शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात होतेय ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: August 22, 2016 01:13 IST

आठवडीबाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली, तर नकळत आपली विक्रेत्याकडून अगदी जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते.

दगड, आलू, कांद्यांचा वापर : वजनेच झाली गायब, ‘दांडी’ मारण्याचे प्रमाण वाढलेमारेगाव : आठवडीबाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली, तर नकळत आपली विक्रेत्याकडून अगदी जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते. या भावबाजीतून ग्राहकाला क्षणभरच पैसे बचतीचा आनंद मिळतो. मात्र अशा भावबाजीच्या खरेदीतून आपलीच फसगत होते. कारण आठवडीबाजारात सर्रास ‘दांडी’ मारण्याचा प्रकार चालतो. वजन मापात सर्रास दगड, कांदे, आलू आदींचा वापर होत असल्याने ग्राहकाला या फसगतीबद्दल काहीच कळत नाही.जिल्ह्यात सर्वत्र आठवडीबाजारात हीच परिस्थिती आहे. आठडीबाजारात किरकोळ व्यापारी लांबवरून जातात. या विक्रेत्यांना त्यांच्याजवळील वजन मापे दर दोन वर्षांनी एकदा प्रमाणित करावे लागते. तसा शासनाचा नियम आहे. मात्र आठवडीबाजारात जाणारे अनेक छोटे व्यापारी वजन मापे नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी प्रमाणितच करीत नाही. विशेष म्हणजे संबंधित वजन मापे विभागाकडून त्यांची साधी कधी चौकशीही होत नाही. त्यामुळे ते आता खूपच निर्ढावलेले आहेत. ते सर्रास त्यांच्याजवळील वस्तू मोजण्यासाठी खुलेआमपणे दगड, बटाटे, कांदे आदींचा वापर करताना आढळून येत आहे. एखादवेळी वजन व मापे विभागाचे कुणी अधिकारी, कर्मचारी आलेच, तर ते अशा विक्रेत्यांशी ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून वेळ निभावून नेतात. परिणामी या कायद्याची सर्रास पायमल्ली सुरू आहे.अनेक किरकोळ व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून तीच ती वजन व मापे वापरत असतात. त्यामुळे ती अत्यंत जीर्ण होतात. त्या वजन व मापाची झीज होऊन त्याचे वजनही आपोआप काही वर्षांनी कमी होते. त्याच वजन व मापांनी तोलून ग्राहकांना एखादी वस्तू देण्यात येते. परिणामी कमी वजनाची व मापाची वस्तू वस्तू ग्राहकांच्या माथी मारली जाते. त्यामुळे ग्राहकाने एक किलो वस्तूची किंमत विक्रेत्याला दिली, तरी त्या वस्तूचे वजन अनेकदा एक किलोपेक्षा किती तरी कमीच असते.आठबाजारातील काही विक्रेते तर ‘दांडी’ मारण्यात चांगलेच पटाईत झाले आहेत. अनेकदा त्यांच्याजवळ प्रमाणित केलेले वजन, तर सोडाच दुसरेही पर्यायी वजन व माप नसते. ते सर्रास वस्तूंच्या मोजमापासाठी आलू, कांदे, दगडांचा वापर करून ग्राहकांच्या खिशाला चुना लावतात. वस्तू तोलाईत ते प्रचंड सफाईने ‘हातसफाई’ही करतात. ती तर या विक्रेत्यांची मोठी कला असते. प्रमाणित तराजूला एक खास दांडी लावून हातसफाई केली जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करताना ग्राहकांचे लक्ष पारड्यावर असते. हीच संधी साधून वजन करणारा विक्रेता ज्या पारड्यात वस्तू ठेवतो, त्या बाजूला पारडे झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकाच्या माथी मारतो. ग्राहकांचे लक्ष नाही, हे बघताच तराजूची दांडी वरील बाजूला लटकवून अलगदपणे तो कमी वजनाची वस्तू ग्राहकाला देतो.आठबाजारातील विक्रेते अशा अनेक ‘टॅक्ट’ वापरून वजनात प्रचंड हेराफेरी करतात. बाजारात ‘डुप्लीकेट’ वजन मापेही मिळत असून त्या वजनावर एक किलो असे नमूद असते. प्रत्यक्षात त्याचे वजन ८०० ग्रॅमच असते. अशा वजनांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याचा संशय बळावला आहे. अनेकदा दुकानातील वस्तूपेक्षा आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त असण्याचे हे एक कारण असते. आठवडीबाजारात ग्राहक भावबाजी जास्त करतो. त्यामुळे विक्रेते स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी या मार्गांचा अवलंब करतात. (शहर प्रतिनिधी)वजन मापे विभागाकडून कारवाई शून्यआठबाजारात ग्राहकांची सर्रास लूट होत असते. मात्र वजन व मापे विभागाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कधी आठवडी बाजारात वजन तपासण्यासाठी आल्याचे दिसतही नाहीत. एखाद्या जागरूक ग्राहकाने वजन मापाबद्दल विक्रेत्याला हटकल्यास, विक्रेतेच त्यांच्याशी हुज्जत घालतात. त्यामुळे ग्राहक नसती भानगड नको म्हणून अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात. कायदे कितीही कडक असले तरी कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसेल, तर त्याची कशी पद्धतशीर वाट लागते, हे आठवडीबाजारात दिसून येते. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीची वाट बघण्यापेक्षा आता ग्राहकांनीच सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.