शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

काँग्रेस, राष्ट्रवादीपुढे वर्चस्वाचे आव्हान

By admin | Updated: February 6, 2017 00:10 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमोर जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम राखण्याचे आव्हान उभे झाले आहे.

जिल्हा परिषद : भाजपा, शिवसेनेशी तगडी फाईट यवतमाळ : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमोर जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम राखण्याचे आव्हान उभे झाले आहे. भाजपा आणि शिवसेनेने या दोन्ही पक्षांपुढे आडदांडा निर्माण केला आहे. सध्या जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेसचे २३, तर राष्ट्रवादीचे २१ सदस्य आहे. त्या पाठोपाठ शिवसेनेचे १२, तर भाजपाचे चार सदस्य आहे. याशिवाय मनसे व अपक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. आता हेच संख्याबळ कायम राखण्याचे आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे उभे ठाकले आहे. आत्तापर्यंत बहुतांश काळ या दोनच पक्षांनी जिल्हा परिषदेवर सत्ता गाजविली. ग्रामीण भागात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. त्याच बळावर आजपर्यंत या पक्षाने जिल्हा परिषद व बहुतांश पंचायत समितींवर वर्चस्व कायम राखण्यात यश प्राप्त केले. मात्र सध्या स्थिती बदलली आहे. केंद्र्र व राज्यात भाजपा व सहकारी पक्षांची सत्ता आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेने नजरेत भरण्याजोगे यश प्राप्त केले. त्यामुळे या पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच बळावर हे दोनही पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहे. मात्र ग्रामीण भागाची नाळ अद्याप भाजपाशी जुळली नाही. त्यामानाने शिवसेनेने ग्रामीण भागात बऱ्यापैकी बस्तान बसविले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेतच खरी लढाई होण्याचे संकेत मिळत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेतील लढाईत भाजपा आणि राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहणार आहे. पुसद विभागात राष्ट्रवादीचा जोर कायम राहणार की, ओसरणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे इतर पक्षांतील इच्छुकांना ऐनवेळी उमेदवारी बहाल केल्याने भाजपाचे कार्यकर्ते एकदिलाने त्यांच्या उमेदवारांसाठी काम करणार का, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. नवा-जुना वाद त्यांना घातक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच कारणामुळे भाजपातील काहींना काँग्रेसनेही ऐनवेळी उमेदवारी बहाल केली आहे. (शहर प्रतिनिधी) नाराजांची मनधरणी सुरू काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, या चारपही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीवरून प्रचंड नाराजी खदखदत आहे. या नाराजांमुळे क्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत सापडण्याची भीती आहे. मात्र कोणत्याही स्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समितींवर झेंडा फडकवायचाच, असा चंग बांधलेल्या सर्वच पक्षांनी नाराजांची मनधरणी सुरू केली आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत हे बंडोबा थंड झाले, तर ठीक, अन्यथा ते त्यांच्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना नक्कीच गोत्यात आणणार आहे. पक्षांतर्गंत अडचणींवर मात करून सर्वच पक्षांना वर्चस्व स्थापित करण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहे. त्यातही भाजपा व शिवसेनेसोबत तगडी फाईट असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपला गड राखण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागणार आहे. तूर्तास काँग्रेस नेते एकदिलाने आपापल्या विधानसभा मतदार संघात पक्षाच्या उमेदवारांसाठी मेहनत घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.