शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

वाळू माफियाला रोखण्यासाठी जिल्हा पर्यावरण समितीला अधिकार

By admin | Updated: July 18, 2016 00:56 IST

रेती घाटांचा लिलाव करण्यापूर्वी मुंबईच्या पर्यावरण विभागाची परवानगी मिळणे सक्तीचे करण्यात आले होते.

खनिज संपदा वाचविणार : भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल महत्वाचा यवतमाळ : रेती घाटांचा लिलाव करण्यापूर्वी मुंबईच्या पर्यावरण विभागाची परवानगी मिळणे सक्तीचे करण्यात आले होते. यानंतरच रेतीघाटाचा लिलाव करता येत होता. या प्रक्रियेत तीन ते चार महिन्याचा कालावधी निघून जात होता. या सुमारास बेवारस रेतीघाटांवर वाळू माफीयाचा धुडगूस राहत होता. यातून शासनाच्या तिजोरीतील लाखो रूपयांचा महसूल बुडला. सोबत पर्यावरणाला मोठा धोका झाला. यावर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावरील पर्यावरण मूल्यांकन समितीलाच लिलावाचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीतून होणाऱ्या महसुलाच्या चोरीला ब्रेक लागणार आहे. रेती घाटांच्या लिलावातून शासनाच्या तिजोरीतील महसुलामध्ये मोठी भर पडते. मात्र अलीकडे रेती घाटाचा लिलाव करतांना काही जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. यामध्ये रेती घाटाच्या लिलावापूर्वी मुंबईच्या पर्यावरण विभागाची संमती महत्वाची होती. संपूर्ण प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी पर्यावरण विभागाकडे राज्यातील सर्वच जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यामुळे जिल्ह्याची तारीख बोर्डावर येण्यासाठी मोठा कालावधी लागत होता. यातच तीन ते चार महिन्याचा कालावधी निघून जात होता. मुदत संपल्यानंतर लिलावाची परवानगी न भेटल्याने रेतीघाट बेवारस राहत होते. यामुळे रेतीघाटांवर वाळू माफीयांचेच साम्राज्य राहत होते. यातून शासनाच्या तिजोरीला मोठा फटका बसला. या संपूर्ण प्रकारावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला. रेतीघाटाच्या परवानगीसाठी राज्यस्तरावरील मुंबई कार्यालयावर विसंबून न राहता स्थानिक पातळीवरच रेतीघाटाचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा स्तरावर दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा स्तरीय पर्यावरण मूल्यांकन समिती, आणि जिल्हा स्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन समिती अशा दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीमध्ये ११ सदस्य आहेत. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता या मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर खनिकर्म अधिकारी सदस्य सचिव आहेत. आयुक्तांनी सूचविलेले सदस्य समितीमधील सदस्य आहेत. तर जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन समितीमध्ये चार सदस्य आहेत. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहे. तज्ज्ञ, उपविभागीय अधिकारी आणि वनविभागाचे अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. या समितीकडे प्रस्ताव येण्यापूर्वी ग्रामपंचायतीचा ठराव आणि भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल महत्वाचा आहे. या दोन विभागाचे अहवाल आल्यानंतरच स्थानिक समितीपुढे लिलावासाठी प्रस्ताव ठेवता येणार आहे. (शहर वार्ताहर) मुदतीपूर्वीच नवीन प्रक्रिया गतवर्षी रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. या रेतीघाटातील रेतीचा उपसा करण्यासाठी ३० सप्टेंबरची अंतिम मुदत आहे. यापूर्वीच नवीन टेंडर प्रोसेस केली जाणार आहे. यामुळे १ आॅक्टोबरपासून रेती घाटाचा लिलाव झाल्यानंतर नवीन मालकाच्या ताब्यात घाट जाईल. यामुळे रेतीच्या चोरीलाच आळा बसणार आहे.