शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 21:51 IST

गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : अत्यल्प पाऊस, सोयाबीन, मूग, उडीदाचे उत्पन्न घटणार

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला. त्यातच सध्या मोठ्या प्रमाणात रोग आल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात सापडले आहे.आॅगस्ट महिना संपत आला तरी ३५१ मिमीच्या वर पाऊस पडला नाही. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे उत्पन्न ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. जूनमध्ये पेरण्या आटोपल्यानंतर या महिन्यात २०९ मिमी पाऊस कोसळल्याने पिकांची उगवण चांगली झाली. मात्र जुलैमध्ये प्रमाण घटून १११ मिमी पाऊस आला. त्यामुळे ऐन महत्त्वाच्या काळात पावसाने दगा दिल्याने पीक हिरवी दिसत असली तरी त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. पाऊस गायबच झाल्याने कोरडवाहू भागातील कापूस, सोयाबीन पिके सुकली आहे. मूग आणि उडीदाच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केवळ ३१५ मिमी पावसाची नोंद झाली. पाऊस यावेळी फारच कमी पडला आहे. कमी पावसामुळे नदी, नाले कोरडे पडले आहे. कोणत्याही प्रकल्पाने ५० टक्क्यापर्यंतही पातळी गाठली नाही. ६७.२५ दलघमी साठवण क्षमता असणाºया म्हसणी धरणात १९.८५ दलघमी पाणीसाठा आहे, तर पाथ्रड, कुंभारकिन्हीसह इतर छोट्या प्रकल्पाने तळ गाठला आहे. मुबलक पाऊस न पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. परिणामी विहिरी आटल्या. ओलिताची सोय असणाºया शेतकºयांच्या कपाशीची स्थिती चांगली असली तरी आता मात्र पाणी पुरत नाही. त्यामुळे पीक हिरवी दिसत असली तरी यावर्षी उत्पादनात घट होणार असं मानलं जात आहे. त्यामुळे शेतकºयांची काळजी पुन्हा एकदा वाढली आहे.पिकांवर रोगांचा प्रादुर्भावकमी पाऊस, प्रतिकूल वातावरण यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग आला आहे. सोयाबीनवर तर गेल्या दहा वर्षात पाहिली नाही एवढी अळी असल्याचे सांगण्यात येते. एका झाडावर २५ च्या वर अळ्या आढळतात. तर कपाशीवर फुलकिडा पांढरी माशी हा रोग आल्याने झाडांची स्थिती वाईट आहे. त्यामुळे कपाशी, सोयाबीन या पिकांची दुरावस्था झाली असून शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कमी पाऊस त्यातच पिकांवरील रोगामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असली तरी कृषी खात्याचे जिल्ह्यातील अधिकारी मात्र परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगत आहे.