शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

कुपोषित बालकांच्या तोंडचा घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:39 IST

२०१६ पासून पोषण महिला बचत गटांना आहारासाठी होणाऱ्या धान्याच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली जाते आहे.

पालघर : २०१६ पासून पोषण महिला बचत गटांना आहारासाठी होणाऱ्या धान्याच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली जाते आहे. २०१८ मध्ये तर तांदळाच्या पुरवठ्यात ६१.२० टक्के तर गव्हाच्या पुरवठ्यामध्ये ७८.२२ टक्के मध्ये इतकी प्रचंड कपात करण्यात आली आहे. एकीकडे कुपोषित बालकांसाठी सरकारने कोणतीही सक्षम उपाययोजना केली नाहीच उलट दुसरीकडे आहे त्या योजनेतून पुरवठा केल्या जाणाºया धान्यात कपात करून सरकार कुपोषित बालकांना मृत्यूच्या खाईत लोटते आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांनी दिली. गरम ताज्या आहारासाठी देण्यात येणाºया धान्याची कपात केली, मात्र टीएचआरआर या निकृष्ट पाकिटबंद ठेकेदारधार्जिण्या पोषण आहाराच्या धान्यात निधीत कपात नाही केली हे अत्यंत धक्कादायक आहे. याबाबत श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेने घेतलेल्या माहितीतील उपलब्ध आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च २०१६ मध्ये या तिमाही साठी बालविकास आयुक्तालयाकडून ६४.७० क्विंटल इतके तांदूळ तर १६० क्विंटल गहू पालघर जिल्ह्यासाठी प्राप्त झाले. याचा अर्थ दर महा २१.५७ क्विंटल तांदूळ तर ५३.३३ क्विंटल गहू प्रत्येक महिन्यासाठी प्राप्त झाला. हे प्रमाण जुलै २०१७ पासून टप्प्याटप्प्याने घसरत जाऊन जून पासून ३३.९ क्विंटल तांदूळ तर अवघा १८ क्विंटल गहू संपूर्ण जिल्ह्यासाठी महिला व बालविकास विभागाने मंजूर केला. या धान्याची मागणी तालुकास्तरावरील बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकाºयांकडे करतात. जिल्ह्यातून हि मागणी बालविकास आयुक्तालयाकडे जाते आणि आयुक्तालय किती पुरवठा करायचा (नियतन) ते पुन्हा जिल्हा बालविकास अधिकाºयांना कळवते त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी त्याला धान्याचा पुरवठा करतात. या प्रकरणाचा संपूर्ण शोध घेतला असता पुरवठा कमी होण्यास वरवर पुरवठा विभाग जबाबदार दिसत असला तरी प्रत्यक्षात महिला बालविकास विभागाकडूनच आयुक्तालयामार्फत हा पुरवठा कमी मंजूर केल्याचे स्पष्ट होत आहे.ज्या तालुक्यात कुपोषणाची दाहकता जास्त आहे अशा जव्हार प्रकल्पांतर्गत, केंद्र शासनाच्या गहू आधारित पोषण आहार योजनेंतर्गत २०१८ या वर्षात १२३१ क्विंटल गहू व १४१० क्विंटल तांदूळ एवढी मागणी केली असता मंजूर करण्यात आलेले नियतन हे २६८ क्विंटल गहू व ५४७ क्विंटल तांदूळ एवढे अल्प आहे. तेच २०१७ या वर्षात १००६ क्विंटल गहू व १५२८ क्विंटल तांदूळ एवढी मागणी केली असता मंजूर करण्यात आलेले नियतन हे ६६३ क्विंटल गहू व १०३२ क्विंटल तांदूळ एवढे होते तर २०१६ या वर्षात वर्षात ११४२ क्विंटल गहू व १६६३ क्विंटल तांदूळ एवढी मागणी केली असता मंजूर करण्यात आलेले नियतन हे ९६५ क्विंटल गहू व ५२७ क्विंटल तांदूळ एवढे होते. पालघर जिल्ह्याकरिता २०१६ या वर्षी आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत १६०० क्विंटल गहू व ९४७ क्विंटल तांदूळ एवढे नियतन मंजूर करण्यात आले होते. तेच २०१७ या वर्षी आॅक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ९३५ क्विंटल गहू व ९८७ क्विंटल तांदूळ एवढे नियतन मंजूर करण्यात आले होते. २०१८ या वर्षी हि तरतुद आॅक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधी करिता ५२४ क्विंटल गहू तर ९९१ क्विंटल तांदूळ एवढी मंजूर करण्यात आली आहे.>सरकारी अनास्थेचे दर्शनएकूणच या आकडेवारीतून केलेली कपात ही सरकारी अनास्थेचे वास्तवदर्शन करत आहे, कुपोषणाची प्रचंड दाहकता असतांना अनावश्यक निधी ठेकेदारांचे पोषण करण्यासाठी रत्याच्या आणि इतर कामांना दिला जात आहे, जो टीएचआर (पाकिटबंद नित्कृष्ट आहार) जनावरेही खात नाही अशा आहारासाठी कोट्यवधी रु पये खर्च केले जातात. मात्र दुसरीकडे भुकेल्या बालकांच्या तोंडचा घास काढून घेण्याचे हे पातक सरकार करत आहे.