शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

भटक्या विमुक्तांचा आरक्षणाचा न्यायालयीन लढा तीव्र करणार

By admin | Updated: December 3, 2014 23:40 IST

प्रा.मोहन चव्हाण यांचे प्रतिपादन.

वाशिम : भटक्या विमुक्त हा आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असून तेच या देशाचे मुलनिवासी असल्याचे असंख्य पुरावे उपलब्ध असून भटक्या विमुक्ताच्या न्यायालयीन लढा आरक्षणासाठी तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मोहन चव्हाण यांनी केले.स्थानिक जिजाउ सभागृहात बंजारा समाजाच्या न्यायालयीन लढा या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. अध्यक्ष दिलीपराव जाधव तर विचार पिठावर भारतीय बंजारा समाज कर्मचारी संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गोविंद राठोड (आयुक्त ठाणे) अमरसिंग चव्हाण, प्रदेश सरचिटणीस, बळीभाउ राठोड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. चव्हाण म्हणाले की, १८७१ मध्ये इंग्रज राजवटीतच भटक्या विमुक्तांना गुन्हेगारी जमातीच्या कायद्याने बंदीस्त करण्यात आले. १८८१ मध्ये वनकायद्याद्वारे भटक्या विमुक्तांचे मुक्त पंख छाटण्यात आले. त्यानंतर १९६५ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसं तराव नाईक यांनी भटक्या विमुक्तासाठी स्वतंत्र आरक्षण लागू केले. त्यानंतर धाडे आयोग, बापट आयोग, कालेलकर आयोग, राज्य मागासवर्गीय आयोग, मंडल आयोग, रेणके आयोग, भटक्या विमुक्ताच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आले. सर्वच आयोगानी बंजारा समाज हा आदीम जमातीच्या आराखड्यात बसत असल्याचा निर्वाळा देवूनही त्यांना त्यांच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.