शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

३७० हटवल्यानंतर काश्मीरची जनता आनंदीच-  हीना भट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:39 IST

भाजप वसई रोड मंडळाचे वार्षिक स्रेहसंमेलन

पारोळ : काश्मिरच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर तेथील जनता आनंदी आहे, असे प्रतिपादन भाजपच्या काश्मीरमधील नेत्या हीना भट यांनी वसईत केले. मी काश्मिरी मुसलमान आहे. मी ज्या श्रीनगरमध्ये राहते तेथे १०० टक्के काश्मिरी मुसलमान आहेत. त्यामुळेच हे विधान मी जबाबदारीने करत असल्याचेही त्या म्हणाल्या. काही फुटीरतावादी नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याने त्यांच्याकडून जाणीवपूर्वक काश्मीरची शांतता भंग करण्यावर चाप बसला आहे.

भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाचे वार्षिक स्नेह संमेलनप्रसंगी भट उपस्थित होत्या. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांची भाषणे, सत्कार, कार्यक्रमाचे आयोजक आणि भाजप वसई रोडचे अध्यक्ष उत्तम कुमार यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन तसेच ‘उत्तम दृष्टीकोन’ मासिकाच्या बोधचिन्हाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.केरळचे राजा शशिकुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेश आंदोलनामध्ये अयप्पा स्वामी भक्तांवर कम्युनिस्ट सरकारने जे खोटे गुन्हे दाखल केले त्याचा निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्रात साडेसात लाख कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेल्या मान्यवरांना ह्यप्रतीक्षा ट्रस्टह्णच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये दाक्षिणात्य कादंबरीकार वी. आर. सुधीष, चित्रपट कथा लेखक क्षत्रुखणन, व्यंगचित्रकार रजींद्र कुमार, ज्योतिष व आध्यात्मिक गुरू पी. के. सहदेव कुरूप, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया मेनन, समाजसेवक कृष्णन कुट्टी नायर, वसंत शहा, निलेश भातुसे, वसई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरीष्ठ डॉ. अलमास खान आदींना सन्मानित केले.

यावेळी केरळचे राजा शशिकुमार वर्मा, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, माजी आमदार भाजपा नेते हेमेंद्र मेहता, दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक ए. के. सुनील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरVasai Virarवसई विरार