शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात होतेय ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: August 22, 2016 01:13 IST

आठवडीबाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली, तर नकळत आपली विक्रेत्याकडून अगदी जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते.

दगड, आलू, कांद्यांचा वापर : वजनेच झाली गायब, ‘दांडी’ मारण्याचे प्रमाण वाढलेमारेगाव : आठवडीबाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली, तर नकळत आपली विक्रेत्याकडून अगदी जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते. या भावबाजीतून ग्राहकाला क्षणभरच पैसे बचतीचा आनंद मिळतो. मात्र अशा भावबाजीच्या खरेदीतून आपलीच फसगत होते. कारण आठवडीबाजारात सर्रास ‘दांडी’ मारण्याचा प्रकार चालतो. वजन मापात सर्रास दगड, कांदे, आलू आदींचा वापर होत असल्याने ग्राहकाला या फसगतीबद्दल काहीच कळत नाही.जिल्ह्यात सर्वत्र आठवडीबाजारात हीच परिस्थिती आहे. आठडीबाजारात किरकोळ व्यापारी लांबवरून जातात. या विक्रेत्यांना त्यांच्याजवळील वजन मापे दर दोन वर्षांनी एकदा प्रमाणित करावे लागते. तसा शासनाचा नियम आहे. मात्र आठवडीबाजारात जाणारे अनेक छोटे व्यापारी वजन मापे नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी प्रमाणितच करीत नाही. विशेष म्हणजे संबंधित वजन मापे विभागाकडून त्यांची साधी कधी चौकशीही होत नाही. त्यामुळे ते आता खूपच निर्ढावलेले आहेत. ते सर्रास त्यांच्याजवळील वस्तू मोजण्यासाठी खुलेआमपणे दगड, बटाटे, कांदे आदींचा वापर करताना आढळून येत आहे. एखादवेळी वजन व मापे विभागाचे कुणी अधिकारी, कर्मचारी आलेच, तर ते अशा विक्रेत्यांशी ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून वेळ निभावून नेतात. परिणामी या कायद्याची सर्रास पायमल्ली सुरू आहे.अनेक किरकोळ व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून तीच ती वजन व मापे वापरत असतात. त्यामुळे ती अत्यंत जीर्ण होतात. त्या वजन व मापाची झीज होऊन त्याचे वजनही आपोआप काही वर्षांनी कमी होते. त्याच वजन व मापांनी तोलून ग्राहकांना एखादी वस्तू देण्यात येते. परिणामी कमी वजनाची व मापाची वस्तू वस्तू ग्राहकांच्या माथी मारली जाते. त्यामुळे ग्राहकाने एक किलो वस्तूची किंमत विक्रेत्याला दिली, तरी त्या वस्तूचे वजन अनेकदा एक किलोपेक्षा किती तरी कमीच असते.आठबाजारातील काही विक्रेते तर ‘दांडी’ मारण्यात चांगलेच पटाईत झाले आहेत. अनेकदा त्यांच्याजवळ प्रमाणित केलेले वजन, तर सोडाच दुसरेही पर्यायी वजन व माप नसते. ते सर्रास वस्तूंच्या मोजमापासाठी आलू, कांदे, दगडांचा वापर करून ग्राहकांच्या खिशाला चुना लावतात. वस्तू तोलाईत ते प्रचंड सफाईने ‘हातसफाई’ही करतात. ती तर या विक्रेत्यांची मोठी कला असते. प्रमाणित तराजूला एक खास दांडी लावून हातसफाई केली जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करताना ग्राहकांचे लक्ष पारड्यावर असते. हीच संधी साधून वजन करणारा विक्रेता ज्या पारड्यात वस्तू ठेवतो, त्या बाजूला पारडे झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकाच्या माथी मारतो. ग्राहकांचे लक्ष नाही, हे बघताच तराजूची दांडी वरील बाजूला लटकवून अलगदपणे तो कमी वजनाची वस्तू ग्राहकाला देतो.आठबाजारातील विक्रेते अशा अनेक ‘टॅक्ट’ वापरून वजनात प्रचंड हेराफेरी करतात. बाजारात ‘डुप्लीकेट’ वजन मापेही मिळत असून त्या वजनावर एक किलो असे नमूद असते. प्रत्यक्षात त्याचे वजन ८०० ग्रॅमच असते. अशा वजनांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याचा संशय बळावला आहे. अनेकदा दुकानातील वस्तूपेक्षा आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त असण्याचे हे एक कारण असते. आठवडीबाजारात ग्राहक भावबाजी जास्त करतो. त्यामुळे विक्रेते स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी या मार्गांचा अवलंब करतात. (शहर प्रतिनिधी)वजन मापे विभागाकडून कारवाई शून्यआठबाजारात ग्राहकांची सर्रास लूट होत असते. मात्र वजन व मापे विभागाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कधी आठवडी बाजारात वजन तपासण्यासाठी आल्याचे दिसतही नाहीत. एखाद्या जागरूक ग्राहकाने वजन मापाबद्दल विक्रेत्याला हटकल्यास, विक्रेतेच त्यांच्याशी हुज्जत घालतात. त्यामुळे ग्राहक नसती भानगड नको म्हणून अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात. कायदे कितीही कडक असले तरी कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसेल, तर त्याची कशी पद्धतशीर वाट लागते, हे आठवडीबाजारात दिसून येते. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीची वाट बघण्यापेक्षा आता ग्राहकांनीच सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.