शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

बेंबळाचे पाणी यवतमाळात पोहोचूनही शहरात पाणीपुरवठ्याची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भागांत चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. अलीकडे दोन आठवड्यांपासून मात्र पाणीपुरवठ्याची संपूर्ण घडी विस्कळीत झाली आहे. याला प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असल्याचे बोलले जाते. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निळोणा, चापडोह आणि आता बेंबळा प्रकल्पाचे पाणी मिळत असतानाही यवतमाळकर नागरिकांना पाण्यासाठी चटके सोसावे लागत आहेत. शहराला आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा उदासीन आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहराची तहान भागविली जात आहे. वरिष्ठांपासून ते बहुतांश अधिकारी-कर्मचारी गंभीर नसल्याचे दिसून येते. यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भागांत चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. अलीकडे दोन आठवड्यांपासून मात्र पाणीपुरवठ्याची संपूर्ण घडी विस्कळीत झाली आहे. याला प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असल्याचे बोलले जाते. वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरल्या जात नाहीत, अशी कारणे यासाठी सांगितली जातात, तर दुसरीकडे पाण्याच्या टाक्यांमधून धो-धो पाणी वाहते. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या पाण्याच्या अपव्ययाचा हिशेबच नाही. शहरात लिकेजमधून पाणी वाहते. दुरुस्ती करूनही त्याच त्या ठिकाणी होणारे लिकेज संशयाला जागा निर्माण करून देणारे आहे. अशावेळी कितीही प्रकल्पाचे पाणी आणले तरी टंचाई जाणवणारच अशा तीव्र भावना नागरिकांमधून उमटत आहेत. पाण्याची साठवणूक करण्यासाठी लोकांकडे मर्यादित साधने आहेत. घरातील पाणी संपल्यानंतर हातपंपाशिवाय उपाय नाही. शरीराची काहिली करणारे ऊन तापत आहे. त्यामुळे आजाराला निमंत्रण मिळते. 

चापडोहमध्ये ६० टक्के पाणी- अर्ध्या अधिक शहराची तहान भागविणाऱ्या चापडोह प्रकल्पात अजूनही ६० टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा आहे. निळोणा प्रकल्पही ४० टक्के भरून आहे. गतवर्षीही अखेरपर्यंत इमर्जन्सी वापरले गेलेले नव्हते. यावेळी तर बेंबळा सोबतीला आहे. याही परिस्थितीत पाणीप्रश्न निर्माण झाल्यास प्राधिकरणाची यंत्रणाच जबाबदार राहील हे तेवढेच खरे.

अधिकाऱ्यांकडे बोलायला वेळ नाही- यवतमाळ शहरातील नागरिक पाणीटंचाईचे चटके सहन करीत असताना अधिकाऱ्यांकडे त्यांच्याशी बोलायला वेळ नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काही वरिष्ठ अधिकारी फोनही उचलत नाहीत. काही जणांचा मोचाइल स्वीच ऑफ दाखवितो. - कार्यालयातील फोन तर कायम व्यस्त असतो. शिवाय जबाबदार (?) अधिकारी बऱ्याच वेळा कार्यालयात उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. अशा वेळी समस्या मांडायची कुणाकडे, हा प्रश्न आहे. पाण्याची कृत्रिम टंचाई शहरात निर्माण होत आहे. 

 

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प