शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कुपोषणाचे थैमान; पण प्रशासन, सत्ताधारी आपल्याच विश्वात

By admin | Updated: September 7, 2015 03:46 IST

पालघर जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि बालविकास प्रकल्प

पालघर जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि बालविकास प्रकल्प या तिघांचे पितळ उघडे पडले आहे. ५ वर्षांत झालेले बालमृत्यू व कुपोषणाचे थैमान लक्षात घेता सरकारी आकडेवारी किती फसवी असते, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत या प्रश्नावरून सदस्यांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना जाब विचारणे गरजेचे आहे. पालघर जिल्हा विकासाच्या वाटेवर आहे, अशी सतत ओरड करणाऱ्या जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी निदान आता तरी वास्तवाची दखल घ्यावी. मोखाड्यातील त्या ६५८ कुपोषित बालकांना जगवण्याचा प्रयत्न करावा.५ वर्षांत ५७ बालमृत्यू होतात, परंतु प्रशासन ढिम्म राहते. हे पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या राज्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. १९९२-९३ मध्ये वावर-वांगणी येथे केवळ भुकेमुळे १२५ हून अधिक बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, तरी प्रशासन या प्रश्नी गतिमान होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी निर्माण करणे, एवढे एकच काम झाले. परंतु, येथील आदिवासी मुलांमधील कुपोषणाचा प्रश्न मात्र मार्गी लागू शकला नाही. आजही डोंगरकपाऱ्यांमध्ये शेकडो बालके कुपोषणग्रस्त आहेत, परंतु त्यांना सकस आहार मिळू शकत नाही. आश्रमशाळा, अंगणवाड्या या व्यवस्था अशा दुर्धर आजारांवर उपाय करण्यासाठी निर्माण करण्यात आल्या, परंतु कुपोषणावर २५ ते ३० वर्षांत १० टक्केही काम होऊ शकले नाही. आरोग्यमंत्र्यांनी मध्यंतरी या परिसराचा दौरा केला, परंतु दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी आपले व्यवस्थापन कौशल्य पणाला लावले. आरोग्य मंत्री आले, त्यांनी पाहिले, समाधान व्यक्त केले व आल्यापावली परतले. परिस्थितीमध्ये कोणताही बदल नाही. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’.