शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेत माघारले

By admin | Updated: November 29, 2014 23:27 IST

शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत माघारले आहे. गणित आणि विज्ञानात तर ते कोसोदूर आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांना दिलेल्या मुक्कामी

वास्तव उघड : ‘पीओं’ची मुक्कामी भेटप्रदीप दुधकोहळे - शिबला (झरी)शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत माघारले आहे. गणित आणि विज्ञानात तर ते कोसोदूर आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांना दिलेल्या मुक्कामी भेटीत हे वास्तव उघड झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद आणि पांढरकवडा ही दोन आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये आहेत. पुसद प्रकल्पांतर्गत सात शासकीय व १२ खासगी तर पांढरकवडा प्रकल्पांतर्गत २१ शासकीय व २८ खासगी आदिवासी आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमधील सोईसुविधा, आहार, साहित्य पुरवठा, व्यवस्था, शिक्षण, शिक्षकांची उपस्थिती याबाबत नेहमीच ओरड ऐकायला मिळते. त्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रुमाले यांनी शुक्रवारी रात्रीच्यावेळी आश्रमशाळांना भेटी देऊन वास्तव जाणून घेण्यासाठी तेथेच मुक्कामी राहण्याचा निर्णय घेतला. झरी जामणी तालुक्यातील शिबला शासकीय आदिवासी आश्रमशाळेत त्यांचा शुक्रवारचा मुक्काम होता. त्यांनी पांढरकवड्यापासून ४० किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या, पट्टेदार वाघाची दहशत असलेल्या व सायंकाळनंतर सहसा कुणी जाण्याची हिंमत करीत नाही, अशा माथार्जुन आश्रमशाळेलाही रात्री ११ वाजता भेट दिली. याशिवाय मार्की शाळेचीही तपासणी करण्यात आली. या भेटीमध्ये बरेच वास्तव उघड झाले. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे वर्ग १ ते १० चे विद्यार्थी गुणवत्तेत बरेच माघारल्याचे दिसून आले. विज्ञान आणि गणितासारख्या विषयात हे विद्यार्थी सर्वाधिक मागे आहेत. भाषा व अन्य विषयातही हीच स्थिती आहे. त्यासाठी विविध बाबी जबाबदार असल्याचे सांगितले जाते. विद्यार्थ्यांची गैरहजेरी हे प्रमुख कारण पुढे आले आहे. शिक्षकांची रिक्त पदे हेसुद्धा एक कारण पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रशांत रुमाले यांनी विविध उपाययोजना जागीच सूचविल्या व त्याची अंमलबजावणीही करून घेतली. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे वाटप करून त्यांच्यावर जबाबदारी दिली गेली. पालकांमध्ये शिक्षणाप्रती जनजागृती व्हावी म्हणून शाळास्तरावरच पालकांचे नियमित मेळावे घेण्याचे ठरले. त्यासाठी ‘स्कूल फिडींग’ ही पद्धत अवलंबिली जाणार आहे. शिक्षक व शिक्षणातील त्रुट्या दूर केल्या जातील. या माध्यमातून शिक्षकांना मुख्यालयी राहण्यास प्रवृत्त केले जाईल. आश्रमशाळांमधील सोईसुविधांवरही या मुक्कामी भेटीत भर दिला गेला. कर्मचारी मुख्यालयी राहतात की नाही याची तपासणी केली गेली. सुरक्षा कठडे, डास प्रतिबंधक जाळ्या, खिडक्यांना, दारांना कडीकोंडे, तणनाशक फवारणी, फॉगिंग, नियमित वैद्यकीय तपासणी, सक्षम महिला अधीक्षकांच्या नियुक्त्या, विजेची पुरेशी व्यवस्था यावर भर देण्यात आला. शिक्षकांच्या रिक्त पदांवर तातडीचा पर्याय म्हणून कमी विद्यार्थी संख्या असलेल्या बोथ, रोडा सारख्या शाळांचे शिक्षक विद्यार्थी गर्दी असलेल्या शाळांमध्ये वळविणे, समायोजित शाळांच्या शिक्षकांना गरजेच्या ठिकाणी सामावून घेणे, तासिका तत्वावर शिक्षक नेमणे या उपाययोजना गुणवत्तावाढीसाठी केल्या गेल्या. मात्र विज्ञान व गणित या विषयात तासिका तत्वावरील शिक्षकांची बरीच कमतरता व आवश्यकता प्रकल्प अधिकाऱ्यांना मुक्कामी भेटीत आढळून आली.