शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

बाजारात होतेय ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: August 22, 2016 01:13 IST

आठवडीबाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली, तर नकळत आपली विक्रेत्याकडून अगदी जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते.

दगड, आलू, कांद्यांचा वापर : वजनेच झाली गायब, ‘दांडी’ मारण्याचे प्रमाण वाढलेमारेगाव : आठवडीबाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली, तर नकळत आपली विक्रेत्याकडून अगदी जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते. या भावबाजीतून ग्राहकाला क्षणभरच पैसे बचतीचा आनंद मिळतो. मात्र अशा भावबाजीच्या खरेदीतून आपलीच फसगत होते. कारण आठवडीबाजारात सर्रास ‘दांडी’ मारण्याचा प्रकार चालतो. वजन मापात सर्रास दगड, कांदे, आलू आदींचा वापर होत असल्याने ग्राहकाला या फसगतीबद्दल काहीच कळत नाही.जिल्ह्यात सर्वत्र आठवडीबाजारात हीच परिस्थिती आहे. आठडीबाजारात किरकोळ व्यापारी लांबवरून जातात. या विक्रेत्यांना त्यांच्याजवळील वजन मापे दर दोन वर्षांनी एकदा प्रमाणित करावे लागते. तसा शासनाचा नियम आहे. मात्र आठवडीबाजारात जाणारे अनेक छोटे व्यापारी वजन मापे नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी प्रमाणितच करीत नाही. विशेष म्हणजे संबंधित वजन मापे विभागाकडून त्यांची साधी कधी चौकशीही होत नाही. त्यामुळे ते आता खूपच निर्ढावलेले आहेत. ते सर्रास त्यांच्याजवळील वस्तू मोजण्यासाठी खुलेआमपणे दगड, बटाटे, कांदे आदींचा वापर करताना आढळून येत आहे. एखादवेळी वजन व मापे विभागाचे कुणी अधिकारी, कर्मचारी आलेच, तर ते अशा विक्रेत्यांशी ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून वेळ निभावून नेतात. परिणामी या कायद्याची सर्रास पायमल्ली सुरू आहे.अनेक किरकोळ व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून तीच ती वजन व मापे वापरत असतात. त्यामुळे ती अत्यंत जीर्ण होतात. त्या वजन व मापाची झीज होऊन त्याचे वजनही आपोआप काही वर्षांनी कमी होते. त्याच वजन व मापांनी तोलून ग्राहकांना एखादी वस्तू देण्यात येते. परिणामी कमी वजनाची व मापाची वस्तू वस्तू ग्राहकांच्या माथी मारली जाते. त्यामुळे ग्राहकाने एक किलो वस्तूची किंमत विक्रेत्याला दिली, तरी त्या वस्तूचे वजन अनेकदा एक किलोपेक्षा किती तरी कमीच असते.आठबाजारातील काही विक्रेते तर ‘दांडी’ मारण्यात चांगलेच पटाईत झाले आहेत. अनेकदा त्यांच्याजवळ प्रमाणित केलेले वजन, तर सोडाच दुसरेही पर्यायी वजन व माप नसते. ते सर्रास वस्तूंच्या मोजमापासाठी आलू, कांदे, दगडांचा वापर करून ग्राहकांच्या खिशाला चुना लावतात. वस्तू तोलाईत ते प्रचंड सफाईने ‘हातसफाई’ही करतात. ती तर या विक्रेत्यांची मोठी कला असते. प्रमाणित तराजूला एक खास दांडी लावून हातसफाई केली जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करताना ग्राहकांचे लक्ष पारड्यावर असते. हीच संधी साधून वजन करणारा विक्रेता ज्या पारड्यात वस्तू ठेवतो, त्या बाजूला पारडे झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकाच्या माथी मारतो. ग्राहकांचे लक्ष नाही, हे बघताच तराजूची दांडी वरील बाजूला लटकवून अलगदपणे तो कमी वजनाची वस्तू ग्राहकाला देतो.आठबाजारातील विक्रेते अशा अनेक ‘टॅक्ट’ वापरून वजनात प्रचंड हेराफेरी करतात. बाजारात ‘डुप्लीकेट’ वजन मापेही मिळत असून त्या वजनावर एक किलो असे नमूद असते. प्रत्यक्षात त्याचे वजन ८०० ग्रॅमच असते. अशा वजनांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याचा संशय बळावला आहे. अनेकदा दुकानातील वस्तूपेक्षा आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त असण्याचे हे एक कारण असते. आठवडीबाजारात ग्राहक भावबाजी जास्त करतो. त्यामुळे विक्रेते स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी या मार्गांचा अवलंब करतात. (शहर प्रतिनिधी)वजन मापे विभागाकडून कारवाई शून्यआठबाजारात ग्राहकांची सर्रास लूट होत असते. मात्र वजन व मापे विभागाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कधी आठवडी बाजारात वजन तपासण्यासाठी आल्याचे दिसतही नाहीत. एखाद्या जागरूक ग्राहकाने वजन मापाबद्दल विक्रेत्याला हटकल्यास, विक्रेतेच त्यांच्याशी हुज्जत घालतात. त्यामुळे ग्राहक नसती भानगड नको म्हणून अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात. कायदे कितीही कडक असले तरी कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसेल, तर त्याची कशी पद्धतशीर वाट लागते, हे आठवडीबाजारात दिसून येते. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीची वाट बघण्यापेक्षा आता ग्राहकांनीच सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.