शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाचे थैमान; पण प्रशासन, सत्ताधारी आपल्याच विश्वात

By admin | Updated: September 7, 2015 03:46 IST

पालघर जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि बालविकास प्रकल्प

पालघर जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि बालविकास प्रकल्प या तिघांचे पितळ उघडे पडले आहे. ५ वर्षांत झालेले बालमृत्यू व कुपोषणाचे थैमान लक्षात घेता सरकारी आकडेवारी किती फसवी असते, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत या प्रश्नावरून सदस्यांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना जाब विचारणे गरजेचे आहे. पालघर जिल्हा विकासाच्या वाटेवर आहे, अशी सतत ओरड करणाऱ्या जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी निदान आता तरी वास्तवाची दखल घ्यावी. मोखाड्यातील त्या ६५८ कुपोषित बालकांना जगवण्याचा प्रयत्न करावा.५ वर्षांत ५७ बालमृत्यू होतात, परंतु प्रशासन ढिम्म राहते. हे पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या राज्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. १९९२-९३ मध्ये वावर-वांगणी येथे केवळ भुकेमुळे १२५ हून अधिक बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, तरी प्रशासन या प्रश्नी गतिमान होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी निर्माण करणे, एवढे एकच काम झाले. परंतु, येथील आदिवासी मुलांमधील कुपोषणाचा प्रश्न मात्र मार्गी लागू शकला नाही. आजही डोंगरकपाऱ्यांमध्ये शेकडो बालके कुपोषणग्रस्त आहेत, परंतु त्यांना सकस आहार मिळू शकत नाही. आश्रमशाळा, अंगणवाड्या या व्यवस्था अशा दुर्धर आजारांवर उपाय करण्यासाठी निर्माण करण्यात आल्या, परंतु कुपोषणावर २५ ते ३० वर्षांत १० टक्केही काम होऊ शकले नाही. आरोग्यमंत्र्यांनी मध्यंतरी या परिसराचा दौरा केला, परंतु दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी आपले व्यवस्थापन कौशल्य पणाला लावले. आरोग्य मंत्री आले, त्यांनी पाहिले, समाधान व्यक्त केले व आल्यापावली परतले. परिस्थितीमध्ये कोणताही बदल नाही. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’.