शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

कृषी कार्यालय रामभरोसे

By admin | Updated: February 25, 2015 02:23 IST

शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधारवड समजले जाणारे तालुका कृषी कार्यालय सध्या वाऱ्यावरच दिसत आहे. तालुक्यातून शेकडो शेतकरी कामाच्या निमित्ताने येतात.

फुलसावंगी : शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधारवड समजले जाणारे तालुका कृषी कार्यालय सध्या वाऱ्यावरच दिसत आहे. तालुक्यातून शेकडो शेतकरी कामाच्या निमित्ताने येतात. मात्र कार्यालयातील टेबल-खुर्च्या रिकाम्याच दिसतात. तासन्तास प्रतीक्षा करूनही अधिकारी-कर्मचारी येत नाही. शनिवारी शेकडो शेतकरी या कार्यालयात आले होते. मात्र कृषी कार्यालयात स्मशान शांतता दिसत होती.महागाव कृषी कार्यालयात प्रस्तूत प्रतिनिधीने शनिवारी फेरफटका मारला. त्यावेळी कार्यालय सताड उघडे आणि टेबल -खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या. यावेळी तालुक्यातून ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून आलेले शेतकरी वऱ्हांड्यात अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत होते. या शेतकऱ्यांना बोलते केले असता त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे येथे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. काहींनी प्रतिसाद दिला नाही तर काहींचे मोबाईल स्वीच आॅफ आढळून आले. छाया प्रकाश खाडे ही शेतकरी महिला शनिवारी या कार्यालयात आली होती. त्यांनी दीड वर्षापूर्वी शासनाच्या ५० टक्के अनुदानातून शेतातील सिंचनासाठी स्प्रिंकलर खरेदी केला. परंतु त्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. दीड वर्षांपासून त्या कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. कृषी सहायकाला विचारणा केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे छाया खाडे यांनी सांगितले. गावात कृषी सहायकाचे दर्शन होत नसल्याचे इजनी येथील अनिल वानखडे, कौडगावचे अनिल भोने, दशरथ जाधव, फुलसावंगीचे रामदास घोडे, विष्णू कळंबकर, चिल्ली येथील प्रेमसिंग राठोड, मुरलीधर पांडे, दगडथर येथील संजय मुडे यांनी सांगितले. कृषी सहायक गावात येत नसल्याने आम्हाला आर्थिक झळ सोसून तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. तेथेही कुणी भेटत नाही. तक्रार करावी तर वरिष्ठही जागेवर नसतात, असे सांगितले. तालुका कृषी अधिकाऱ्यासह कृषी अधिकारी, कृषी सहायक, कनिष्ठ लिपिका, वरिष्ठ लिपिक असे नऊ कर्मचारी येथे कार्यरत आहे. त्यापैकी केवळ लिपिक ए.जी. उप्पोड आणि कृषी सहायक ए.डी. दानबाजे उपस्थित होते. तर महागाव, काळी या दोन मंडळात चार पर्यवेक्षक, २४ कृषी सहायकांपैकी १७ ते १८ कृषी सहायक कार्यरत आहे. तालुका कृषी विभागाचा फौजफाटा मोठा असला तरी शेतकऱ्यांंना मात्र त्यांचा शोेध घ्यावा लागतो. यावेळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही जण प्रशिक्षणाला तर काही जण दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. तसेच मानसिक त्रासही सहन करावा लागतो. (प्रतिनिधी)