शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

Palghar: वाढवण बंदराचे उद्घाटन झाले, स्थानिकांच्या प्रश्नांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 12:45 IST

Wadhvan Port: केंद्र शासनाच्या ७४ टक्के आणि राज्य शासनाच्या २६ टक्के  भागीदारीतून वाढवण बंदर पूर्णत्वास जाणार आहे. या बंदरामुळे विकसित भारताची संकल्पना अधिक सुदृढ होणार असल्याचे सांगितले जात असले तरी योग्य पुनर्वसन, नोकऱ्या आणि मोबदला, याबाबत शासनाप्रति स्थानिकांमध्ये रोष आहे.

- हितेन नाईक(पालघर समन्वयक)केंद्र शासनाच्या ७४ टक्के आणि राज्य शासनाच्या २६ टक्के  भागीदारीतून वाढवण बंदर पूर्णत्वास जाणार आहे. या बंदरामुळे विकसित भारताची संकल्पना अधिक सुदृढ होणार असल्याचे सांगितले जात असले तरी योग्य पुनर्वसन, नोकऱ्या आणि मोबदला, याबाबत शासनाप्रति स्थानिकांमध्ये रोष आहे.

वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते बंदर उभारणी स्थळापासून दूर पालघरमध्ये करण्यात आले. याला कारण ठरले ते म्हणजे स्थानिकांचा आजही असलेला मोठा विरोध. वाढवण बंदराचे भूमिपूजन रिमोट कंट्रोलची कळ दाबून करण्यात आले असले, तरी बंदराची जन्मभूमी-कर्मभूमी असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष बंदर उभारणीच्या वेळी काय करणार? याबाबतीत स्थानिकांच्या मोठ्या प्रमाणातील विरोधाचा सामना जेएनपीटीला करावा लागणार आहे. स्थानिकांच्या मनात खदखदत असलेला असंतोष रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेचा वापर परिस्थिती आणखी चिघळण्यास कारणीभूत ठरू शकतो. 

मागच्या २७ वर्षांपासून डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराच्या उभारणीचे स्वप्न स्थानिकांच्या एकजुटीतून आणि वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या आंदोलनामुळे पूर्णत्वास येत नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्थानिकांना मिळालेली साथ, कर्नल सावे यांनी स्थानिकांसोबत सुरू केलेला संघर्ष, त्यानंतर वाढवण बंदराच्या हालचाली सुरू झाल्यानंतर त्याआड येणारे पहिले व्यक्तिमत्त्व ठरले ते म्हणजे निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी. वाढवण बंदर उभारणीमुळे पर्यावरणाची होणारी हानी, मच्छीमारांचे मत्स्य संपदेचे नष्ट होणारे गोल्डन स्पॉट, अणुऊर्जा प्रकल्पाला बंदरापासून निर्माण झालेला धोका, समुद्रातील उद्ध्वस्त होणारे नैसर्गिक संसाधन, वाढणारे प्रदूषण, शासन पातळीवरून उचलण्यात येणारी चुकीची पावले आदी कारणांचा विचार करून धर्माधिकारी यांनी डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून वाढवण बंदर उभारणीमध्ये एक संरक्षण भिंत उभी केली होती.

स्थानिक आणि मच्छीमार संघटना एकत्रितरीत्या  आपल्या परीने वाढवण बंदर उभारणीच्या प्रक्रियेविरोधात हरित लवाद आणि उच्च न्यायालयापर्यंत न्यायासाठी झगडत आहेत. स्थानिकांच्या भूमिकेमुळे वाढवण बंदराच्या हालचाली केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत कार्यालयाच्या टेबलापर्यंत मर्यादित ठेवण्यात स्थानिकांना यश आले होते, मात्र  न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या मृत्यूनंतर डहाणू पर्यावरण प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सदस्य आपल्या मर्जीतील बसवून वाढवण बंदराला परवानगी दिली गेली आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर वाढवण बंदर प्रकल्पाने काहीसा वेग घेत जनसुनावणी प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर ७६ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या या बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यावर खऱ्या अर्थाने केंद्रात भाजप मित्रपक्षांचे सरकार आल्यावर पुन्हा वेग घेतला.

या प्रकल्पामध्ये पीपीपीनुसार मुख्य पायाभूत सुविधा, टर्मिनल आणि इतर व्यावसायिक सुविधांचा समावेश असेल. मंत्रिमंडळाने बंदर आणि राष्ट्रीय महामार्गांदरम्यान एमओआरटीएचद्वारे रस्ते कनेक्टिव्हिटी स्थापित करण्यास आणि विद्यमान रेल्वे नेटवर्कशी रेल्वे जोडणी आणि समर्पित रेल फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. हे बंदर झाई-बोर्डी-रेवस रेड्डी सागरी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ, पश्चिम रेल्वे समर्पित मालवाहू प्रकल्प, मुंबई-बडोदा जलद गती महामार्ग, समृद्धी महामार्ग अशा मार्गाने जोडले जाणार आहे. बंदरातून थेट राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा ३२ किलोमीटर लांबीचा आठ पदरी मार्ग सध्या प्रस्तावित आहे. त्यामुळे २८ गावांतील भूसंपादन करण्याचा पेच निर्माण होणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार