शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलावी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 13:38 IST

कारंजा : ज्या स्त्रीवर अत्याचार झाला असेल तर या अत्याचाराला स्त्रीच जबाबदार असेल असा कयास समाज करत असतो कारण तीचं वागणं, तिचं चालणं, तिच नटणे, तिचेक कपडे याबाबीवरून तिच्यावरच दोषारोपण केल्या जात,े मात्र ही मानसिकता समजााने बदलावी असे मत जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी काढले . कारंजा येथे सुरु ...

ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील शरद व्याख्यानमाला

कारंजा : ज्या स्त्रीवर अत्याचार झाला असेल तर या अत्याचाराला स्त्रीच जबाबदार असेल असा कयास समाज करत असतो कारण तीचं वागणं, तिचं चालणं, तिच नटणे, तिचेक कपडे याबाबीवरून तिच्यावरच दोषारोपण केल्या जात,े मात्र ही मानसिकता समजााने बदलावी असे मत जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी काढले . कारंजा येथे सुरु असलेल्या नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरु असलेल्या शरद व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. स्त्रियांचे बदलते विश्व संरक्षण मागण्यापासून तर ते देण्यापर्यत हा त्यांच्या व्याख्यानामाचा विषय होता. प्रारंभी राधा मुरकुटे यांनी त्यांचे स्वागत केले तर डॉ.अनघा कांत यांनी परिचय करुन दिला.

स्त्रियांच्या शोषणविषयी बोलताना पाटील पुढे म्हणाल्या  की , स्त्रियांचे कर्तृत्व व क्षमता असून सुद्धा कौटूंबिक परिधान तिचं स्थान दुय्यम ठरते. घरातील मुलामुलींच सासु सासºयांच सांभाळ करणे, मुलांच्या डब्यापासून तर घरातील प्रत्येक वस्तुंची देखभाल तिलाच करावी लागते . पुरुष मात्र घरातील कोणतीच काम न करता चहा पितो, पेपर वाचतो, एखादा वेळ संजीव कपूर सारखी स्वंयपाकाची जबाबदारी पेलली तर कुठे बिघडते. मात्र पुरुषांनी घरातील कामे करणे ह ेतिलाही मान्य नसत ,ेहे स्त्रियांचे काम आहे अशी तिची धारणा असते त्यामुळे त्या पुुरुषांप्रमाणे मनसोक्त आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेवू शकत नाही त्या कायमच्या शोषीत बनतात.

मुलामुलींमध्ये भेदभाव विषयी बोलताना त्या म्हणाल्या की मुलाचं वर्णन कसही असलं म्हणजे तो फाजील असला उद्धट असला, बेशिस्त असला तरीही पालकांची काही तक्रार नसते. कारण तो कुळाचा दिवा असतो. आपल्याला अग्नी देणारा असतो म्हणून त्याचे फाजील लाड पुरवून घेतले जातात . मात्र मुलीने शांत रहावे, उद्धटपणाने वागू नये चालताना इकडे तिकडे पाहू नये खाली पाहूनच चालावे अशा प्रकारे सक्तीपुर्ण अपेक्षा समाज करीत असतो. मुलींच्या संरक्षणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की मुलींनी स्वरक्षणासाठी कराटे शिकावे परंतु ही बाब मला पटत नाही कारण संरक्षणासाठी तिला कराटे शिकण्याची वेळ का यावी या मुलभुत प्रश्नाविषयी कोणी विचार करीत नाही. याउलट मुलींना त्रास देणाºया प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवावे .त्यांच्या संस्कारावर जाणीवपुर्वक लक्ष द्यावे तर ते फाजील बनणार नाहीत , रोड रोमीओ बनणार नाही आणि पोलिसांची ही कामे कमी होतील . स्त्री ही आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. देशाचंद सरक्षणपद आज तिच्या हातात आहे. आयपीएससारख्या परिक्षेत ती पहिल्या रॅकमध्ये उत्तीर्ण होत आहे. १० वी १२ वीच्या परिक्षेत त्या दरवर्षी मुलांपेक्षा आघाडीवर असतात. तिचं विश्व बदलले आहे ती आता सरक्षणमागण्याऐवजी संरक्षण देण्यास कटीबद्ध झालेली आहे असे पाटील म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ.कवित मिसाळ यांनी केले तर आभार प्रा.आश्विनी ठाकुर यांनी मानले. डॉ.सुशिल देशपांडे यांनी शारदा सावत म्हटले.