शिखरचंद बागरेचा/ वाशिमसध्या सर्वत्र व सर्व समाज बांधवांच्या लग्न सोहळयांना सुरुवात झाली असून धुमधडा क्यात लग्न सोहळे पार पडत आहेत. एकाहून एक वरचढ अशा रितीने खर्चित लग्न समारंभ पार पाडण्यासाठी स्पर्धा प्रत्येकास होतांना दिसून येत आहे. त्यामुळे अशा अवाजवी खर्चांना फाटा देण्यासाठी सामुहीक विवाह सोहळा आवश्यक असल्याची वेळ आलेली आहे. असा सुर लोकमत परिचर्चेतून मान्यवरांनी व्यक्त केला.स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयात सामुहिक विवाह सोहळयांची आज गरज आहे का? या विषयांवर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राजुभाऊ चौधरी समाज सेवक ज्ञानेश्वर सदार, प्रा.अरविंद देशमुख, नितीन काळे, व डॉ. राम बाजड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिर्चेत सहभागी मान्यवरांनी सामुहिक लग्न सोहळा ही संकल्पना उत्तम असल्याचे स्पष्ट केले. लग्नात होणार्या अजाजवशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येकडे वळत आहे. ही फार मोठी गंभीर बाब असून लग्न समारंभातील अवाजवी व अनावश्यक अनाठायी खर्चांना फाटा देवून सामुहिक विवाह सोहळयांचे आयोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
अवाजवी खर्चांना फाटा देण्यासाठी सामुहिक विवाहाची गरज
By admin | Updated: December 3, 2014 23:42 IST