शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेत माघारले

By admin | Updated: November 29, 2014 23:27 IST

शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत माघारले आहे. गणित आणि विज्ञानात तर ते कोसोदूर आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांना दिलेल्या मुक्कामी

वास्तव उघड : ‘पीओं’ची मुक्कामी भेटप्रदीप दुधकोहळे - शिबला (झरी)शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत माघारले आहे. गणित आणि विज्ञानात तर ते कोसोदूर आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांना दिलेल्या मुक्कामी भेटीत हे वास्तव उघड झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद आणि पांढरकवडा ही दोन आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये आहेत. पुसद प्रकल्पांतर्गत सात शासकीय व १२ खासगी तर पांढरकवडा प्रकल्पांतर्गत २१ शासकीय व २८ खासगी आदिवासी आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमधील सोईसुविधा, आहार, साहित्य पुरवठा, व्यवस्था, शिक्षण, शिक्षकांची उपस्थिती याबाबत नेहमीच ओरड ऐकायला मिळते. त्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रुमाले यांनी शुक्रवारी रात्रीच्यावेळी आश्रमशाळांना भेटी देऊन वास्तव जाणून घेण्यासाठी तेथेच मुक्कामी राहण्याचा निर्णय घेतला. झरी जामणी तालुक्यातील शिबला शासकीय आदिवासी आश्रमशाळेत त्यांचा शुक्रवारचा मुक्काम होता. त्यांनी पांढरकवड्यापासून ४० किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या, पट्टेदार वाघाची दहशत असलेल्या व सायंकाळनंतर सहसा कुणी जाण्याची हिंमत करीत नाही, अशा माथार्जुन आश्रमशाळेलाही रात्री ११ वाजता भेट दिली. याशिवाय मार्की शाळेचीही तपासणी करण्यात आली. या भेटीमध्ये बरेच वास्तव उघड झाले. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे वर्ग १ ते १० चे विद्यार्थी गुणवत्तेत बरेच माघारल्याचे दिसून आले. विज्ञान आणि गणितासारख्या विषयात हे विद्यार्थी सर्वाधिक मागे आहेत. भाषा व अन्य विषयातही हीच स्थिती आहे. त्यासाठी विविध बाबी जबाबदार असल्याचे सांगितले जाते. विद्यार्थ्यांची गैरहजेरी हे प्रमुख कारण पुढे आले आहे. शिक्षकांची रिक्त पदे हेसुद्धा एक कारण पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रशांत रुमाले यांनी विविध उपाययोजना जागीच सूचविल्या व त्याची अंमलबजावणीही करून घेतली. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे वाटप करून त्यांच्यावर जबाबदारी दिली गेली. पालकांमध्ये शिक्षणाप्रती जनजागृती व्हावी म्हणून शाळास्तरावरच पालकांचे नियमित मेळावे घेण्याचे ठरले. त्यासाठी ‘स्कूल फिडींग’ ही पद्धत अवलंबिली जाणार आहे. शिक्षक व शिक्षणातील त्रुट्या दूर केल्या जातील. या माध्यमातून शिक्षकांना मुख्यालयी राहण्यास प्रवृत्त केले जाईल. आश्रमशाळांमधील सोईसुविधांवरही या मुक्कामी भेटीत भर दिला गेला. कर्मचारी मुख्यालयी राहतात की नाही याची तपासणी केली गेली. सुरक्षा कठडे, डास प्रतिबंधक जाळ्या, खिडक्यांना, दारांना कडीकोंडे, तणनाशक फवारणी, फॉगिंग, नियमित वैद्यकीय तपासणी, सक्षम महिला अधीक्षकांच्या नियुक्त्या, विजेची पुरेशी व्यवस्था यावर भर देण्यात आला. शिक्षकांच्या रिक्त पदांवर तातडीचा पर्याय म्हणून कमी विद्यार्थी संख्या असलेल्या बोथ, रोडा सारख्या शाळांचे शिक्षक विद्यार्थी गर्दी असलेल्या शाळांमध्ये वळविणे, समायोजित शाळांच्या शिक्षकांना गरजेच्या ठिकाणी सामावून घेणे, तासिका तत्वावर शिक्षक नेमणे या उपाययोजना गुणवत्तावाढीसाठी केल्या गेल्या. मात्र विज्ञान व गणित या विषयात तासिका तत्वावरील शिक्षकांची बरीच कमतरता व आवश्यकता प्रकल्प अधिकाऱ्यांना मुक्कामी भेटीत आढळून आली.