शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

बाजारात होतेय ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: August 22, 2016 01:13 IST

आठवडीबाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली, तर नकळत आपली विक्रेत्याकडून अगदी जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते.

दगड, आलू, कांद्यांचा वापर : वजनेच झाली गायब, ‘दांडी’ मारण्याचे प्रमाण वाढलेमारेगाव : आठवडीबाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली, तर नकळत आपली विक्रेत्याकडून अगदी जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते. या भावबाजीतून ग्राहकाला क्षणभरच पैसे बचतीचा आनंद मिळतो. मात्र अशा भावबाजीच्या खरेदीतून आपलीच फसगत होते. कारण आठवडीबाजारात सर्रास ‘दांडी’ मारण्याचा प्रकार चालतो. वजन मापात सर्रास दगड, कांदे, आलू आदींचा वापर होत असल्याने ग्राहकाला या फसगतीबद्दल काहीच कळत नाही.जिल्ह्यात सर्वत्र आठवडीबाजारात हीच परिस्थिती आहे. आठडीबाजारात किरकोळ व्यापारी लांबवरून जातात. या विक्रेत्यांना त्यांच्याजवळील वजन मापे दर दोन वर्षांनी एकदा प्रमाणित करावे लागते. तसा शासनाचा नियम आहे. मात्र आठवडीबाजारात जाणारे अनेक छोटे व्यापारी वजन मापे नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी प्रमाणितच करीत नाही. विशेष म्हणजे संबंधित वजन मापे विभागाकडून त्यांची साधी कधी चौकशीही होत नाही. त्यामुळे ते आता खूपच निर्ढावलेले आहेत. ते सर्रास त्यांच्याजवळील वस्तू मोजण्यासाठी खुलेआमपणे दगड, बटाटे, कांदे आदींचा वापर करताना आढळून येत आहे. एखादवेळी वजन व मापे विभागाचे कुणी अधिकारी, कर्मचारी आलेच, तर ते अशा विक्रेत्यांशी ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून वेळ निभावून नेतात. परिणामी या कायद्याची सर्रास पायमल्ली सुरू आहे.अनेक किरकोळ व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून तीच ती वजन व मापे वापरत असतात. त्यामुळे ती अत्यंत जीर्ण होतात. त्या वजन व मापाची झीज होऊन त्याचे वजनही आपोआप काही वर्षांनी कमी होते. त्याच वजन व मापांनी तोलून ग्राहकांना एखादी वस्तू देण्यात येते. परिणामी कमी वजनाची व मापाची वस्तू वस्तू ग्राहकांच्या माथी मारली जाते. त्यामुळे ग्राहकाने एक किलो वस्तूची किंमत विक्रेत्याला दिली, तरी त्या वस्तूचे वजन अनेकदा एक किलोपेक्षा किती तरी कमीच असते.आठबाजारातील काही विक्रेते तर ‘दांडी’ मारण्यात चांगलेच पटाईत झाले आहेत. अनेकदा त्यांच्याजवळ प्रमाणित केलेले वजन, तर सोडाच दुसरेही पर्यायी वजन व माप नसते. ते सर्रास वस्तूंच्या मोजमापासाठी आलू, कांदे, दगडांचा वापर करून ग्राहकांच्या खिशाला चुना लावतात. वस्तू तोलाईत ते प्रचंड सफाईने ‘हातसफाई’ही करतात. ती तर या विक्रेत्यांची मोठी कला असते. प्रमाणित तराजूला एक खास दांडी लावून हातसफाई केली जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करताना ग्राहकांचे लक्ष पारड्यावर असते. हीच संधी साधून वजन करणारा विक्रेता ज्या पारड्यात वस्तू ठेवतो, त्या बाजूला पारडे झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकाच्या माथी मारतो. ग्राहकांचे लक्ष नाही, हे बघताच तराजूची दांडी वरील बाजूला लटकवून अलगदपणे तो कमी वजनाची वस्तू ग्राहकाला देतो.आठबाजारातील विक्रेते अशा अनेक ‘टॅक्ट’ वापरून वजनात प्रचंड हेराफेरी करतात. बाजारात ‘डुप्लीकेट’ वजन मापेही मिळत असून त्या वजनावर एक किलो असे नमूद असते. प्रत्यक्षात त्याचे वजन ८०० ग्रॅमच असते. अशा वजनांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याचा संशय बळावला आहे. अनेकदा दुकानातील वस्तूपेक्षा आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त असण्याचे हे एक कारण असते. आठवडीबाजारात ग्राहक भावबाजी जास्त करतो. त्यामुळे विक्रेते स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी या मार्गांचा अवलंब करतात. (शहर प्रतिनिधी)वजन मापे विभागाकडून कारवाई शून्यआठबाजारात ग्राहकांची सर्रास लूट होत असते. मात्र वजन व मापे विभागाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कधी आठवडी बाजारात वजन तपासण्यासाठी आल्याचे दिसतही नाहीत. एखाद्या जागरूक ग्राहकाने वजन मापाबद्दल विक्रेत्याला हटकल्यास, विक्रेतेच त्यांच्याशी हुज्जत घालतात. त्यामुळे ग्राहक नसती भानगड नको म्हणून अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात. कायदे कितीही कडक असले तरी कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसेल, तर त्याची कशी पद्धतशीर वाट लागते, हे आठवडीबाजारात दिसून येते. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीची वाट बघण्यापेक्षा आता ग्राहकांनीच सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.