शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

वाळू माफियाला रोखण्यासाठी जिल्हा पर्यावरण समितीला अधिकार

By admin | Updated: July 18, 2016 00:56 IST

रेती घाटांचा लिलाव करण्यापूर्वी मुंबईच्या पर्यावरण विभागाची परवानगी मिळणे सक्तीचे करण्यात आले होते.

खनिज संपदा वाचविणार : भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल महत्वाचा यवतमाळ : रेती घाटांचा लिलाव करण्यापूर्वी मुंबईच्या पर्यावरण विभागाची परवानगी मिळणे सक्तीचे करण्यात आले होते. यानंतरच रेतीघाटाचा लिलाव करता येत होता. या प्रक्रियेत तीन ते चार महिन्याचा कालावधी निघून जात होता. या सुमारास बेवारस रेतीघाटांवर वाळू माफीयाचा धुडगूस राहत होता. यातून शासनाच्या तिजोरीतील लाखो रूपयांचा महसूल बुडला. सोबत पर्यावरणाला मोठा धोका झाला. यावर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावरील पर्यावरण मूल्यांकन समितीलाच लिलावाचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीतून होणाऱ्या महसुलाच्या चोरीला ब्रेक लागणार आहे. रेती घाटांच्या लिलावातून शासनाच्या तिजोरीतील महसुलामध्ये मोठी भर पडते. मात्र अलीकडे रेती घाटाचा लिलाव करतांना काही जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. यामध्ये रेती घाटाच्या लिलावापूर्वी मुंबईच्या पर्यावरण विभागाची संमती महत्वाची होती. संपूर्ण प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी पर्यावरण विभागाकडे राज्यातील सर्वच जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यामुळे जिल्ह्याची तारीख बोर्डावर येण्यासाठी मोठा कालावधी लागत होता. यातच तीन ते चार महिन्याचा कालावधी निघून जात होता. मुदत संपल्यानंतर लिलावाची परवानगी न भेटल्याने रेतीघाट बेवारस राहत होते. यामुळे रेतीघाटांवर वाळू माफीयांचेच साम्राज्य राहत होते. यातून शासनाच्या तिजोरीला मोठा फटका बसला. या संपूर्ण प्रकारावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला. रेतीघाटाच्या परवानगीसाठी राज्यस्तरावरील मुंबई कार्यालयावर विसंबून न राहता स्थानिक पातळीवरच रेतीघाटाचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा स्तरावर दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा स्तरीय पर्यावरण मूल्यांकन समिती, आणि जिल्हा स्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन समिती अशा दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीमध्ये ११ सदस्य आहेत. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता या मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर खनिकर्म अधिकारी सदस्य सचिव आहेत. आयुक्तांनी सूचविलेले सदस्य समितीमधील सदस्य आहेत. तर जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन समितीमध्ये चार सदस्य आहेत. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहे. तज्ज्ञ, उपविभागीय अधिकारी आणि वनविभागाचे अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. या समितीकडे प्रस्ताव येण्यापूर्वी ग्रामपंचायतीचा ठराव आणि भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल महत्वाचा आहे. या दोन विभागाचे अहवाल आल्यानंतरच स्थानिक समितीपुढे लिलावासाठी प्रस्ताव ठेवता येणार आहे. (शहर वार्ताहर) मुदतीपूर्वीच नवीन प्रक्रिया गतवर्षी रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. या रेतीघाटातील रेतीचा उपसा करण्यासाठी ३० सप्टेंबरची अंतिम मुदत आहे. यापूर्वीच नवीन टेंडर प्रोसेस केली जाणार आहे. यामुळे १ आॅक्टोबरपासून रेती घाटाचा लिलाव झाल्यानंतर नवीन मालकाच्या ताब्यात घाट जाईल. यामुळे रेतीच्या चोरीलाच आळा बसणार आहे.