शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

रेडिमेड साहित्यामुळे लोहाराचा भाताही थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 23:18 IST

ऐरणीचा देव रुसला; लोहार, सुतारकाम झाले कमी; शेतीतही आता अद्ययावत साधने

- सुनील घरत पारोळ : शेतीच्या कामात आज रेडिमेड साहित्य तसेच यांत्रिक अवजारांचा वापर केला जात असल्याने लोहार, आणि सुतार, व्यवसायाला घरघर लागली असून त्यांना काम मिळत नसल्याने समाजातील तरु ण इतर व्यवसायाकडे वळला आहे.कधीकाळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाºया लोहार - सुतार समाजावर अलीकडच्या काळात आर्थिक संकट कोसळले आहे. शेती व्यवसायात आलेल्या अत्याधुनिक साहित्यामुळे या समाजाला उपजीविका चालविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांची शेतीकरिता उपयोगी असलेली अवजारे ही लाकडी असल्यामुळे शेतकºयांच्या दैनंदिन अवजारे बनविण्याकरिता सुतारांसोबत संबंध यायचा.लोखंडी अवजारे बनवण्यासाठी आपल्या छोट्याशा दुकानात चामडी भाता आणि भाता ओढण्यासाठी घरातील महिला किंवा मुलांचे सहकार्य घेत होते. दुकानामध्ये ऐरण, घन, वासला, आरी, किकरा पटास, कानस, सांडशी घेऊन लोहार आपले व्यवसाय करीत होते. व या व्यवसायावरच लोहार-सुतार समाजाच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरिनवार्हाची जबाबदारी होती. मात्र, यांत्रिक युगामध्ये लोहाराच्या धंद्याला अवकळा आली असून त्यांचा धंदा पावसाळ्यापुरताच मर्यादित राहिला आहे.पावसाळ्यात शेतकºयांना शेतीची अवजारे, वखराचा लोखंडी विळे, कुºहाड, कुदळ, विळे पाजविणे एवढेच मर्यादित राहिल्याने तसेच बाजारामध्ये शेतकºयांची सर्व अवजारे रेडीमेड मिळत असल्यामुळे लोहाराचा मुख्य धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे.आता यांत्रिक युगामध्ये शेतकºयांची बैलगाडी हद्दपार होण्याच्या मार्गावर असून ट्रॅक्टर, पावर ट्रिलर, लोखंडी बंडीसारखे यंत्र निघाल्यामुळे सुताराचा लाकडी औजारे बनविण्याचा व्यवसाय बंद होत आहे.पूर्वीच्या काळी शेती अवजारे जास्तीत जास्त लाकडी रहायची आणि ती गावातीलच लोहार-सुताराकडून शेतकरी करून घ्यायचे. त्यात शेतकºयांचे मुख्य शेतीकरिता लागणारे वाहन म्हणजे लाकडी बैलगाडी, शेतकºयांची बैलगाडी तयार करण्याकरिता सुताराला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागायचा. बैलगाडीकरीता दोन सागवान किंवा तिवसाच्या झाडाचे धुरे, लाकडी तक्त्यांचा फळ, जुवाडी, खुटाडे, धुरी, मांडगे, हरणी, करवई, खोबन आणि त्यामध्ये लोखंडी आख. आखेमध्ये दोन चाके घालून लाकडी बैलगाडी करायची. बंडी तयार करण्यासाठी लोहाराला एक महिना मेहनत करावी लागत होती. मात्र, या मेहनतीसाठी लोहाराला शेतकºयांकडून चांगली मिळकत व्हायची.लोहार काम कमी झाल्याने आमच्या समाजावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे महागाईच्या दिवसात मुलांचे शिक्षण, घरचा खर्च चालवणे कठीण झाले आहे. शेतीचे नुकसान म्हणजे आमचा धंदा कमी, हे गणित असल्याने शेतकरी नुकसानभरपाईसोबत आमचाही विचार सरकारने करावा.- सतीश सोमवंशी, अध्यक्ष, वसई तालुका लोहार समाज