शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शाळांमधून १० हजार मुलांची गळती!

By admin | Updated: July 11, 2016 02:15 IST

शिक्षण हक्क कायद्यामुळे मुलांची शाळांमध्ये होणारी कुचंबणा पूर्णत: थांबली असली तरी ६ ते १४ वयोगटातील मुलांची गळती

‘ड्रॉप आऊट’ मुलांचा शोध : बहुतांश मुले ‘स्थानांतरित’ हरसूल : शिक्षण हक्क कायद्यामुळे मुलांची शाळांमध्ये होणारी कुचंबणा पूर्णत: थांबली असली तरी ६ ते १४ वयोगटातील मुलांची गळती मात्र मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसते. नुकत्याच हाती लागलेल्या माहितीवरून जिल्ह्यात शैक्षणिक सत्र २०१४-१५ च्या तुलनेत तब्बल १० हजार मुले ‘ड्रॉप आऊट’ झाली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यवतमाळसारख्या आदिवासी बहुल व शैक्षणिक दृष्ट्या मागास जिल्ह्यात मुलांची मोठ्या प्रमाणात होणारी गळती चिंतेचा विषय बनली आहे. गळती झालेल्या मुलांची प्रचंड संख्या पाहता प्रशासनही या आकडेवारीने सतर्क झाले असून गळती झालेल्या प्रत्येक मुलाची नावनिहाय माहिती सादर करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात पटावर असलेल्या मुलांच्या संख्येत २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात तब्बल १० हजाराने घट झाली आहे. गेल्या सत्रात शाळांमध्ये शिक्षणासाठी दाखल झालेली १० हजार ११७ मुले या शैक्षणिक सत्रात पटावरून गायब आहेत. त्यामुळे ही मुले नेमकी कुठे आहेत? याचा शोध घेणे आवश्यक झाले आहे. बहुतेक मुले स्थानांतरित शाळांकडून या मुलांबाबत माहिती घेतली असता २०१४-१५ या शैक्षणिक सत्राच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये पटावर असलेला फरक म्हणजे ही गळती झालेली मुले असा समज झाला असावा. यात स्थानांतरण झालेल्या मुलांची संख्या मोठी असल्याने हा आकडा फुगला आहे. खरे तर यातील अनेक मुले शाळेतून दाखले घेवून गेली आहेत. त्यामुळे या गायब मुलांची गळती झाली असेलच असे म्हणता येणार नाही. एवढेच शाळांना या निमिताने शोधावे लागेल. (वार्ताहर) गळती काय आहे?शाळेत दाखल मुलांपैकी अर्ध्यावर शाळा सोडून गेलेली मुले म्हणजे मुलांची गळती होणे होय. राज्यासह देशात शिक्षण हक्क कायदा लागू झाल्याने मुलांची गळती शून्यावर येणे आवश्यक आहे. शिक्षण विभागही आता बऱ्यापैकी डीजीटल होवू लागल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थांची माहिती आॅनलाईन झाली आहे. त्यामुळे विद्यार्थांची गळतीचा हा आकडा ट्रेक करणे शक्य झाले आहे. केंद्रप्रमुखांवर जबाबदारी शाळास्तरावर या मुलांचा शोध सुरु असून केंद्र प्रमुखांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुख्याध्यापकांनी या मुलांचा शोध सुरु केला असून प्रत्येक मुलांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीवरून मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणण्याचा प्रयत्न होईल.