शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पोषण आहारातील आवश्यक घटक बेपत्ता!

By admin | Updated: September 12, 2014 22:55 IST

मानोरा तालुक्यातील शाळांमधील पोषण आहारावितरणामध्ये अनेक त्रुटी.

मानोरा: शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या आहारातील आवश्यक घटकच बेपत्ता झाल्याचे दिसत असून, पोषण आहाराचे कंत्राट घेणारे व्यक्ती केवळ मलिदा लाटण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे योजनेचे तीन तेरा वाजल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे.शालेय विद्यार्थ्यांना सर्वांगिण पोषण आहार मिळावा या हेतुने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. अतिशय उदात्त हेतुने सुरू केलेल्या या योजनेलाही आता भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. त्यामुळे या योजनेच्या मुळ हेतुलाच हरताळ फासल्या जात आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी शालेय पोषण आहार योजना अतिशय चांगली आहे. त्यामध्ये पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी प्रत्येकी १0 ग्राम तांदुळ व २0 ग्राम कडधान्य आणि ५0 ग्राम भाजीपालाआणि सहावी ते आठवीच्या मुलांसाठी १५0 ग्राम तांदुळ, ३0 ग्राम कडधान्य व ७५ ग्राम भाजीपाला अशी तरतुद प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करण्यात आला आहे. सोबतच नागरी भागामध्ये या आहारासह इडली-सांबार मसाला इडली-सांबार तसेच सर्व डाळी वापरून पदार्थ बनवून विद्यार्थ्यांना देण्याची तरतुद आहे. आठवड्यातून किमान एकदा मुळे, बिस्कीट, दुध, चिक्की, राजगुरा लाडू, गुळ शेंगदाने आदी पूरक आहार पुरवायला आहे. परंतु बहुतांश शाळामध्ये हा आहार पुरविलाच जात नाही. या बाबतची संपूर्ण जबबाबदारी मुख्याध्यापकांची असते. अनेक मुख्याध्यापकांना हा अध्यादेश सुद्धा माहित नसल्याने ते आपल्या मर्जीतील ठेकेदाराला सांगण्यावरून खिचडी व डाळीची आमटी एवढाच आहार विद्यार्थ्यांना पुरवितात. कोणत्याही शाळेत आमदरीमध्ये पालेभाज्यांचा वापर केला जात नाही. शासनाच्या आदेशानुसार २५ विद्यार्थी असलेल्या शाळेपासून एक हजार विद्यार्थी असलेल्या शाळांना एका मदतनिसाची नेमणूक करून घ्यावयाची आहे. त्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार मानधनाची व्यवस्था आहे. परंतु अनेक ठिकाणी मर्जीप्रमाणे मानधन देऊन उर्वरित रक्कम हडप केल्या जाते. याकडे संबंधित विभागाकडून लक्षच दिल्या जात नाही. शासनाने जिल्हा परिषद शाळेवरील शिपाई, परिचर ही पदे कमी करून मदतनिसाची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहे. परंतु अनेक ठिकाणी ही नियुक्तीच केल्या जात नाही. याबाबतची संपूर्ण माहिती शिक्षण विभागाला असतानाही शाळांच्या या कारभाराकडे दुर्लक्ष केल्या जाते. शालेय पोषण आहारासाठी शासनाने ठरवून दिल्यानुसार धान्यपुरवठा व्हायला पाहिजे. परंतु गत ६ महिन्यापासून त्या प्रकारचा पुरवठा होत नाही. मिळेल त्या धान्य पुरवठय़ातून पोषण आहार देण्यात येतो. चांगला आहार मिळावा याकरीता प्रयत्न असल्याचे गटशिक्षण अधिकारी यांनी सांगीतले.