शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रेडिमेड साहित्यामुळे लोहाराचा भाताही थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 23:18 IST

ऐरणीचा देव रुसला; लोहार, सुतारकाम झाले कमी; शेतीतही आता अद्ययावत साधने

- सुनील घरत पारोळ : शेतीच्या कामात आज रेडिमेड साहित्य तसेच यांत्रिक अवजारांचा वापर केला जात असल्याने लोहार, आणि सुतार, व्यवसायाला घरघर लागली असून त्यांना काम मिळत नसल्याने समाजातील तरु ण इतर व्यवसायाकडे वळला आहे.कधीकाळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाºया लोहार - सुतार समाजावर अलीकडच्या काळात आर्थिक संकट कोसळले आहे. शेती व्यवसायात आलेल्या अत्याधुनिक साहित्यामुळे या समाजाला उपजीविका चालविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांची शेतीकरिता उपयोगी असलेली अवजारे ही लाकडी असल्यामुळे शेतकºयांच्या दैनंदिन अवजारे बनविण्याकरिता सुतारांसोबत संबंध यायचा.लोखंडी अवजारे बनवण्यासाठी आपल्या छोट्याशा दुकानात चामडी भाता आणि भाता ओढण्यासाठी घरातील महिला किंवा मुलांचे सहकार्य घेत होते. दुकानामध्ये ऐरण, घन, वासला, आरी, किकरा पटास, कानस, सांडशी घेऊन लोहार आपले व्यवसाय करीत होते. व या व्यवसायावरच लोहार-सुतार समाजाच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरिनवार्हाची जबाबदारी होती. मात्र, यांत्रिक युगामध्ये लोहाराच्या धंद्याला अवकळा आली असून त्यांचा धंदा पावसाळ्यापुरताच मर्यादित राहिला आहे.पावसाळ्यात शेतकºयांना शेतीची अवजारे, वखराचा लोखंडी विळे, कुºहाड, कुदळ, विळे पाजविणे एवढेच मर्यादित राहिल्याने तसेच बाजारामध्ये शेतकºयांची सर्व अवजारे रेडीमेड मिळत असल्यामुळे लोहाराचा मुख्य धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे.आता यांत्रिक युगामध्ये शेतकºयांची बैलगाडी हद्दपार होण्याच्या मार्गावर असून ट्रॅक्टर, पावर ट्रिलर, लोखंडी बंडीसारखे यंत्र निघाल्यामुळे सुताराचा लाकडी औजारे बनविण्याचा व्यवसाय बंद होत आहे.पूर्वीच्या काळी शेती अवजारे जास्तीत जास्त लाकडी रहायची आणि ती गावातीलच लोहार-सुताराकडून शेतकरी करून घ्यायचे. त्यात शेतकºयांचे मुख्य शेतीकरिता लागणारे वाहन म्हणजे लाकडी बैलगाडी, शेतकºयांची बैलगाडी तयार करण्याकरिता सुताराला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागायचा. बैलगाडीकरीता दोन सागवान किंवा तिवसाच्या झाडाचे धुरे, लाकडी तक्त्यांचा फळ, जुवाडी, खुटाडे, धुरी, मांडगे, हरणी, करवई, खोबन आणि त्यामध्ये लोखंडी आख. आखेमध्ये दोन चाके घालून लाकडी बैलगाडी करायची. बंडी तयार करण्यासाठी लोहाराला एक महिना मेहनत करावी लागत होती. मात्र, या मेहनतीसाठी लोहाराला शेतकºयांकडून चांगली मिळकत व्हायची.लोहार काम कमी झाल्याने आमच्या समाजावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे महागाईच्या दिवसात मुलांचे शिक्षण, घरचा खर्च चालवणे कठीण झाले आहे. शेतीचे नुकसान म्हणजे आमचा धंदा कमी, हे गणित असल्याने शेतकरी नुकसानभरपाईसोबत आमचाही विचार सरकारने करावा.- सतीश सोमवंशी, अध्यक्ष, वसई तालुका लोहार समाज