शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालय रामभरोसे

By admin | Updated: February 25, 2015 02:23 IST

शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधारवड समजले जाणारे तालुका कृषी कार्यालय सध्या वाऱ्यावरच दिसत आहे. तालुक्यातून शेकडो शेतकरी कामाच्या निमित्ताने येतात.

फुलसावंगी : शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधारवड समजले जाणारे तालुका कृषी कार्यालय सध्या वाऱ्यावरच दिसत आहे. तालुक्यातून शेकडो शेतकरी कामाच्या निमित्ताने येतात. मात्र कार्यालयातील टेबल-खुर्च्या रिकाम्याच दिसतात. तासन्तास प्रतीक्षा करूनही अधिकारी-कर्मचारी येत नाही. शनिवारी शेकडो शेतकरी या कार्यालयात आले होते. मात्र कृषी कार्यालयात स्मशान शांतता दिसत होती.महागाव कृषी कार्यालयात प्रस्तूत प्रतिनिधीने शनिवारी फेरफटका मारला. त्यावेळी कार्यालय सताड उघडे आणि टेबल -खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या. यावेळी तालुक्यातून ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून आलेले शेतकरी वऱ्हांड्यात अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत होते. या शेतकऱ्यांना बोलते केले असता त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे येथे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. काहींनी प्रतिसाद दिला नाही तर काहींचे मोबाईल स्वीच आॅफ आढळून आले. छाया प्रकाश खाडे ही शेतकरी महिला शनिवारी या कार्यालयात आली होती. त्यांनी दीड वर्षापूर्वी शासनाच्या ५० टक्के अनुदानातून शेतातील सिंचनासाठी स्प्रिंकलर खरेदी केला. परंतु त्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. दीड वर्षांपासून त्या कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. कृषी सहायकाला विचारणा केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे छाया खाडे यांनी सांगितले. गावात कृषी सहायकाचे दर्शन होत नसल्याचे इजनी येथील अनिल वानखडे, कौडगावचे अनिल भोने, दशरथ जाधव, फुलसावंगीचे रामदास घोडे, विष्णू कळंबकर, चिल्ली येथील प्रेमसिंग राठोड, मुरलीधर पांडे, दगडथर येथील संजय मुडे यांनी सांगितले. कृषी सहायक गावात येत नसल्याने आम्हाला आर्थिक झळ सोसून तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. तेथेही कुणी भेटत नाही. तक्रार करावी तर वरिष्ठही जागेवर नसतात, असे सांगितले. तालुका कृषी अधिकाऱ्यासह कृषी अधिकारी, कृषी सहायक, कनिष्ठ लिपिका, वरिष्ठ लिपिक असे नऊ कर्मचारी येथे कार्यरत आहे. त्यापैकी केवळ लिपिक ए.जी. उप्पोड आणि कृषी सहायक ए.डी. दानबाजे उपस्थित होते. तर महागाव, काळी या दोन मंडळात चार पर्यवेक्षक, २४ कृषी सहायकांपैकी १७ ते १८ कृषी सहायक कार्यरत आहे. तालुका कृषी विभागाचा फौजफाटा मोठा असला तरी शेतकऱ्यांंना मात्र त्यांचा शोेध घ्यावा लागतो. यावेळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही जण प्रशिक्षणाला तर काही जण दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. तसेच मानसिक त्रासही सहन करावा लागतो. (प्रतिनिधी)