शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळा कालव्याच्या पाझराने शेतीची उत्पादकता घटली

By admin | Updated: January 31, 2015 00:18 IST

सुमारे दोन हजार १०० कोटी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेला बेंबळा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान नव्हे तर शाप ठरत असल्याचे अनेक बाबींवरून दिसून येत आहे.

राळेगाव : सुमारे दोन हजार १०० कोटी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेला बेंबळा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान नव्हे तर शाप ठरत असल्याचे अनेक बाबींवरून दिसून येत आहे. या प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता घटल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून होत आहे. दुसरीकडे प्रकल्पातून संकल्पित सिंचनाचे उद्दिष्ट गाठणेही अशक्य बाब असल्याचे बोलले जात आहे. बेंबळा कालव्यातून बाभूळगाव, कळंब, राळेगाव या तीन तालुक्यातील अनेक गावांना गेली दोन वर्षांपासून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. मात्र आता सिंचन विभागाने कितीही प्रयत्न केले तरी साधारण ३० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंतही मजल मारणे कठीण झाले असल्याची आतील गोटातील माहिती आहे. ठिकठिकाणाहून सिंचन कालवे (मुख्य) व उपकालवे (वितरिका) यातून ठिकठिकाणी पाणी पाझरत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे तर, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीचीही दैना झाली आहे. शेतीची उत्पादक क्षमता नष्ट झाल्याची माहिती आहे. यामुळे आता एकीकडे या प्रकल्पातून प्रत्यक्ष सिंचन किती होत आहे याचे तर दुसरीकडे या प्रकल्पातून किती प्रमाणावर पाणी वाया जात आहे, किती शेतकऱ्यांच्या किती हेक्टर कृषी भूमीवर विपरीत परिणाम झाला आहे, याचे सक्षम सरकारी यंत्रणेकडून आॅडिट करून घेण्याची गरज आहे. यातील दोषींचा शोध घेवून त्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.यावर्षी बेंबळा कालवे विभागाने आठ हजार हेक्टर कृषी क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्याचा दावा केला आहे. डिसेंबरपासून विविध पाळ्यांमध्ये पाणी सोडणे सुरू झाले आहे. मार्च अखेरपर्यंत सहा पाळ्यात पाणी सिंचनासाठी सोडले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार विभागाच्या अवाढव्य दाव्याच्या विपरित यावर्षी केवळ दोन हजार हेक्टर शेतीच कशीबशी ओलित होत आहे. कळंब व राळेगाव तालुक्यातील अनेक गावात मुख्य वितरिका आणि उपवितरिकातून पाण्याचा अपव्यय होत आहे. त्या परिसरातील शेती सतत ओली राहात असल्याने उत्पादन क्षमता संपण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. नागपूर अधिवेशन काळात आणि त्यानंतरही बेंबळाग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीही मोठ्या प्रमाणावर शासनाचे लक्ष वेधले होते. तथापि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. (तालुका प्रतिनिधी)