शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात आणला गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:43 IST

भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने शेतकऱ्यांनी वाल, पावटे, हरभरा, तुर यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

- राहुल वाडेकरविक्रमगड : भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने शेतकऱ्यांनी वाल, पावटे, हरभरा, तुर यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यात भर म्हणजे रब्बी हंगामात तालुक्यात भाजीपाला लागवड मोठया प्रमाणात होऊ लागले असुन काही शेतकरी यातुन लाखो रु पये कमवत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतीचे अर्थकारण बदलण्यास सुरु वात झाली आहे.तालुक्यातील मलवाडा गाव पिंजाळ नदी काठी वसले असुन पाण्याची उपलब्धता असतानाही पडिक जागेचे प्रमाण अधिक आहे. असे असताना मलवाडा गावातील प्रयोगशील शेतकरी कमलाकर सदाशिव भोईर यानी आपल्या डोंगराच्या उताराला असलेल्या पडीक जागेत एक एकर मध्ये पहिल्यादाच मिरची पिकाची लागवड करुन लाखो रु पये उत्पन्न मिळवले आहे.कष्टाला तंत्रज्ञानाची साथ दिल्यास अल्प क्षेत्रातदेखील जास्तीत- जास्त उत्पन्न घेता येऊ शकते येथील शेतकरी कमलाकर सदाशिव भोईर यांनी करून दाखिवला आहे.त्यांनी आपल्या मध्यम प्रतीच्या एक एकर क्षेत्रात मिरची या पिकाच्या ‘इंदु’ या वाणाच्या तिखट मिरचीची लागवड केली आहे. यामध्ये त्यांना एक एकर साठी १० पैकेट (१ किलो) बियाणे लागले. औषधे, खते (सेंद्रिय), बी, मजुरी याचा एकुण ४५ हजार खर्च आला. उन्हाळा असल्या कारणाने दोन दिवसातुन एकदा पाणी द्यावे लागते. तर दीड महिन्यांच्या कालावधी नंतर मिरचीचे उत्पन्न सुरु झाले. एक आठवड्यातुन ते तोडा करत असुन एक टन मिरचीचे उत्पन्न मिळत आहे.>सेंद्रिय पद्धतीने मिरची पिकाची लागवडसाधारण अडिच महिन्यापूर्वी मध्यम प्रतीच्या एक एकर जमिनीत वाफे पद्धतीने मिरचीच्या रोपांची लागवड करून पाण्याचे नियोजन केले आहे. नियमित आणि आवश्यक तितकेच पाणी दिल्याने रोपांच्या मुळ्या जमिनीत व्यविस्थत स्थिर होऊन पीक जोमात वाढले. अडिच महिन्याच्या कालखंडात रोगमुक्त औषधांचा मात्रा दिल्याने पिकाची रोगराईपासून मुक्ती होण्यास मदत झाली. त्यातच कंपोस्ट आणि शेणखताचा अधिक वापर केल्याने झाडाला रोगमुक्त फुले आली.>या वर्षी दुष्काळा ची तीव्रता जास्त असल्याने तोडीव पिकांच्या लागवडी उत्पादकांना करता न आल्याने मालाचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव या वर्षी तेजीत राहिले. त्याचा फायदा आम्हाला या वर्षी झाला आहे.- कमलाकर भोईर, मिरची उत्पादक शेतकरी, मलवाडा गाव