शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शिरपूरला १.१९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST

स्वच्छ भारत मिशनचा टप्पा एक पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अंमलबजावणीसाठी हागणदारी मुक्त झालेल्या गावांत घनकचरा ...

स्वच्छ भारत मिशनचा टप्पा एक पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अंमलबजावणीसाठी हागणदारी मुक्त झालेल्या गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना शासनाच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागामार्फत भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यात मालेगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना २ कोटी १९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी शिरपूर ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेमार्फत १ कोटी १९ लाख ७ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला असल्याचे पत्र जिल्हा परिषदेमार्फत शिरपूर ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. पत्रामध्ये शासन निर्णयाचे तत्काळ अवलोकन करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी व अंदाजपत्रक सादर करण्याचा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. या निधीतून शिरपूरमध्ये असलेली सर्वात मोठी सांडपाण्याची समस्या निकाली काढण्यासह घनकचऱ्याचे व्यवस्थापनही होणार आहे. पर्यटन क्षेत्र शिरपूरची मुख्य समस्या असलेल्या सांडपाण्याचे नियोजन या निधीमध्ये होणार असल्याने शिरपूर येथील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.