शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियाला रोखण्यासाठी जिल्हा पर्यावरण समितीला अधिकार

By admin | Updated: July 18, 2016 00:56 IST

रेती घाटांचा लिलाव करण्यापूर्वी मुंबईच्या पर्यावरण विभागाची परवानगी मिळणे सक्तीचे करण्यात आले होते.

खनिज संपदा वाचविणार : भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल महत्वाचा यवतमाळ : रेती घाटांचा लिलाव करण्यापूर्वी मुंबईच्या पर्यावरण विभागाची परवानगी मिळणे सक्तीचे करण्यात आले होते. यानंतरच रेतीघाटाचा लिलाव करता येत होता. या प्रक्रियेत तीन ते चार महिन्याचा कालावधी निघून जात होता. या सुमारास बेवारस रेतीघाटांवर वाळू माफीयाचा धुडगूस राहत होता. यातून शासनाच्या तिजोरीतील लाखो रूपयांचा महसूल बुडला. सोबत पर्यावरणाला मोठा धोका झाला. यावर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावरील पर्यावरण मूल्यांकन समितीलाच लिलावाचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीतून होणाऱ्या महसुलाच्या चोरीला ब्रेक लागणार आहे. रेती घाटांच्या लिलावातून शासनाच्या तिजोरीतील महसुलामध्ये मोठी भर पडते. मात्र अलीकडे रेती घाटाचा लिलाव करतांना काही जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. यामध्ये रेती घाटाच्या लिलावापूर्वी मुंबईच्या पर्यावरण विभागाची संमती महत्वाची होती. संपूर्ण प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी पर्यावरण विभागाकडे राज्यातील सर्वच जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यामुळे जिल्ह्याची तारीख बोर्डावर येण्यासाठी मोठा कालावधी लागत होता. यातच तीन ते चार महिन्याचा कालावधी निघून जात होता. मुदत संपल्यानंतर लिलावाची परवानगी न भेटल्याने रेतीघाट बेवारस राहत होते. यामुळे रेतीघाटांवर वाळू माफीयांचेच साम्राज्य राहत होते. यातून शासनाच्या तिजोरीला मोठा फटका बसला. या संपूर्ण प्रकारावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला. रेतीघाटाच्या परवानगीसाठी राज्यस्तरावरील मुंबई कार्यालयावर विसंबून न राहता स्थानिक पातळीवरच रेतीघाटाचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा स्तरावर दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा स्तरीय पर्यावरण मूल्यांकन समिती, आणि जिल्हा स्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन समिती अशा दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीमध्ये ११ सदस्य आहेत. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता या मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर खनिकर्म अधिकारी सदस्य सचिव आहेत. आयुक्तांनी सूचविलेले सदस्य समितीमधील सदस्य आहेत. तर जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन समितीमध्ये चार सदस्य आहेत. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहे. तज्ज्ञ, उपविभागीय अधिकारी आणि वनविभागाचे अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. या समितीकडे प्रस्ताव येण्यापूर्वी ग्रामपंचायतीचा ठराव आणि भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल महत्वाचा आहे. या दोन विभागाचे अहवाल आल्यानंतरच स्थानिक समितीपुढे लिलावासाठी प्रस्ताव ठेवता येणार आहे. (शहर वार्ताहर) मुदतीपूर्वीच नवीन प्रक्रिया गतवर्षी रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. या रेतीघाटातील रेतीचा उपसा करण्यासाठी ३० सप्टेंबरची अंतिम मुदत आहे. यापूर्वीच नवीन टेंडर प्रोसेस केली जाणार आहे. यामुळे १ आॅक्टोबरपासून रेती घाटाचा लिलाव झाल्यानंतर नवीन मालकाच्या ताब्यात घाट जाईल. यामुळे रेतीच्या चोरीलाच आळा बसणार आहे.