शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक संकटापुढे शेतकरी हतबल

By admin | Updated: August 2, 2014 23:22 IST

तिबार पेरणीचे संकट; आर्थिक मदतीसाठी शेतकर्‍यांचा टाहो

कारंजालाड : पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा कालावधीत होत असतानाही अद्यापपर्यंत कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. मंगरूळपीर : तालुक्यात ९0 टक्के पेरण्या आटोपल्या असल्या तरी अद्यापपर्यंत जोरदार पाऊस पडला नाही. बहुतांश भागातील पेरण्या उलटल्याने शेतकर्‍यांनी दुबार नंतर तिबार पेरण्या सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.निर्सगाच्या खेळ खंडोब्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून , शासनाने दुबार-तिबार पेरणी झालेल्या क्षेत्राचा सर्व्हेक्षण करूण मदत करावी अशी मागणी होत आहे. यावर्षी तालुक्यातील शेतकर्‍यांनी अत्यल्प पावसावरच पेरण्या सुरू केल्या होत्या. त्यामुळे जुलै महिण्याच्या प्रारंभालाच पेरण्या उलटल्या. मात्र प्रशासनाने कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. मग पुन्हा पावसाचे आगमन झाल्यानंतर पेरण्यांनी जोर धरला. परंतु आवश्यक तेवढय़ा प्रमाणात निसर्गाने साथ दिली नाहीे व पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे पेरलेले बियाणे उगवले नाही. पुन्हा तिबार पेरण्याचे संकट शेतकर्‍यावर ओढावल्या गेले. तालुक्यात पेरण्या झाल्याचे चित्र दिसत असले तरी वारंवार पेरण्या करण्याचा प्रसंग बळीराजा वर येत आहे. आतापर्यंतच्या पावसामुळे तालुक्यावरील जलसंकट टळले नाही. नदय़ा अद्यापही तहानलेल्या आहेत तर लहान मोठय़ा धरणाच्या पाण्याच्या पातळीत किंचीतही वाढ झाल्याचे दिसत नाही. पावसाचे वातावरण तयार दिसत असेल पण दाटलेले आभाळ हुलकावणी देत आहे.गेल्या वर्षीच्या पर्जन्यवृष्टीने आजही शेतकरी सावरला नाही तोच यंदा कोरड्या दुष्काळाची झळ बसणार की काय? अशी परिस्थिती दिसायला लागली आहे. निर्सगाच्या प्रकोपाने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या स्वप्नाची राख रांगोळी होणार की काय हे येणारा काळ सांगेल. मानोरा : यावर्षी पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. काही शेतकर्‍यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. काही प्रमाणात आलेल्या पावसाने पेरणीची योग्य वेळ जाण्याच्या स्थितीत असल्याने सर्वांंनीच पेरण्या आटोपल्या. पण पाऊस येत नसल्याने काही शेतकर्‍यांना तिबार तर बहुतांश शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकर्‍यामधून होत आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकर्‍यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागत आहे. पावसाच्या विलंबाने सद्यस्थितीत पावसाअभावी निघालेली पीके कोमजत असून त्यांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे तर काही शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांची बियाणे जमिनीच्यावर निघण्याच्या स्थितीत आहे. मात्र त्याला थोडाफार पावसाची आवश्यकता आहे. आकाशात ढग तयार होतात. मात्र पाऊस येत नसल्याने पावसाविना पीक जमिनीतून कसे बाहेर येणार हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर पडला आहे. शासनाने शेतकर्‍यांना आर्थिक़ धीर द्यावा अशी मागणी होत आहे

. ** यावर्षी वाशिम जिल्ह्यात अल्पशा पावसामुळे शेतकर्‍यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीचा सर्व्हे करून त्यांना मदत करावी, अशी मागणी वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे यांनी ३१ जुलै रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

** मुंबईच्या मंत्रालयात त्यांनी मंत्री कदम यांची भेट घेऊन वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या. तसेच वाशिम जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे त्यांच्यावर दुबार व तिबार पेरणीचे संकट आले. त्यामुळे सर्व्हे करून शेतकर्‍यांना हेक्टरी मदत करावी, असा आग्रह त्यांनी निवेदनातून धरला. या प्रसंगी मंत्री कदम यांनी तातडीने भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करीत सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहे.