शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मूग, उडिदाच्या हमीभावाच्या नियमाला कोलदांडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:46 IST

वाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मुगाला हमीभावापेक्षा  अल्प दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचे ‘बजेट’ कोलमडत  आहे. हमीभावाने मूग व उडिदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड  केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा, अशी सूचना  आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग  अधिकार्‍यांना केली. 

ठळक मुद्देबाजार समित्यांमधील चित्र नाफेड केंद्राबाबत अधिकार्‍यांमध्ये पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मुगाला हमीभावापेक्षा  अल्प दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचे ‘बजेट’ कोलमडत  आहे. हमीभावाने मूग व उडिदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड  केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा, अशी सूचना  आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग  अधिकार्‍यांना केली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकर्‍यांना पावसाची योग्य प्रमाणात  साथ मिळाली नाही. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर  अल्पावधीतच पाऊस गायब झाला. त्यानंतरही पावसात सातत्य  नसल्याने काही शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. ऐन  शेंगा धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यामुळे मूग  व उडिदाच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट आली. नैसर्गिक संकटे  झेलत असतानाच, आता मानवनिर्मित चक्रव्यूहात बळीराजा  अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. २0१७-१८ या हंगामातील  मूग व उडीद बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. मूग पिकाला  ५३७५ रुपये दर व २00 रुपये बोनस असा एकूण ५५७५ रुपये  हमीभाव तर उडीद पिकाला ५२00 रुपये दर व २00 रुपये बोनस  असा एकूण ५४00 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.  या हमीभावानुसार चांगल्या दर्जाच्या उडीद व मुगाची बाजार  समितीत खरेदी होणे अपेक्षित आहे; मात्र कोणत्याच दर्जाच्या  मूग व उडिदाची खरेदी बाजार समितीत हमीभावाने सुरू  नसल्याचे वास्तव आहे. हमीभावापेक्षा थोड्याफार कमी फरकाने  मूग व उडिदाची खरेदी झाली तरीदेखील शेतकर्‍यांना फारसा  तोटा होणार नाही; मात्र हमीभावापेक्षा तब्बल एक हजार ते  १३00 रुपयांपेक्षा कमी दराने उडीद व मुगाची खरेदी होत  असल्याने शेतकर्‍यांचे संपूर्ण बजेट कोलमडून जात आहे. शे तमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, अशी  मागणी सर्वांकडूनच केली जाते. अद्यापही उत्पादन खर्चावर  आधारित भाव मिळत  नाही. कधी ओला तर कधी कोरड्या  दुष्काळाचे दुष्टचक्र भेदून कष्ट करणार्‍या  बळीराजाला सुरुवा तीला पेरलेले उगवेल का, याची चिंता असते. जे उगवले ते  कवडीमोलाने विक्री होत असल्याची वेदना घेऊनच वाटचाल  करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. शेतकर्‍यांचा शेतमाल  बाजारात आला की गगनाला भिडलेले भाव तळाशी येतात, हा  दरवर्षीचा अनुभव आताही शेतकर्‍यांना येत आहे. अल्प भाव  मिळत असल्याने लागवड खर्च अन् उत्पन्नाचा ताळमेळ  बसविण्यात शेतकर्‍यांची झोप उडाली आहे.गुरुवारी जिल्हय़ातील बाजार समितींमधील उडीद व मुगाच्या  बाजारभावावर नजर टाकली असता, हमीभावापेक्षा १२00 रु पयांनी खरेदी सुरू असल्याचे दिसून आले. उडिदाला ३५00 ते  ४२0१ रुपये तर मुगाला ४000 ते ४४00 रुपये क्विंटल असा  बाजारभाव होता. मुगाची आवक ७५0 क्विंटल तर उडिदाची  आवक २७५0 क्विंटल होती. 

नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा!शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने वाशिम जिल्हय़ात  आधारभूत किमतीने उडीद व मुगाची खरेदी होण्यासाठी नाफेड  केंद्र सुरू करावे, अशी मागणी वाशिम बाजार समितीचे संचालक  राजू चौधरी यांनी १३ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक रमेश  कटके यांच्याकडे केली होती. याची दखल घेत कटके यांनी आ ता जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांशी संपर्क साधून, पत्रव्यवहार  केला आहे. नाफेडमार्फत मूग व उडिदाचे हमीभाव खरेदी केंद्र  सुरू करण्याबाबत प्रधान कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा,  अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग  अधिकार्‍यांना पत्राद्वारे केली आहे.