शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथक जिल्ह्यात

By admin | Updated: December 15, 2014 23:07 IST

दुष्काळाने होरपळत असलेल्या यवतमाळ या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात केंद्रीय पथक मंगळवारी शेतकऱ्यांच्या बांधावर धडकणार आहे. दुष्काळाची पाहणी करून अहवाल

मंगळवारी दुष्काळाची पाहणी : मदतीपेक्षा ठोस उपाय हवे यवतमाळ : दुष्काळाने होरपळत असलेल्या यवतमाळ या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात केंद्रीय पथक मंगळवारी शेतकऱ्यांच्या बांधावर धडकणार आहे. दुष्काळाची पाहणी करून अहवाल सादर करणार आहेत. गत १० वर्षात आठ दुष्काळ झेलणाऱ्या शेतकऱ्यांना आता मदतीपेक्षा ठोस उपाययोजना हव्या आहेत. राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी शेतकरी पॅकेज जाहीर केल्यानंतर केंद्राचे पथक जिल्ह्यात धडकत आहे. उमरखेड, महागाव, कळंब आणि बाभूळगाव तालुक्यातील दुष्काळाचे वास्तव पथक अनुभवणार आहे. १० जणांचे उच्चस्तरीय पथक ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात येत आहे. यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. वर्षभरात २३९ शेतकऱ्यांनी विषाचा घोट घेतला. गत १३ वर्षात तीन हजार २७ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या. शासनाने पॅकेज घोषीत करूनही आत्महत्या थांबायला तयार नाहीत. त्यातच यंदा कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. गतवर्षी अतिवृष्टी आणि गारपीटीने शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. यंदा अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांना बर्बाद केले. क्विंटलने येणारे उत्पादन किलोवर आले. शेतकऱ्यांची स्थिती भयावह झाली. राज्य शासनाने विदर्भ, मराठवाड्यासाठी सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. याचा फायदा यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त चार लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. मात्र मदतीचे निकष घोषीत झाले नसल्याने संभ्रमावस्था आहे. अशा स्थितीत मंगळवारी केंद्राचे पथक यवतमाळ जिल्ह्यात धडकत आहेत. शेतकऱ्यांचे वास्तव अगदी त्यांच्या बांधावर जाऊन अनुभवणार आहेत. राज्य शासनाने मदत दिली आणि केंद्राकडून शेतकऱ्यांना भरीव आशा आहे. पथक आपला अहवाल कसा देते यावर शेतकरी मदतीचे गणित अवलंबून आहे. नगदी पीक म्हणून जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनला शेतकरी प्राधान्य देतात. मात्र या दोन पिकांनी गेल्या काही वर्षात दगा दिला आहे. कपशीचा लागवड खर्च आणि उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. शेतकरी कर्जाच्या खाईत जात आहे. त्यातूनच आत्महत्या होत आहे. सोयाबीनही आता त्याच वाटेवर आहे. यंदा तर सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांनी जनावरे सोडली. सिंचना अभावी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपत आहे. अशा स्थितीत या पथकाने जिल्ह्यातील क्रॉप पॅटर्नवर चर्चा करून सोयाबीन आणि कपाशीला कोणते पर्यायी पीक घेता येऊ शकते यावर चर्चा करण्यासाठी सरकारला सूचवावे. सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना सौर उर्जेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीसोबत एखाद्या गृहउद्योगासाठी मदत करता येईल का याचाही अहवाल शासनाला द्यावा, अशी अपेक्षा आहे. (नगर प्रतिनिधी)