शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

सरायला ‘राज्य संरक्षित स्मारका’ची प्रतीक्षा

By admin | Updated: January 22, 2015 02:00 IST

संतांच्या भूमीचा वारसा लाभलेला महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. शिवाजी महाराज, संभाजी राजे, पेशवे, भोसले यासारखे शूरविर इतिहासाची साक्ष देतात.

देवकांत चिचाटे नाचणगावसंतांच्या भूमीचा वारसा लाभलेला महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. शिवाजी महाराज, संभाजी राजे, पेशवे, भोसले यासारखे शूरविर इतिहासाची साक्ष देतात. राज्यातील विविध जिल्ह्यातील किल्ले, गड, मंदिर, वाडे आजही याची साक्ष देतात. काळाच्या ओघात अशा ऐतिहासिक वास्तूची पडझड होऊ नये तसेच त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अशा वास्तुंना राज्य संरक्षित स्मारक घोषित करून त्यांचे जतन व संरक्षण करण्याचे काम राज्य शासन करते. शासनाच्या पुरातत्व विभागामार्फत या राज्य संरक्षित वास्तुची जोपासना केली जाते; पण येथील भोसलेकालीन इतिहासाची साक्ष देणारी सराय अद्यापही उपेक्षित आहे़ सरायचे राज्य संरक्षित वास्तु घोषित करून जतन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे़ काय आहे राज्य संरक्षित वास्तूशासनाकडून ऐतिहासिक वास्तुचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केल्यानंतर त्या वास्तुला राज्य संरक्षित वास्तु म्हणून घोषित केले जाते. राज्य पुरातन विभागाकडून अशा वास्तुचे जतन व संवर्धन करण्यात येते. स्मारक, किल्ले, मंदिर यांचा त्यावेळच्या इतिहासावर झालेला परिणाम, वास्तुच्या सध्याच्या स्थितीचा विचार करून तसेच मूळ स्थापत्य कला लक्षात घेऊन ऐतिहासिक वास्तु अधिकाधिक काळ कशी टिकेल, मूळ कलेलाही धक्का पोहोचणार नाही, या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर सदर वास्तु राज्य संरक्षित वास्तु म्हणून घोषित केली जाते़जतन-संवर्धन काय आहे?शासनाच्यावतीने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेल्या वास्तुचे पुरातत्व विभागाकडून जतन, संवर्धन करताना मूळ स्थापत्य टिकविण्याकडे लक्ष असते़जीर्ण होत असलेले वाडे, स्मारक, किल्ले आदींचा त्याकाळच्या इतिहासातील महत्त्व व आजचा त्यावर झालेला परिणाम, याचाही विचार करण्यात येतो. संरक्षित वास्तूच्या देखभाल व दुरस्तीची जबाबदारी पुरातत्त्व विभागाद्वारे स्वीकारली जाते. वास्तुचा एखादा भाग कोरला असला तर तो दुरूस्त करताना ती दुरूस्ती मूळ बांधकामानुसार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो़ यातून वास्तूचे सौंदर्य अबाधित राखण्याचे प्रयत्न केले जातात़पुरातत्त्व विभागाची उदासीनतानाचणगाव येथील सराय ही भोसलेकालीन इतिहासाची साक्ष देणारा ऐतिहासिक ठेवा आहे़ ही सराय गत कित्येक वर्षांपासून राज्य संरक्षित वास्तु घोषित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तत्कालीन सरपंच हरिभाऊ साठे, शंकर राऊत, जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल यांनी सराय राज्य संरक्षित वास्तु व्हावी म्हणून सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा केला; पण संबधित विभागाच्या उदासिनतेमुळे ते होऊ शकले नाही़ पुरातत्व विभाग हा सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येत असल्याने यासाठी शासनस्तरावर प्रयत्न हाणे गरजेचे झाले आहे़