शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात टंचाई काळात प्यावे लागते विषाक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:55 IST

जिल्ह्यात ४९३ पेक्षा अधिक जलस्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला असून अनेक गावात दुसरा कोणताही जलस्रोत नसल्याने टंचाई काळात दूषित पाणी प्यावे लागत आहे. जलस्रोतावर धोक्याचा इशारा देणारे फलक लावले असले तरी नाईलाजाने नागरिकांवर तेच पाणी पिण्याची वेळ आली आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देआजारांचा विळखा : यवतमाळ जिल्ह्यात ४९३ जलस्रोत फ्लोराईडयुक्त, धोक्याच्या सूचनांकडे केले जाते दुर्लक्ष

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात ४९३ पेक्षा अधिक जलस्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला असून अनेक गावात दुसरा कोणताही जलस्रोत नसल्याने टंचाई काळात दूषित पाणी प्यावे लागत आहे. जलस्रोतावर धोक्याचा इशारा देणारे फलक लावले असले तरी नाईलाजाने नागरिकांवर तेच पाणी पिण्याची वेळ आली आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.१६ तालुक्यातील जलस्रोताचे नमुने घेतल्यानंतर ४९३ पेक्षा अधिक जलस्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचा अहवाल पुढे आला आहे. त्यात दारव्हा, मारेगाव, राळेगाव, घाटंजी, नेर, महागाव, बाभूळगाव, कळंब, वणी आदी तालुक्यांचा समावेश आहे. येथील पंचायत समितीने ग्रामपंचायतींना पत्र पाठवून पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगितले. तसेच त्या ठिकाणी फलक लावण्याचेही आदेश दिले आहे. प्रशासनाने अनेक जलस्रोतांना रेड कार्ड दिले असून अशा ठिकाणी धोक्याची सूचनाही लावली आहे. हातपंपांना लाल रंग लावले आहेत.यवतमाळ जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. अशा टंचाईच्या काळात अनेक ठिकाणी नागरिकांना अशुद्ध पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. तर काही गावांमध्ये पर्यायी जलस्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणीच प्यावे लागत आहे. घाटंजी तालुक्यातील रोहीपेंड व सायफळ या गावातील जलस्रोत फ्लोराईडयुक्त आहे. हातपंप लाल रंगाने रंगविले आहे. गावकऱ्यांनाही धोक्याबाबत माहिती देण्यात आली. परंतु पाण्याचा कोणताही स्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना लालरंग दिलेल्या फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने या गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तेव्हा वास्तव पुढे आले. सातत्याने फ्लोराईडयुक्त पाणी पिण्यामुळे या गावातील नागरिकांना व्यंग आले आहे. अकाली वृद्धत्व येत असून लहान मुलांचे दातही किडत आहेत. अशीच अवस्था जिल्ह्यातील बहुतांश फ्लोराईडयुक्त जलस्रोत असलेल्या गावांची आहे.फ्लोराईडयुक्त आणि दूषित पाणी प्यायल्याने अनेक आजार जडत आहे. नेर तालुक्यातील आसोला या गावात दूषित पाणी प्राशनाने किडनीचे रुग्ण वाढले आहेत. येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने त्यासाठी आता उपाययोजना चालविल्या आहेत. मात्र आजही अनेक गावात पाणीच मिळत नाही. टंचाईच्या या काळात नागरिक मिळेल तेथून पाणी उपलब्ध करतात आणि तेच अशुद्ध पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पितात.