शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

४५ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST

राज्य शासनाने ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत शेतकऱ्यांनी ...

राज्य शासनाने ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत शेतकऱ्यांनी घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि जिल्ह्यातील १.६४ लाख शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ झाले. राज्य शासनाने या कर्जमुक्ती योजना शासन निर्णय जाहीर करतानाच नियमित कर्ज भरणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती; परंतु आता या योजनेला वर्ष उलटले तरी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापोटी कवडीचाही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

---------

कर्ज वेळेवर फेडणारे शेतकरी ४५१०९

प्रोत्साहन अनुदान मिळालेले शेतकरी -००

तालुकानिहाय शेतकरी

१) वाशिम ८२०९

२) रिसोड ७१२०

३) कारंजा ८१००

४) मं. पीर ७४३२

५) मानोरा ७२९९

६) मालेगाव ६९४९

-----------------------

१.६४ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ करण्यात आले. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा करण्यात आली. राष्ट्रीयीकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज याअंतर्गत माफ करण्यात आले.

------------

कोट : शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १.६४ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असा शासन निर्णय झाल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात नियमानुसार प्रोत्साहन अनुदान जमा केले जाईल.

-शंकरराव तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

----------------------

१) कोट : शासनाने थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली. त्याचवेळी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते; परंतु आता वर्ष उलटून गेले तरी आम्हाला प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही. शासनाने आपल्या घोषणेची अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे.

- नारायण पाटील,

शेतकरी, इंझोरी

--------------

२) कोट : शेतीसाठी बँकेकडून पीककर्ज घेतानाच आम्ही त्याची नियमित फेड करून शासनाला सहकार्य करतो. गतवर्षीपर्यंत आम्ही घेतलेले पीककर्ज पूर्णपणे भरले. शासनाने थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्याचे स्वागतच आहे; परंतु आम्ही नियमित कर्ज भरीत असताना घोषणा करूनही आम्हाला अद्याप प्रोत्साहन अनुदान शासनाने दिले नाही. नियमित कर्ज भरणे ही आमची चूक आहे का?

-धनराज उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर उपाध्ये