शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST

वाशिम : जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येसारखे प्रकार होऊ नये, यासाठी जनजागृतीवर भर देणे आवश्यक असून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रत्येक ...

वाशिम : जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येसारखे प्रकार होऊ नये, यासाठी जनजागृतीवर भर देणे आवश्यक असून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याला मुलींच्या जन्मदराबाबत आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केल्या. नियोजन भवन येथे २ फेब्रुवारी रोजी झालेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान जिल्हास्तरीय कृती समितीच्या आढावा सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तेरकर, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, स्काऊटचे जिल्हा संघटक राजेश गावंडे, फार्मसिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील, अशासकीय सदस्य डॉ. अलका मकासरे, सोनाली ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, ज्या गावामध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, अशा गावांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती करावी. जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्यासारखे प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. तसेच असे प्रकार घडत असल्यास त्याची माहिती गोपनीय स्वरुपात प्रशासनला सादर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. नागरिक, स्वयंसेवी संस्थांना स्त्रीभ्रूण हत्या विषयी काही माहिती असल्यास त्यांनी प्रशासनाला कळवावे. त्यांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल. ज्या गावांमध्ये मुलींचा जन्मदर गेल्या काही वर्षात १ हजारपेक्षा अधिक आहे, अशा गावांचा सन्मान करण्यात येईल. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि आरोग्य विभागाने प्रत्येक महिन्याला अशा गावांची माहिती संकलित करावी. गावपातळीवर ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी जनजागृतीकरिता विविध उपक्रम राबवावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते म्हणाले, तालुका अथवा गाव पातळीवर ज्या स्वयंसेवी संस्था, समाजसेवक स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानासाठी स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत, अशा लोकांना प्रोत्साहन द्यावे. बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने सभा घेऊन त्यांना काही अडचणी येत असल्यास त्याची सोडवणूक करावी, असे त्यांनी सांगितले.