शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
4
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
5
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
6
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
7
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
8
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
9
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
10
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
12
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
14
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
15
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
16
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
17
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
18
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
19
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
20
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर

पालिकांचा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्याला ‘खो’

By admin | Updated: June 25, 2014 01:40 IST

वाशिम जिल्ह्यातील चारही नगरपालिकांनी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश बसविले धाब्यावर.

वाशिम: पावसाळ्यात ओढविणारी आपत्ती निवारण्यासाठी स्वत: चा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले आदेश जिल्ह्यातील चारही नगरपालिकांनी चक्क धाब्यावर बसविले आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी अद्याप एकाही पालिकेने हा आराखडा तयार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर केला नसल्याची माहिती हाती आली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ९ मे रोजी जिल्ह्यातील नगरपालिका प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, तहसील प्रशासन पंचायत समिती प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, पोलिस विभाग आदी महत्त्वपूर्ण विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. सदर बैठकीत जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराळे यांनी जिल्ह्यातील चारही नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना तत्काळ आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. सदर बैठकीच्या इतवृत्तातही याची नोंद आहे; मात्र धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील चार पैकी एकाही नगरपालिका प्रशासनाने हा आराखडा अद्याप तयार केला नाही. शिवाय मान्सूनपूर्व स्वच्छता व नाल्यांचे सफाई करण्याचे कामही सुरू केले नाही. यावरूनच पालिकांना आपत्ती व्यवस्थापनाची असणारी अँलर्जी अधोरेखित होते.