शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

ग्रामपंचायतींकडे १८ कोटींचे आक्षेप

By admin | Updated: July 4, 2016 02:00 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या अंकेक्षणात जवळपास साडेतीन हजार आक्षेप आढळून आले असून यात १८ कोटी रुपयांची ...

२० वर्षांपासूनचा दस्तावेज : साडेतीन हजार आक्षेपांची नोंदणी यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या अंकेक्षणात जवळपास साडेतीन हजार आक्षेप आढळून आले असून यात १८ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाची चौकशी विस्तार अधिकारी करीत असून आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १२०७ ग्रामपंचायतींचे अंकेक्षण करण्यात आले असून यात २० वर्षांपासूनचा दस्तावेज तपासण्यात आला आहे. ग्रामपंचायतींमध्ये विविध शासकीय कामकाज पार पडते. यासोबतच पाणीकर आणि गृहकर याची वसुली करण्यात आली. जमा झालेला संपूर्ण पैसा हिशोबामध्ये दाखविणे बंधनकारक असताना अनेक ग्रामपंचायती वेळेत आपला अहवाल शासन दरबारी सादर करीत नाही. यामुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ जुळत नाही. अशी प्रकरणे आक्षेपांमध्ये नोंदविले जातात, यासोबतच ग्रामपंचायती विविध कामांवर खर्च करते. शासकीय मुल्याच्या तुलनेत हा खर्च अधिक दाखविण्यात येतो. यासोबतच त्याचे पक्के बीलही नसतात. अशी प्रकरणे आक्षेपामध्ये येतात. जमा खर्च न जुळल्याने अनेक आॅडीट संशयांच्या भोवऱ्यात आहेत. गत वीस वर्षांमध्ये असे तीन हजार ५५३ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. यातील दोन हजार ३२५ प्रकरणाची चौकशी करण्यात आली, त्याचे आॅडीट पूर्ण झाले. आता १२२८ आक्षेप चौकशीत आहेत. यामध्ये १८ कोटी ८१ लाख ३९ हजार ३९० एवढी रक्कम आहे. हे आक्षेप निकाली काढण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे. तफावत भरून न निघाल्यास या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवकांकडून अथवा सरपंचांकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यासाठी पेन्शन अथवा कर्मचारी वेतनातून ही रक्कम वळती केली जाणार आहे. प्रत्यक्षात गटविकास अधिकारी आपल्या कामाची गती किती वाढवितात यावर संपूर्ण आक्षेपांची वसुली विसंबून राहणार आहे. अनेक ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड तपासणीसाठी दिले जात नाही. ग्रामसेवकाची बदली झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे रेकार्ड अंकेक्षणासाठी मिळत नाही. याबाबत अनेकदा सूचनाही दिल्या जातात. परंतु ग्रामसेवक मंडळी त्याला दाद देत नाही. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचे गेल्या कित्येक वर्षांपासून अंकेक्षणच झाले नव्हते. आता या ग्रामपंचायतीचे अंकेक्षण करण्यात आले असून त्या विविध प्रकरणाची चौकशी करण्यात आली. गत २० वर्षात मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशीत तथ्य आढळल्यानंतर संंबंधितांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. अंकेक्षणाअभावी ग्रामपंचायतीचा विकास खोळंबला होता. आता या प्रकरणी काय निर्णय लागतो आणि कुणाकडून वसुली होते, याकडे लक्ष लागले आहे. (शहर वार्ताहर) संग्राम केंद्र बंद झाल्याने वाढला गुंतादररोजच्या कामकाजाचा अहवाल शासन दरबारी जमा होत होता. यामुळे पैशाची हेराफेरी करताच येत नाही. आता ही केंद्रच बंद झाल्याने हा अहवाल पाठविण्यासाठी विलंब लागतो. यामुळे हिशोबात आणखीच गैरव्यवहार होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे संग्राम टू सुरू करण्याची आवश्यकता आहे. यावरच पुढील कामाची गती ठरणार आहे. राज्यातील संग्राम केंद्राबाबत शासनाने अद्यापही धोरण निश्चित केले नाही. मुख्यमंत्र्यांनी संग्राम-२ ची घोषणा केली. परंतु त्यासाठी वित्त आयोगात तरतूदच करण्यात आली नाही. त्यामुळे गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील बहुतांश संग्राम केंद्र बंद पडले आहे. आॅपरेटरांना वेतन मिळाले नसल्याने त्यांनी काम करणेच बंद केले आहे. त्याचा परिणाम आता अंकेक्षणावर होत असून संग्राम केंद्र बंद असल्याने गुंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.