शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

केंद्रीय पथक जिल्ह्यात

By admin | Updated: December 15, 2014 23:07 IST

दुष्काळाने होरपळत असलेल्या यवतमाळ या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात केंद्रीय पथक मंगळवारी शेतकऱ्यांच्या बांधावर धडकणार आहे. दुष्काळाची पाहणी करून अहवाल

मंगळवारी दुष्काळाची पाहणी : मदतीपेक्षा ठोस उपाय हवे यवतमाळ : दुष्काळाने होरपळत असलेल्या यवतमाळ या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात केंद्रीय पथक मंगळवारी शेतकऱ्यांच्या बांधावर धडकणार आहे. दुष्काळाची पाहणी करून अहवाल सादर करणार आहेत. गत १० वर्षात आठ दुष्काळ झेलणाऱ्या शेतकऱ्यांना आता मदतीपेक्षा ठोस उपाययोजना हव्या आहेत. राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी शेतकरी पॅकेज जाहीर केल्यानंतर केंद्राचे पथक जिल्ह्यात धडकत आहे. उमरखेड, महागाव, कळंब आणि बाभूळगाव तालुक्यातील दुष्काळाचे वास्तव पथक अनुभवणार आहे. १० जणांचे उच्चस्तरीय पथक ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात येत आहे. यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. वर्षभरात २३९ शेतकऱ्यांनी विषाचा घोट घेतला. गत १३ वर्षात तीन हजार २७ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या. शासनाने पॅकेज घोषीत करूनही आत्महत्या थांबायला तयार नाहीत. त्यातच यंदा कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. गतवर्षी अतिवृष्टी आणि गारपीटीने शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. यंदा अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांना बर्बाद केले. क्विंटलने येणारे उत्पादन किलोवर आले. शेतकऱ्यांची स्थिती भयावह झाली. राज्य शासनाने विदर्भ, मराठवाड्यासाठी सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. याचा फायदा यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त चार लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. मात्र मदतीचे निकष घोषीत झाले नसल्याने संभ्रमावस्था आहे. अशा स्थितीत मंगळवारी केंद्राचे पथक यवतमाळ जिल्ह्यात धडकत आहेत. शेतकऱ्यांचे वास्तव अगदी त्यांच्या बांधावर जाऊन अनुभवणार आहेत. राज्य शासनाने मदत दिली आणि केंद्राकडून शेतकऱ्यांना भरीव आशा आहे. पथक आपला अहवाल कसा देते यावर शेतकरी मदतीचे गणित अवलंबून आहे. नगदी पीक म्हणून जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनला शेतकरी प्राधान्य देतात. मात्र या दोन पिकांनी गेल्या काही वर्षात दगा दिला आहे. कपशीचा लागवड खर्च आणि उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. शेतकरी कर्जाच्या खाईत जात आहे. त्यातूनच आत्महत्या होत आहे. सोयाबीनही आता त्याच वाटेवर आहे. यंदा तर सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांनी जनावरे सोडली. सिंचना अभावी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपत आहे. अशा स्थितीत या पथकाने जिल्ह्यातील क्रॉप पॅटर्नवर चर्चा करून सोयाबीन आणि कपाशीला कोणते पर्यायी पीक घेता येऊ शकते यावर चर्चा करण्यासाठी सरकारला सूचवावे. सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना सौर उर्जेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीसोबत एखाद्या गृहउद्योगासाठी मदत करता येईल का याचाही अहवाल शासनाला द्यावा, अशी अपेक्षा आहे. (नगर प्रतिनिधी)