शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

‘पाणी वाचवा’ लोकचळवळ व्हावी!

By admin | Updated: September 14, 2015 03:44 IST

राज्यात यंदा सर्वत्र पाऊस कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, शहरी भागात वीज, पाणीटंचाई जाणवू लागली आहे

दीपक मोहिते राज्यात यंदा सर्वत्र पाऊस कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, शहरी भागात वीज, पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. शहरी भागात दिवसागणिक वाढणारी लोकसंख्या व पाण्याची गरज यांचा ताळमेळ बसवणे, हे फार मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता या नैसर्गिक संकटाला सर्वांनी सामोरे जायला हवे. त्यासाठी ‘पाणी वाचवा’ ही लोकचळवळ व्हायला हवी. पालकमंत्री, सर्व तालुक्यांचे आमदार, महापौर, पंचायत समितीचे सभापती, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, खासदार, नगरसेवक, सरपंच, जि.प. सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी एकत्र येऊन ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.पाण्याचा जपून वापर, वाहून जाणारे पाणी अडवणे, कोल्हापूर बंधारे, गावागावांतील तलावाचे संवर्धन तसेच घरगुती पाणीवापरावर काही प्रमाणात निर्बंध असे उपाय आतापासून केल्यास पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते. पालघर जिल्ह्यात भातशेती मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु, १० वर्षांपासून पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी होत चालले आहे. यंदा जिल्ह्यात सरासरी १००० मिमी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांत भातशेतीची अवस्था बिकट झाली आहे. २० वर्षांत शासनाने या प्रश्नी कधीही गांभीर्याने विचार केला नाही. शहरी भागामध्ये नागरीकरणाला परवानग्या देताना पाण्याची उपलब्धता या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. नागरीकरणासाठी सरसकट जमिनी मोकळ्या करण्यात आल्या. त्यामुळे १९९० मध्ये पाण्याच्या प्रश्नावरून शहरी व ग्रामीण असा संघर्ष उभा ठाकला. सुमारे २० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या ५ वर्षांत या उपप्रदेशाची लोकसंख्या २० लाखांच्या घरात पोहोचेल व पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे.