शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

रेडिमेड साहित्यामुळे लोहाराचा भाताही थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 23:18 IST

ऐरणीचा देव रुसला; लोहार, सुतारकाम झाले कमी; शेतीतही आता अद्ययावत साधने

- सुनील घरत पारोळ : शेतीच्या कामात आज रेडिमेड साहित्य तसेच यांत्रिक अवजारांचा वापर केला जात असल्याने लोहार, आणि सुतार, व्यवसायाला घरघर लागली असून त्यांना काम मिळत नसल्याने समाजातील तरु ण इतर व्यवसायाकडे वळला आहे.कधीकाळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाºया लोहार - सुतार समाजावर अलीकडच्या काळात आर्थिक संकट कोसळले आहे. शेती व्यवसायात आलेल्या अत्याधुनिक साहित्यामुळे या समाजाला उपजीविका चालविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांची शेतीकरिता उपयोगी असलेली अवजारे ही लाकडी असल्यामुळे शेतकºयांच्या दैनंदिन अवजारे बनविण्याकरिता सुतारांसोबत संबंध यायचा.लोखंडी अवजारे बनवण्यासाठी आपल्या छोट्याशा दुकानात चामडी भाता आणि भाता ओढण्यासाठी घरातील महिला किंवा मुलांचे सहकार्य घेत होते. दुकानामध्ये ऐरण, घन, वासला, आरी, किकरा पटास, कानस, सांडशी घेऊन लोहार आपले व्यवसाय करीत होते. व या व्यवसायावरच लोहार-सुतार समाजाच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरिनवार्हाची जबाबदारी होती. मात्र, यांत्रिक युगामध्ये लोहाराच्या धंद्याला अवकळा आली असून त्यांचा धंदा पावसाळ्यापुरताच मर्यादित राहिला आहे.पावसाळ्यात शेतकºयांना शेतीची अवजारे, वखराचा लोखंडी विळे, कुºहाड, कुदळ, विळे पाजविणे एवढेच मर्यादित राहिल्याने तसेच बाजारामध्ये शेतकºयांची सर्व अवजारे रेडीमेड मिळत असल्यामुळे लोहाराचा मुख्य धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे.आता यांत्रिक युगामध्ये शेतकºयांची बैलगाडी हद्दपार होण्याच्या मार्गावर असून ट्रॅक्टर, पावर ट्रिलर, लोखंडी बंडीसारखे यंत्र निघाल्यामुळे सुताराचा लाकडी औजारे बनविण्याचा व्यवसाय बंद होत आहे.पूर्वीच्या काळी शेती अवजारे जास्तीत जास्त लाकडी रहायची आणि ती गावातीलच लोहार-सुताराकडून शेतकरी करून घ्यायचे. त्यात शेतकºयांचे मुख्य शेतीकरिता लागणारे वाहन म्हणजे लाकडी बैलगाडी, शेतकºयांची बैलगाडी तयार करण्याकरिता सुताराला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागायचा. बैलगाडीकरीता दोन सागवान किंवा तिवसाच्या झाडाचे धुरे, लाकडी तक्त्यांचा फळ, जुवाडी, खुटाडे, धुरी, मांडगे, हरणी, करवई, खोबन आणि त्यामध्ये लोखंडी आख. आखेमध्ये दोन चाके घालून लाकडी बैलगाडी करायची. बंडी तयार करण्यासाठी लोहाराला एक महिना मेहनत करावी लागत होती. मात्र, या मेहनतीसाठी लोहाराला शेतकºयांकडून चांगली मिळकत व्हायची.लोहार काम कमी झाल्याने आमच्या समाजावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे महागाईच्या दिवसात मुलांचे शिक्षण, घरचा खर्च चालवणे कठीण झाले आहे. शेतीचे नुकसान म्हणजे आमचा धंदा कमी, हे गणित असल्याने शेतकरी नुकसानभरपाईसोबत आमचाही विचार सरकारने करावा.- सतीश सोमवंशी, अध्यक्ष, वसई तालुका लोहार समाज