शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राज्यात ९0 गावे-वाड्यांमध्ये टँकर!

By admin | Updated: October 27, 2014 00:01 IST

हिवाळ्यातच पाणीटंचाई : उपाययोजनेला प्राधान्य

वाशिम : पावसाळा संपत नाही; तोच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. हिवाळ्याच्या सुरूवातीलाच राज्यभरातील ३७ गावे आणि ५३ वाडीवस्त्यांची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे.साधारणत: हिवाळ्याच्या शेवटी पाणीटंचाई जाणवायला सुरूवात होते. उन्हाळ्याच्या प्रारंभी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. २0१४ मध्ये मात्र ऑक्टोबरपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. यावर्षी पावसाळा उशिराने सुरू झाला. जून महिन्यात १४0५ गावे आणि ३ हजार ४३६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा झाला. जुलैमध्ये ही संख्या आणखी वाढली. जुलै १५५९ गावे आणि ३९७४ वाडयांमध्ये टँकर मधून पाणीवाटप झाले. ऑगस्टमध्येही १५५६ टँकर्स लागले आणि १३१३ गावे तसेच ३३७0 वाड्यांना पाणी पुरवावे लागले. सप्टेंबरमध्ये ९३ गावे, वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ऑक्टोबरमध्येही सद्यस्थितीत ९0 गावे-वाड्यांना टँकर्सचे पाणी तहान भागवत आहे. पाण्याच्या घोटभर थेंबासाठी वनवन भटकणार्‍या राज्यातील ९0 गावांना टँकरचे पाणी मिळत आहे.भौगोलिक रचना, पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठय़ाची स्थिती, पाणी वापराचे नियोजन आणि बाष्पीभवनाचे प्रमाण या घटकांवर पाणीटंचाईची स्थिती प्रामुख्याने अवलंबून असते. कोकणात पावसाळ्यातील सरासरी ९५ दिवसांमध्ये ३ हजार १६१ मि.मी., विदर्भात ५१ दिवसांमध्ये १ हजार १0६ मि.मी., तर पश्‍चिम महाराष्ट्रात ५१ दिवसांमध्ये १ हजार मि.मी. पाऊस होतो. हवामान खात्याने सत्तर वर्षांतील पाऊसमान आणि पर्जन्य दिवसाच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे. राज्यात वर्षांतील ५९ दिवसांमध्ये पाऊस होतो, पण आता विपरित हवामानाचा पावसाळ्यावर परिणाम होऊ लागला आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक २२ टँकर्स मराठवाड्यातील २७ गावे-वाड्यांमध्ये लागले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील ४४ गावे-वाड्यांसाठी, तसेच पश्‍चिम विदर्भातील ३ गावांसाठी प्रत्येकी १0 टँकर्स आहेत. उत्तर महाराष्ट्रातील १६ गावे-वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. कोकण आणि पूर्व विदर्भ मात्र तीव्र पाणीटंचाईमुक्त झाला आहे. सध्या या दोन्ही विभागात एकही टँकर सुरू नाही. कोकण आणि पूर्व विदर्भ ऑगस्टमध्येच टँकरमुक्त झाला होता.