शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

शाळांमधून १० हजार मुलांची गळती!

By admin | Updated: July 11, 2016 02:15 IST

शिक्षण हक्क कायद्यामुळे मुलांची शाळांमध्ये होणारी कुचंबणा पूर्णत: थांबली असली तरी ६ ते १४ वयोगटातील मुलांची गळती

‘ड्रॉप आऊट’ मुलांचा शोध : बहुतांश मुले ‘स्थानांतरित’ हरसूल : शिक्षण हक्क कायद्यामुळे मुलांची शाळांमध्ये होणारी कुचंबणा पूर्णत: थांबली असली तरी ६ ते १४ वयोगटातील मुलांची गळती मात्र मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसते. नुकत्याच हाती लागलेल्या माहितीवरून जिल्ह्यात शैक्षणिक सत्र २०१४-१५ च्या तुलनेत तब्बल १० हजार मुले ‘ड्रॉप आऊट’ झाली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यवतमाळसारख्या आदिवासी बहुल व शैक्षणिक दृष्ट्या मागास जिल्ह्यात मुलांची मोठ्या प्रमाणात होणारी गळती चिंतेचा विषय बनली आहे. गळती झालेल्या मुलांची प्रचंड संख्या पाहता प्रशासनही या आकडेवारीने सतर्क झाले असून गळती झालेल्या प्रत्येक मुलाची नावनिहाय माहिती सादर करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात पटावर असलेल्या मुलांच्या संख्येत २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात तब्बल १० हजाराने घट झाली आहे. गेल्या सत्रात शाळांमध्ये शिक्षणासाठी दाखल झालेली १० हजार ११७ मुले या शैक्षणिक सत्रात पटावरून गायब आहेत. त्यामुळे ही मुले नेमकी कुठे आहेत? याचा शोध घेणे आवश्यक झाले आहे. बहुतेक मुले स्थानांतरित शाळांकडून या मुलांबाबत माहिती घेतली असता २०१४-१५ या शैक्षणिक सत्राच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये पटावर असलेला फरक म्हणजे ही गळती झालेली मुले असा समज झाला असावा. यात स्थानांतरण झालेल्या मुलांची संख्या मोठी असल्याने हा आकडा फुगला आहे. खरे तर यातील अनेक मुले शाळेतून दाखले घेवून गेली आहेत. त्यामुळे या गायब मुलांची गळती झाली असेलच असे म्हणता येणार नाही. एवढेच शाळांना या निमिताने शोधावे लागेल. (वार्ताहर) गळती काय आहे?शाळेत दाखल मुलांपैकी अर्ध्यावर शाळा सोडून गेलेली मुले म्हणजे मुलांची गळती होणे होय. राज्यासह देशात शिक्षण हक्क कायदा लागू झाल्याने मुलांची गळती शून्यावर येणे आवश्यक आहे. शिक्षण विभागही आता बऱ्यापैकी डीजीटल होवू लागल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थांची माहिती आॅनलाईन झाली आहे. त्यामुळे विद्यार्थांची गळतीचा हा आकडा ट्रेक करणे शक्य झाले आहे. केंद्रप्रमुखांवर जबाबदारी शाळास्तरावर या मुलांचा शोध सुरु असून केंद्र प्रमुखांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुख्याध्यापकांनी या मुलांचा शोध सुरु केला असून प्रत्येक मुलांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीवरून मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणण्याचा प्रयत्न होईल.