शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

कुपोषणाचे थैमान; पण प्रशासन, सत्ताधारी आपल्याच विश्वात

By admin | Updated: September 7, 2015 03:46 IST

पालघर जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि बालविकास प्रकल्प

पालघर जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि बालविकास प्रकल्प या तिघांचे पितळ उघडे पडले आहे. ५ वर्षांत झालेले बालमृत्यू व कुपोषणाचे थैमान लक्षात घेता सरकारी आकडेवारी किती फसवी असते, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत या प्रश्नावरून सदस्यांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना जाब विचारणे गरजेचे आहे. पालघर जिल्हा विकासाच्या वाटेवर आहे, अशी सतत ओरड करणाऱ्या जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी निदान आता तरी वास्तवाची दखल घ्यावी. मोखाड्यातील त्या ६५८ कुपोषित बालकांना जगवण्याचा प्रयत्न करावा.५ वर्षांत ५७ बालमृत्यू होतात, परंतु प्रशासन ढिम्म राहते. हे पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या राज्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. १९९२-९३ मध्ये वावर-वांगणी येथे केवळ भुकेमुळे १२५ हून अधिक बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, तरी प्रशासन या प्रश्नी गतिमान होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी निर्माण करणे, एवढे एकच काम झाले. परंतु, येथील आदिवासी मुलांमधील कुपोषणाचा प्रश्न मात्र मार्गी लागू शकला नाही. आजही डोंगरकपाऱ्यांमध्ये शेकडो बालके कुपोषणग्रस्त आहेत, परंतु त्यांना सकस आहार मिळू शकत नाही. आश्रमशाळा, अंगणवाड्या या व्यवस्था अशा दुर्धर आजारांवर उपाय करण्यासाठी निर्माण करण्यात आल्या, परंतु कुपोषणावर २५ ते ३० वर्षांत १० टक्केही काम होऊ शकले नाही. आरोग्यमंत्र्यांनी मध्यंतरी या परिसराचा दौरा केला, परंतु दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी आपले व्यवस्थापन कौशल्य पणाला लावले. आरोग्य मंत्री आले, त्यांनी पाहिले, समाधान व्यक्त केले व आल्यापावली परतले. परिस्थितीमध्ये कोणताही बदल नाही. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’.