शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हा बँकेला २३० कोटी कर्ज मंजूर

By admin | Updated: July 11, 2016 02:10 IST

तब्बल तीन महिने विलंबानंतर राज्य सहकारी बँकेने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.

राज्य सहकारी बँक : राष्ट्रीयकृत बँका ३५ टक्क्यातच यवतमाळ : तब्बल तीन महिने विलंबानंतर राज्य सहकारी बँकेने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जामुळे जिल्हा बँकेची आर्थिक अडचण दूर झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षी सुमारे ४०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करते. परंतु या कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेलाही राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे कर्ज मंजूर होते. परंतु यावर्षी हे कर्ज मिळण्यास जिल्हा बँकेला सुमारे तीन महिने प्रतीक्षा करावी लागली. जिल्हा बॅँकेने ३०३ कोटींच्या कर्जाची मागणी राज्य बँकेकडे नोंदविली होती. परंतु राज्य बँकेने हे कर्जच तत्काळ मंजूर केले नाही. इकडे पीक कर्ज मागणाऱ्यांच्या बँकेत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तरीही पैशाची मागणी वाढत असल्याने अखेर राज्य बँकेकडून गतवर्षीच्या कर्जावर वाढीव कर्ज मिळविण्यात आले. अखेर गेल्या आठवड्यात राज्य सहकारी बँकेने २३० कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेला मंजूर केले आहे. बँकेची पीक कर्ज वाटपाची विस्कटलेली घडी राज्य बँकेच्या कर्जामुळे व्यवस्थित होणार आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ७५ टक्के अर्थात ३०६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. आणखीणही शेतकऱ्यांची कर्जाची मागणी सुरूच आहे. त्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांचे वाटप अवघ्या ३५ ते ४० टक्क्यात असल्याचे सांगितले जाते. बँकेच्या कर्जाची वसुलीही ३०० कोटींवर पोहोचली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ९० कोटींचे पुनर्गठन जिल्ह्यात सुमारे २९ हजार शेतकऱ्यांच्या ९० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. राज्य शासनाने या कर्जाची हमी घेतली असून राज्य बँकेला ही रक्कम जिल्हा बँकेकडे वळती करण्याचे आदेश दिले आहे. या पुनर्गठित कर्जाचे वाटप अद्याप सुरू झालेले नाही. बँकेला ९० कोटी हवे असले तरी प्रत्यक्षात मागणी ही १५७ कोटीची असल्याचे सांगितले जाते. मात्र या ६७ कोटींच्या अतिरिक्त मागणी मागील रहस्य गुलदस्त्यात आहे. साखर कारखान्याला हवे आणखी कर्जपोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्यावर सध्याच २८ कोटींचे कर्ज आहे. या कारखान्याकडे सुमारे आठ कोटी रुपयांची साखर पडून आहे. त्याच्या विक्रीतून पैसा उभा होणार आहे. कारखाना परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात ऊस राहणार आहे. त्यामुळे पुढील हंगामात कारखाना जोरात सुरू होण्याची अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहे. परंतु हा कारखाना सुरू करण्यासाठी आणखी ३५ ते ४० कोटी कारखान्याला लागणार आहे. त्यासाठी कारखान्याकडून जिल्हा बँकेकडे पुन्हा कर्जाची मागणी नोंदविली जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुसदचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांनी सर्व संबंधितांशी बैठक घेऊन कारखान्याचे हित जोपासण्याचे आवाहन केल्याचे सांगितले जाते.