शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जमीन खरडून गेल्यावर आता अनुदानाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 16, 2014 00:21 IST

मागील वर्षी या परिसरात १२ जुलै ला झालेल्या महाप्रलयात घरांची पडझड, जनावरांची जीवहानी, शेत पिकांची नासाडी झाली होती. नदी नाल्यांच्या काठांवरील शेतजमीन खरडून गेल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले होते.

रोहणा : मागील वर्षी या परिसरात १२ जुलै ला झालेल्या महाप्रलयात घरांची पडझड, जनावरांची जीवहानी, शेत पिकांची नासाडी झाली होती. नदी नाल्यांच्या काठांवरील शेतजमीन खरडून गेल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले होते. यानंतर परिसराची पाहणी करुन शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र ही मदर शेतकऱ्यांना एक वर्षाचा कालावधी लोटुनही मिळालेली नाही.शासनाने विविध सर्व्हेनुसार पीडितांना अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली. पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुराने खरडून गेल्या, त्यांच्या शेतात रेती, गोटे आले अश्या शेतकऱ्यांना तब्बल वर्ष उलटून गेले तरी आर्थिक मदत मिळाली नाही. अधिकाऱ्यांच्या भेटीत निधी आल्यावर वाटप होईल असे एकच उत्तर गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे.याबाबत वृत्त असे की, मागील वर्षीच्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदतीचे वाटप केले. पण या नुकसानग्रस्तांमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती नदी किंवा नाल्याच्या काठावर होती त्यांच्या शेतातील पिकच वाहून गेले तर शेतातील माती खरडून नेली. काही शेतात मोठमोठे खड्डे पडले तर काही शेतात रेती व गोट्यांचे ढीग येवून पडले. एकंदरीत शेताचे होत्याचे नव्हते झाले. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पुढील कित्येक वर्षे सदर शेती करण्यास उपयुक्त राहिली नाही. नुकसानीची तिव्रता लक्षात घेता नदी नाल्यावरील शेतीच्या नुकसानीचा शासनाने स्वतंत्र सर्व्हे करून अशा पीडित शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारापर्यंत अनुदानाच्या रूपात मदत जाहीर केली. शासनाच्या महसूल विभागाने पीडितांच्या नुकसानग्रस्त आराजी व नावांसह यादी शासनाला सादर केली. तेव्हापासून अजूनपर्यंत शेती खरडून गेलेल्या पीडितांना एक रुपयाची आर्थिक मदत मिळाली नाही. तुलनेत ज्यांचे कमी प्रमाणात नुकसान झाले अशा सर्व पीडितांना शासकीय मदत मिळाली आहे. उत्पन्नाकरिता शेतीयोग्य न राहिल्याने त्या शेतकऱ्यांचे शेतमजूर झाले. याबाबत सर्वत्र असंतोष व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त शेतकरी तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या भेटी घेवून मदत केव्हा मिळेल याबाबत विचारणा करतात. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या याद्या शासनाला सादर केल्या आहेत. निधी अजूनपर्यंत आला नाही. निधी आल्यावर वाटप करू असे ठरलेले व साचेबद्ध उत्तर मिळते. पीडित शेतकरी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकले आहेत. शासनाने याची दखल घेत विलंब न करता खरडून गेलेल्या शेतमालकांना जाहीर केल्याप्रमाणे निधीचे वाटप त्वरीत करावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची आहे. (वार्ताहर)