शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी वाचवा’ लोकचळवळ व्हावी!

By admin | Updated: September 14, 2015 03:44 IST

राज्यात यंदा सर्वत्र पाऊस कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, शहरी भागात वीज, पाणीटंचाई जाणवू लागली आहे

दीपक मोहिते राज्यात यंदा सर्वत्र पाऊस कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, शहरी भागात वीज, पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. शहरी भागात दिवसागणिक वाढणारी लोकसंख्या व पाण्याची गरज यांचा ताळमेळ बसवणे, हे फार मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता या नैसर्गिक संकटाला सर्वांनी सामोरे जायला हवे. त्यासाठी ‘पाणी वाचवा’ ही लोकचळवळ व्हायला हवी. पालकमंत्री, सर्व तालुक्यांचे आमदार, महापौर, पंचायत समितीचे सभापती, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, खासदार, नगरसेवक, सरपंच, जि.प. सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी एकत्र येऊन ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.पाण्याचा जपून वापर, वाहून जाणारे पाणी अडवणे, कोल्हापूर बंधारे, गावागावांतील तलावाचे संवर्धन तसेच घरगुती पाणीवापरावर काही प्रमाणात निर्बंध असे उपाय आतापासून केल्यास पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते. पालघर जिल्ह्यात भातशेती मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु, १० वर्षांपासून पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी होत चालले आहे. यंदा जिल्ह्यात सरासरी १००० मिमी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांत भातशेतीची अवस्था बिकट झाली आहे. २० वर्षांत शासनाने या प्रश्नी कधीही गांभीर्याने विचार केला नाही. शहरी भागामध्ये नागरीकरणाला परवानग्या देताना पाण्याची उपलब्धता या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. नागरीकरणासाठी सरसकट जमिनी मोकळ्या करण्यात आल्या. त्यामुळे १९९० मध्ये पाण्याच्या प्रश्नावरून शहरी व ग्रामीण असा संघर्ष उभा ठाकला. सुमारे २० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या ५ वर्षांत या उपप्रदेशाची लोकसंख्या २० लाखांच्या घरात पोहोचेल व पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे.