शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात आणला गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:43 IST

भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने शेतकऱ्यांनी वाल, पावटे, हरभरा, तुर यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

- राहुल वाडेकरविक्रमगड : भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने शेतकऱ्यांनी वाल, पावटे, हरभरा, तुर यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यात भर म्हणजे रब्बी हंगामात तालुक्यात भाजीपाला लागवड मोठया प्रमाणात होऊ लागले असुन काही शेतकरी यातुन लाखो रु पये कमवत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतीचे अर्थकारण बदलण्यास सुरु वात झाली आहे.तालुक्यातील मलवाडा गाव पिंजाळ नदी काठी वसले असुन पाण्याची उपलब्धता असतानाही पडिक जागेचे प्रमाण अधिक आहे. असे असताना मलवाडा गावातील प्रयोगशील शेतकरी कमलाकर सदाशिव भोईर यानी आपल्या डोंगराच्या उताराला असलेल्या पडीक जागेत एक एकर मध्ये पहिल्यादाच मिरची पिकाची लागवड करुन लाखो रु पये उत्पन्न मिळवले आहे.कष्टाला तंत्रज्ञानाची साथ दिल्यास अल्प क्षेत्रातदेखील जास्तीत- जास्त उत्पन्न घेता येऊ शकते येथील शेतकरी कमलाकर सदाशिव भोईर यांनी करून दाखिवला आहे.त्यांनी आपल्या मध्यम प्रतीच्या एक एकर क्षेत्रात मिरची या पिकाच्या ‘इंदु’ या वाणाच्या तिखट मिरचीची लागवड केली आहे. यामध्ये त्यांना एक एकर साठी १० पैकेट (१ किलो) बियाणे लागले. औषधे, खते (सेंद्रिय), बी, मजुरी याचा एकुण ४५ हजार खर्च आला. उन्हाळा असल्या कारणाने दोन दिवसातुन एकदा पाणी द्यावे लागते. तर दीड महिन्यांच्या कालावधी नंतर मिरचीचे उत्पन्न सुरु झाले. एक आठवड्यातुन ते तोडा करत असुन एक टन मिरचीचे उत्पन्न मिळत आहे.>सेंद्रिय पद्धतीने मिरची पिकाची लागवडसाधारण अडिच महिन्यापूर्वी मध्यम प्रतीच्या एक एकर जमिनीत वाफे पद्धतीने मिरचीच्या रोपांची लागवड करून पाण्याचे नियोजन केले आहे. नियमित आणि आवश्यक तितकेच पाणी दिल्याने रोपांच्या मुळ्या जमिनीत व्यविस्थत स्थिर होऊन पीक जोमात वाढले. अडिच महिन्याच्या कालखंडात रोगमुक्त औषधांचा मात्रा दिल्याने पिकाची रोगराईपासून मुक्ती होण्यास मदत झाली. त्यातच कंपोस्ट आणि शेणखताचा अधिक वापर केल्याने झाडाला रोगमुक्त फुले आली.>या वर्षी दुष्काळा ची तीव्रता जास्त असल्याने तोडीव पिकांच्या लागवडी उत्पादकांना करता न आल्याने मालाचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव या वर्षी तेजीत राहिले. त्याचा फायदा आम्हाला या वर्षी झाला आहे.- कमलाकर भोईर, मिरची उत्पादक शेतकरी, मलवाडा गाव