शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

चिखली परिसरात दमदार पाऊस

By admin | Updated: July 10, 2014 22:44 IST

रिसोड तालुक्यातील चिखली सरनाईक परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहेत.

चिखली सरनाईक : रिसोड तालुक्यातील चिखली सरनाईक परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहेत. परिणामी, पावसाअभावी सुकणार्‍या बिजांकुराला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची चिंता अधिकच वाढली होती. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळायच्या. मात्र, पेरणी योग्य पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. जमिनीतील असलेल्या ओलीच्या भरवशावर काही शेतकर्‍यांनी पेरण्यास सुरुवात केली होती. पेरणी केलेले बियाणे उगवलेही आहे. मात्र, त्यानंतर पाऊस नसल्याने बिजांकूर कोमेजण्याच्या मार्गावर होते. दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. पावसाअभावी काही शेतकर्‍यांनी पेरण्या करण्याचे टाळले. काही शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत होते. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, गत दोन-तीन दिवसापासून बर्‍यापैकी पाऊस बरसल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. किनखेडा परिसरातील ८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकर्‍यांची चिंता तात्पुरत्या स्वरुपात का होईना, दूर झाली आहे.