शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेचा बोजवारा

By admin | Updated: October 26, 2014 00:22 IST

रिसोड तालुक्यात पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेच्या निधीचा अपव्यय.

मालेगाव (वाशिम): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने सुरू केलेल्या पर्यावरण संतुलन ग्राम योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. सन २00८ मध्ये पर्यावरण संतुलन ग्राम योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये झाडे लावणे, त्याची जोपासना करणे, त्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी यामधून जमा झालेल्या ५0 टक्के रकमेचा खर्च वृक्षलागवडीसाठी खर्च करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायत व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतींनी घरपट्टी व पाणीपट्टीची सक्तीची वसुली करत पर्यावरण संतुलन ग्राम योजना राबवण्यास सुरुवात केली होती. काही गावातील अपवाद वगळता गेल्या ६ वर्षात कुठेही जिवंत झाडे पाहावयास मिळत नाही त्यामुळे घरपट्टी, पाणी पट्टी पोटी वसूल केलेला निधीच्या ५0 टक्के खर्च केलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी व प्रशासनाचे अधिकारी याची प्रभारी अंमलबजावणी करीत नसल्याचे चित्र आहे. मालेगाव तालुक्यात २0 गावांचा सहभाग होता आता यावर्षी किमान २५ गावे त्या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त गावात या योजनेत सहभागी करून घेणार असल्याचे गट विकास अधिकारी संदीप पवार यांनी सांगीतले.

*काय आहे ही योजना?

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयानुसार सन २00८ मध्ये पर्यावरण संतुलन ग्राम योजना सुरू करण्यात आली. यामध्ये गावातील लोकसंख्येच्या ५0 टक्के वृक्षलागवड करावी, घरपटी पाणीपट्टी यामध्ये वसुली करून ५0 टक्के रक्कम वृक्षलावडीसाठी खर्च करावी; मात्र वसुली ६0 टक्क्यापेक्षा जास्त गावांमध्ये ५0 टक्केपेक्षा जास्त नागरिक शौचालयाचा वापर करणो आवश्यक आहे. वृक्षलागवड ही गावठाणचा परिसर, ई क्लास, एफ क्लास येथे करावी दुसर्‍या व तिसर्‍या वर्षात वसुली १00 टक्के करावी.