शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

४५ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST

राज्य शासनाने ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत शेतकऱ्यांनी ...

राज्य शासनाने ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत शेतकऱ्यांनी घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि जिल्ह्यातील १.६४ लाख शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ झाले. राज्य शासनाने या कर्जमुक्ती योजना शासन निर्णय जाहीर करतानाच नियमित कर्ज भरणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती; परंतु आता या योजनेला वर्ष उलटले तरी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापोटी कवडीचाही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

---------

कर्ज वेळेवर फेडणारे शेतकरी ४५१०९

प्रोत्साहन अनुदान मिळालेले शेतकरी -००

तालुकानिहाय शेतकरी

१) वाशिम ८२०९

२) रिसोड ७१२०

३) कारंजा ८१००

४) मं. पीर ७४३२

५) मानोरा ७२९९

६) मालेगाव ६९४९

-----------------------

१.६४ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ करण्यात आले. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा करण्यात आली. राष्ट्रीयीकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज याअंतर्गत माफ करण्यात आले.

------------

कोट : शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १.६४ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असा शासन निर्णय झाल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात नियमानुसार प्रोत्साहन अनुदान जमा केले जाईल.

-शंकरराव तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

----------------------

१) कोट : शासनाने थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली. त्याचवेळी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते; परंतु आता वर्ष उलटून गेले तरी आम्हाला प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही. शासनाने आपल्या घोषणेची अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे.

- नारायण पाटील,

शेतकरी, इंझोरी

--------------

२) कोट : शेतीसाठी बँकेकडून पीककर्ज घेतानाच आम्ही त्याची नियमित फेड करून शासनाला सहकार्य करतो. गतवर्षीपर्यंत आम्ही घेतलेले पीककर्ज पूर्णपणे भरले. शासनाने थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्याचे स्वागतच आहे; परंतु आम्ही नियमित कर्ज भरीत असताना घोषणा करूनही आम्हाला अद्याप प्रोत्साहन अनुदान शासनाने दिले नाही. नियमित कर्ज भरणे ही आमची चूक आहे का?

-धनराज उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर उपाध्ये