शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासकीय संकलन केंद्रावर खरेदी झालेला शेतमाल ठेवण्यासाठी धामणगावचे गोदाम उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी खरेदी झालेला शेतमाल ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्देपेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत : नाफेडच्या नियमानुसार गोदामात शेतमाल पोहोचल्यावरच प्रश्न सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेरण्या तोंडावर असताना कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले आहेत. अशा स्थितीत पेरणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ चुकारे मिळावे याकरिता संपूर्ण शेतमाल गोदामात हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासकीय संकलन केंद्रावर खरेदी झालेला शेतमाल ठेवण्यासाठी धामणगावचे गोदाम उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी खरेदी झालेला शेतमाल ठेवला जाणार आहे. यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्याचे पैसे वळते होणार आहेत.जिल्हा प्रशासनाला खरेदीकरिता उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हरभऱ्याकरिता ५० हजार क्विंटचले उद्दिष्ट होते. शासकीय केंद्रावर ५६ हजार क्ंिवटल हरभऱ्याची खरेदी झाली. निर्धारित उद्दिष्टाच्या १२० टक्के हरभऱ्याची अधिक खरेदी करण्यात आली. जिल्ह्याला दीड लाख क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात एक लाख ४७ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.यानंतरही तूर आणि हरभऱ्याची नोंदणी करणारे ४२ हजार शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये १२ हजार हरभरा उत्पादक आणि ३० हजार तूर उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.या शेतकऱ्यांनाही आपल्या शेतमालाची विक्री हमी कें द्रावर करायची आहे.२१ हजार शेतकऱ्यांकडे साडेचार लाख क्विंटल कापूसजिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांकडे साडेचार लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे. या शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कापसाची विक्री करायची आहे. प्रत्यक्षात केंद्रामध्ये जागाच शिल्लक नाही. यामुळे खरेदीला विलंब लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील शेतकºयांचा कापूस शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हीसीमध्ये तशी ग्वाही दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती