शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

२० हजार शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित

By admin | Updated: April 8, 2017 00:06 IST

जिल्ह्यातील सर्व बँकांना यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १९१२ कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले.

बँकांना १९१२ कोटींचे उद्दिष्ट : एकरी ५०० रूपयांची वाढ रूपेश उत्तरवार  यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बँकांना यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १९१२ कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. मात्र कर्जमाफीच्या चर्चेने वसुली थांबल्यामुळे बँकांना नवीन कर्ज वाटप करणे अवघड होणार आहे. यात थकबाकीदार २० हजार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जांपासून वंचित राहावे लागणार असल्याने खासगी सावकारांचे चांगलेच फावणार आहे. कर्जमाफीच्या चर्चेमुळे बँकांची वसुलीची मोहीम प्रभावीत झाली. अशा स्थितीत नवीन पीक कर्ज वाटपाचे आव्हान बँकांसमोर उभे आहे. पूर्वीचेच कर्ज वसूल न झाल्याने बँकर्स कमिटीने नव्याने कर्ज वितरित करताना एकरी ५०० रूपयांची वाढ केली. गेल्यावर्षी ओलिताच्या क्षेत्राकरिता बिटी कापसाला हेक्टरी ३४ हजार रूपये पीक कर्ज वितरित करण्यात आले होते. यावर्षी यात एक हजारांची वाढ सुचनिवण्यात आली. यामुळे ओलिताच्या कपाशीसाठी आता हेक्टरी ३५ हजारांचे पीक कर्ज वितरित करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी सोयाबीनला हेक्टरी २६ हजार रूपयाचे पीक कर्ज देण्यात आले होते. यावर्षी यात एक हजार रूपयांची वाढ सुचविण्यात आल्याने हेक्टरी २७ हजार रूपयाचे पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोरडवाहू कपाशीला प्रती हेक्टरी ३४ हजार, ज्वारीला २० हजार, बाजरी १७ हजार, तुरीला २६ हजार, मूग आणि उडीद पिकासाठी १९ हजार, हळद ७५ हजार, केळी ८४ हजार, डाळींब ८० हजार, ऊस बेने प्लॉटसाठी हेक्टरी ७२ हजार रूपयांचे पीक कर्ज मिळणार आहे. नवीन वाढीव दरानुसार पीक कर्ज वितरणाला बँकांनी शुक्रवारपासून सुरूवात केली. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्यावर्षी ४५० कोटींचे पीक कर्ज वितरित केले. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत केवळ २२२ कोटी रूपयांची वसुली झाली. ही कर्ज वसुली नवीन वाटपाच्या तुलनेत निम्मी आहे. त्यामुळे बँंकच आर्थिक अडचणीत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता जिल्हा बँकेला ४८१ कोटी रूपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. जिल्हा बँक आधीच आर्थिक संकटात आहे. २०१४-२०१५ आणि २०१५-२०१६ च्या व्याज सवलत योजनेची रक्कमही अद्याप बँकेला मिळाली नाही. वसुलीही कमी झाली. तरीही जिल्हा बँक शेतकऱ्यांना नव्याने नवीन पीक कर्ज वितरित करणार आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक केवळ ३८ हजार शेतकऱ्यांनाच कर्ज वितरित करू शकणार आहे. २० हजार शेतकरी थकबाकीमुळे नवीन कर्ज वाटपातून बाद होणार आहेत. परिणामी थकबाकीदार शेतकऱ्यांना अखेर सावकाराकडेच धाव घ्यावी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना आयती संधी अल्प मुदती कर्जाची परतफेड शेतकरी करीत नाही, असे काही बँकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वितरित करताना राष्ट्रीयीकृत बँकांनी गेल्यावर्षी कर्ज वाटपात आखडता हात घेतला होता. यावर्षीही राष्ट्रीयीकृत बँका मोजक्याच शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्याची शक्यता जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना तब्बल १२८६ कोटी रूपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट आहे. गेल्यावर्षी या बँकांचे कर्ज वाटप उद्दीष्टाच्या निम्मे होते. यावर्षीही तीच गत राहण्याची शक्यता आहे. नव्या सभासदांना कर्ज नाही खरीपाच्या हंगामाला सध्या थोडा विलंब असला, तरी बँकांकडे कर्ज वाटपाला पैसा नाही. यामुळे नवीन सभासदांना कर्ज न देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. परिणामी नवीन सभासदांना सावकारांकडेच धाव घ्यावी लागणार आहे.