शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

बेंबळाचे पाणी यवतमाळात पोहोचूनही शहरात पाणीपुरवठ्याची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भागांत चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. अलीकडे दोन आठवड्यांपासून मात्र पाणीपुरवठ्याची संपूर्ण घडी विस्कळीत झाली आहे. याला प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असल्याचे बोलले जाते. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निळोणा, चापडोह आणि आता बेंबळा प्रकल्पाचे पाणी मिळत असतानाही यवतमाळकर नागरिकांना पाण्यासाठी चटके सोसावे लागत आहेत. शहराला आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा उदासीन आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहराची तहान भागविली जात आहे. वरिष्ठांपासून ते बहुतांश अधिकारी-कर्मचारी गंभीर नसल्याचे दिसून येते. यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भागांत चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. अलीकडे दोन आठवड्यांपासून मात्र पाणीपुरवठ्याची संपूर्ण घडी विस्कळीत झाली आहे. याला प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असल्याचे बोलले जाते. वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरल्या जात नाहीत, अशी कारणे यासाठी सांगितली जातात, तर दुसरीकडे पाण्याच्या टाक्यांमधून धो-धो पाणी वाहते. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या पाण्याच्या अपव्ययाचा हिशेबच नाही. शहरात लिकेजमधून पाणी वाहते. दुरुस्ती करूनही त्याच त्या ठिकाणी होणारे लिकेज संशयाला जागा निर्माण करून देणारे आहे. अशावेळी कितीही प्रकल्पाचे पाणी आणले तरी टंचाई जाणवणारच अशा तीव्र भावना नागरिकांमधून उमटत आहेत. पाण्याची साठवणूक करण्यासाठी लोकांकडे मर्यादित साधने आहेत. घरातील पाणी संपल्यानंतर हातपंपाशिवाय उपाय नाही. शरीराची काहिली करणारे ऊन तापत आहे. त्यामुळे आजाराला निमंत्रण मिळते. 

चापडोहमध्ये ६० टक्के पाणी- अर्ध्या अधिक शहराची तहान भागविणाऱ्या चापडोह प्रकल्पात अजूनही ६० टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा आहे. निळोणा प्रकल्पही ४० टक्के भरून आहे. गतवर्षीही अखेरपर्यंत इमर्जन्सी वापरले गेलेले नव्हते. यावेळी तर बेंबळा सोबतीला आहे. याही परिस्थितीत पाणीप्रश्न निर्माण झाल्यास प्राधिकरणाची यंत्रणाच जबाबदार राहील हे तेवढेच खरे.

अधिकाऱ्यांकडे बोलायला वेळ नाही- यवतमाळ शहरातील नागरिक पाणीटंचाईचे चटके सहन करीत असताना अधिकाऱ्यांकडे त्यांच्याशी बोलायला वेळ नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काही वरिष्ठ अधिकारी फोनही उचलत नाहीत. काही जणांचा मोचाइल स्वीच ऑफ दाखवितो. - कार्यालयातील फोन तर कायम व्यस्त असतो. शिवाय जबाबदार (?) अधिकारी बऱ्याच वेळा कार्यालयात उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. अशा वेळी समस्या मांडायची कुणाकडे, हा प्रश्न आहे. पाण्याची कृत्रिम टंचाई शहरात निर्माण होत आहे. 

 

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प