शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासकीय संकलन केंद्रावर खरेदी झालेला शेतमाल ठेवण्यासाठी धामणगावचे गोदाम उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी खरेदी झालेला शेतमाल ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्देपेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत : नाफेडच्या नियमानुसार गोदामात शेतमाल पोहोचल्यावरच प्रश्न सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेरण्या तोंडावर असताना कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले आहेत. अशा स्थितीत पेरणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ चुकारे मिळावे याकरिता संपूर्ण शेतमाल गोदामात हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासकीय संकलन केंद्रावर खरेदी झालेला शेतमाल ठेवण्यासाठी धामणगावचे गोदाम उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी खरेदी झालेला शेतमाल ठेवला जाणार आहे. यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्याचे पैसे वळते होणार आहेत.जिल्हा प्रशासनाला खरेदीकरिता उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हरभऱ्याकरिता ५० हजार क्विंटचले उद्दिष्ट होते. शासकीय केंद्रावर ५६ हजार क्ंिवटल हरभऱ्याची खरेदी झाली. निर्धारित उद्दिष्टाच्या १२० टक्के हरभऱ्याची अधिक खरेदी करण्यात आली. जिल्ह्याला दीड लाख क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात एक लाख ४७ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.यानंतरही तूर आणि हरभऱ्याची नोंदणी करणारे ४२ हजार शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये १२ हजार हरभरा उत्पादक आणि ३० हजार तूर उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.या शेतकऱ्यांनाही आपल्या शेतमालाची विक्री हमी कें द्रावर करायची आहे.२१ हजार शेतकऱ्यांकडे साडेचार लाख क्विंटल कापूसजिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांकडे साडेचार लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे. या शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कापसाची विक्री करायची आहे. प्रत्यक्षात केंद्रामध्ये जागाच शिल्लक नाही. यामुळे खरेदीला विलंब लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील शेतकºयांचा कापूस शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हीसीमध्ये तशी ग्वाही दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती