकल्पाचा फायदा होत नसलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपसा सिंचन योजना राबविली जाते. यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा, अरुणावती आणि वर्धा नदीवर सुमारे २५ वर्षापूर्वी आठ उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. त्यात वर्धा नदीवरील राळेगाव तालुक्यातील संगम, कळमनेर, पैनगंगा नदीवर दिग्रस तालुक्यातील तिवरंग, उमरखेड तालुक्यातील चिंचोली, तिवरी टाकळी, सावळेश्वर, घाटंजी तालुक्यातील ताडसावडी आणि वणी तालुक्यातील नायगाव उपसा सिंचन योजनेचा समावेश होता. नदीच्या पात्रात जॅकवेल बांधण्यात आली. पंप हाऊस उभारण्यात आले. या योजना कार्यान्वित करण्यात आल्या. ही योजना पाणी वापर संस्थांना हस्तांतरित झाली. देखभाल दुरुस्ती आणि शेतकऱ्यांकडून पाणी कराच्या वसुलीचे अधिकार पाणी वापर संस्थांना अधिकार देण्यात आले. मात्र जेमतेम वर्षभर या संस्था सुरळीत चालल्या. त्यानंतर या योजनेचे वीज बिल थकीत होत गेले. वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलापोटी पुरवठा खंडित केला. त्यामुळे या संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. सुरू करण्यासाठी कुणी प्रयत्न केले नाही. काही उपसा सिंचन योजनेचे मोटारपंप चोरीस गेले असून पाईपचीही चोरी झाली. यामुळे या संस्था कायमच्या अडगळीत पडल्या. महत्वाकांक्षी प्रकल्पातून सिंचन होणे अपेक्षित असताना दुर्लक्षितपणामुळे आठही संस्थांना टाळे लागले. आता आठ पैकी पाच संस्था एका सहकारी साखर कारखान्याला तर तीन संस्था खासगी संस्थेला विकण्यात आल्याची माहिती आहे. ज्या उद्देशाने या संस्था स्थापन झाल्या तो उद्देश पूर्णत्वासच गेला नाही. (शहर वार्ताहर)दोन हजार हेक्टर सिंचन क्षमता जिल्ह्यातील या आठ उपसा सिंचन योजनेची सिंचन क्षमता २००७ हेक्टर होती. शेतकऱ्यांनी या संस्थांच्या भरोश्यावर सिंचनाचे स्वप्न रंगविले. वर्षभर या योजनेतून शेतकऱ्यांना पाणीही मिळाले. मात्र अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाणी कराचा भरणा केला नाही. परिणामी या संंस्थांकडे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकीत झाले. त्यातूनच या संस्था बंद पडल्या. उपसा सिंचन योजनेंतर्गत नदी पात्रात लावण्यात आलेले मोटारपंप आणि लोखंडी पाईप चोरट्यांचे लक्ष ठरले. अनेक ठिकाणचे मोटारपंप आणि पाईप चोरीस गेले. परंतु याचा कुणालाही थांगपत्ता नाही. आता या संस्था एका सहकारी संस्थेच्या ताब्यात देण्यात आल्या. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.