शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जागतिक हवामान बदलामुळे धोक्याची घंटा; यवतमाळातून ‘वसुंधरा बचाव’ यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 10:33 IST

हवामान बदलामुळे मानव जातीलाच धोका निर्माण झाला आहे. जगातील १८४ देशांमधील १५ हजार शास्त्रज्ञांनी याबाबत इशारा देऊन पृथ्वीच्या रक्षणाची आर्त हाक दिली. त्यासाठी यवतमाळातून ‘वसुंधरा बचाव’ ही प्रबोधन संवाद यात्रा सुरू करीत असल्याचे अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्दे१५ हजार शास्त्रज्ञांचा इशारा :

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : हवामान बदलामुळे मानव जातीलाच धोका निर्माण झाला आहे. जगातील १८४ देशांमधील १५ हजार शास्त्रज्ञांनी याबाबत इशारा देऊन पृथ्वीच्या रक्षणाची आर्त हाक दिली. त्यासाठी यवतमाळातून ‘वसुंधरा बचाव’ ही प्रबोधन संवाद यात्रा सुरू करीत असल्याचे अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.शेतकरी आत्महत्या आणि आता कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे बळी जात असल्याने संपूर्ण जगाचेच लक्ष यवतमाळवर केंद्रित झाल्याचे सांगून राज्य दुष्काळ निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा म्हणाले, दुष्काळ, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ, वणवे ही मानवनिर्मित संकटे आहेत. याचे मूळ कारण जीवाष्म इंधन (फॉसिल फ्युएल) आहे. यावर आधारित कोळसा, पेट्रोल, डिझेल, गॅस ही ऊर्जा स्त्रोते आहेत. यामुळे जैवविविधतेचा लोप होत आहे. परिणामी मानवाचे भरणपोषण आणि आरोग्याला धोका निर्माण झाला. यावर वेळीच उपाय न शोधल्यास पृथ्वीसह मानवाचा सर्वनाश होण्याचा धोका आहे, असे प्रा. देसरडा म्हणाले.सध्या देशातील शेती संकटात असून रासायनिक आणि औद्योगिक शेती हे त्याचे मूळ कारण आहे. शेतकरी परावलंबी झाला आहे. केवळ कंपन्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देणारी व्यवस्था निर्माण झाली आहे. यातून वसुंधरेच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण झाले असून त्याचा पहिला फटका शेतकरी आणि मानवी जीवनाला बसणार आहे. जगातील १८४ देशांमधील तब्बल १५ हजार ३६१ शास्त्रज्ञांनी हवामान बदल ही मानवी समाजासमोरील अव्वल समस्या असल्याचा इशारा दिला आहे. कर्ब आणि अन्य विषारी वायूंच्या बेसुमार उत्सजर्नामुळे तापमान वाढीचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला. त्यामुळे वसुंधरा व मानव जातीला वाचविण्यासाठी समतामूलक शाश्वत मार्ग स्वीकारण्याचे आवाहन देसरडा यांनी केले.

राज्यकर्त्यांची फोडा आणि झोडा नीतीधनदांडग्यांच्या मस्तवाल आणि चंगळवादी जीवनशैलीला तत्काळ थांबविण्याची गरज प्रा. देसरडा यांनी व्यक्त केली. बुद्ध, फुले, गांधी, आंबेडकर यांच्या सम्यक विचारानेच विषमता, विसंवाद, विध्वंस आदी संकटांचा मुकाबला शक्य आहे.मात्र, दुर्र्दैवाने या महापुरुषांना एकमेकांविरूद्ध उभे करून जनतेत फूट पाडली जाते व त्यातून राज्यकर्त्यांचे फावते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आजी आणि माजी सर्वच राज्यकर्ते तोडा-फोडा नितीचा अवलंब करीत आले असून आताही सत्ताधारी तेच तंत्र अवलंबत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :environmentवातावरण