शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

जमीन खरडून गेल्यावर आता अनुदानाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 16, 2014 00:21 IST

मागील वर्षी या परिसरात १२ जुलै ला झालेल्या महाप्रलयात घरांची पडझड, जनावरांची जीवहानी, शेत पिकांची नासाडी झाली होती. नदी नाल्यांच्या काठांवरील शेतजमीन खरडून गेल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले होते.

रोहणा : मागील वर्षी या परिसरात १२ जुलै ला झालेल्या महाप्रलयात घरांची पडझड, जनावरांची जीवहानी, शेत पिकांची नासाडी झाली होती. नदी नाल्यांच्या काठांवरील शेतजमीन खरडून गेल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले होते. यानंतर परिसराची पाहणी करुन शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र ही मदर शेतकऱ्यांना एक वर्षाचा कालावधी लोटुनही मिळालेली नाही.शासनाने विविध सर्व्हेनुसार पीडितांना अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली. पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुराने खरडून गेल्या, त्यांच्या शेतात रेती, गोटे आले अश्या शेतकऱ्यांना तब्बल वर्ष उलटून गेले तरी आर्थिक मदत मिळाली नाही. अधिकाऱ्यांच्या भेटीत निधी आल्यावर वाटप होईल असे एकच उत्तर गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे.याबाबत वृत्त असे की, मागील वर्षीच्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदतीचे वाटप केले. पण या नुकसानग्रस्तांमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती नदी किंवा नाल्याच्या काठावर होती त्यांच्या शेतातील पिकच वाहून गेले तर शेतातील माती खरडून नेली. काही शेतात मोठमोठे खड्डे पडले तर काही शेतात रेती व गोट्यांचे ढीग येवून पडले. एकंदरीत शेताचे होत्याचे नव्हते झाले. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पुढील कित्येक वर्षे सदर शेती करण्यास उपयुक्त राहिली नाही. नुकसानीची तिव्रता लक्षात घेता नदी नाल्यावरील शेतीच्या नुकसानीचा शासनाने स्वतंत्र सर्व्हे करून अशा पीडित शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारापर्यंत अनुदानाच्या रूपात मदत जाहीर केली. शासनाच्या महसूल विभागाने पीडितांच्या नुकसानग्रस्त आराजी व नावांसह यादी शासनाला सादर केली. तेव्हापासून अजूनपर्यंत शेती खरडून गेलेल्या पीडितांना एक रुपयाची आर्थिक मदत मिळाली नाही. तुलनेत ज्यांचे कमी प्रमाणात नुकसान झाले अशा सर्व पीडितांना शासकीय मदत मिळाली आहे. उत्पन्नाकरिता शेतीयोग्य न राहिल्याने त्या शेतकऱ्यांचे शेतमजूर झाले. याबाबत सर्वत्र असंतोष व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त शेतकरी तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या भेटी घेवून मदत केव्हा मिळेल याबाबत विचारणा करतात. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या याद्या शासनाला सादर केल्या आहेत. निधी अजूनपर्यंत आला नाही. निधी आल्यावर वाटप करू असे ठरलेले व साचेबद्ध उत्तर मिळते. पीडित शेतकरी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकले आहेत. शासनाने याची दखल घेत विलंब न करता खरडून गेलेल्या शेतमालकांना जाहीर केल्याप्रमाणे निधीचे वाटप त्वरीत करावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची आहे. (वार्ताहर)