शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

काँग्रेस, राष्ट्रवादीपुढे वर्चस्वाचे आव्हान

By admin | Updated: February 6, 2017 00:10 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमोर जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम राखण्याचे आव्हान उभे झाले आहे.

जिल्हा परिषद : भाजपा, शिवसेनेशी तगडी फाईट यवतमाळ : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमोर जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम राखण्याचे आव्हान उभे झाले आहे. भाजपा आणि शिवसेनेने या दोन्ही पक्षांपुढे आडदांडा निर्माण केला आहे. सध्या जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेसचे २३, तर राष्ट्रवादीचे २१ सदस्य आहे. त्या पाठोपाठ शिवसेनेचे १२, तर भाजपाचे चार सदस्य आहे. याशिवाय मनसे व अपक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. आता हेच संख्याबळ कायम राखण्याचे आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे उभे ठाकले आहे. आत्तापर्यंत बहुतांश काळ या दोनच पक्षांनी जिल्हा परिषदेवर सत्ता गाजविली. ग्रामीण भागात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. त्याच बळावर आजपर्यंत या पक्षाने जिल्हा परिषद व बहुतांश पंचायत समितींवर वर्चस्व कायम राखण्यात यश प्राप्त केले. मात्र सध्या स्थिती बदलली आहे. केंद्र्र व राज्यात भाजपा व सहकारी पक्षांची सत्ता आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेने नजरेत भरण्याजोगे यश प्राप्त केले. त्यामुळे या पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच बळावर हे दोनही पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहे. मात्र ग्रामीण भागाची नाळ अद्याप भाजपाशी जुळली नाही. त्यामानाने शिवसेनेने ग्रामीण भागात बऱ्यापैकी बस्तान बसविले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेतच खरी लढाई होण्याचे संकेत मिळत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेतील लढाईत भाजपा आणि राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहणार आहे. पुसद विभागात राष्ट्रवादीचा जोर कायम राहणार की, ओसरणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे इतर पक्षांतील इच्छुकांना ऐनवेळी उमेदवारी बहाल केल्याने भाजपाचे कार्यकर्ते एकदिलाने त्यांच्या उमेदवारांसाठी काम करणार का, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. नवा-जुना वाद त्यांना घातक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच कारणामुळे भाजपातील काहींना काँग्रेसनेही ऐनवेळी उमेदवारी बहाल केली आहे. (शहर प्रतिनिधी) नाराजांची मनधरणी सुरू काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, या चारपही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीवरून प्रचंड नाराजी खदखदत आहे. या नाराजांमुळे क्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत सापडण्याची भीती आहे. मात्र कोणत्याही स्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समितींवर झेंडा फडकवायचाच, असा चंग बांधलेल्या सर्वच पक्षांनी नाराजांची मनधरणी सुरू केली आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत हे बंडोबा थंड झाले, तर ठीक, अन्यथा ते त्यांच्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना नक्कीच गोत्यात आणणार आहे. पक्षांतर्गंत अडचणींवर मात करून सर्वच पक्षांना वर्चस्व स्थापित करण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहे. त्यातही भाजपा व शिवसेनेसोबत तगडी फाईट असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपला गड राखण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागणार आहे. तूर्तास काँग्रेस नेते एकदिलाने आपापल्या विधानसभा मतदार संघात पक्षाच्या उमेदवारांसाठी मेहनत घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.