शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांना बसणार ‘आवाजाचा’ चाप

By admin | Updated: March 27, 2017 01:08 IST

शेतकरी कायम संकटांनी घेरलेला असतो. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वन्यप्राण्यांचा उपद्रव होतो.

बा.दे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग : सौर उर्जेवरील कुंपण आणि ध्वनी लहरी विस्करण यंत्रवर्धा : शेतकरी कायम संकटांनी घेरलेला असतो. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वन्यप्राण्यांचा उपद्रव होतो. वन्यप्राण्यांच्या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्ती व्हावी म्हणून बा.दे. अभियांत्रिकी महा.च्या इलेक्ट्रॉनिक शाखेतील विद्यार्थ्यांनी एक यंत्र विकसित केले आहे. सौर उर्जा वापरून ‘सौर ऊर्जा कुंपण’ व ‘ध्वनी लहरी विस्करण’ असे यंत्राचे नाव आहे. यातील ध्वनी कंपनामुळे वन्य प्राणी, पक्षी शेतातील पिकांकडे फिरकणार नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.वन्यप्राणी, पक्षी शेतात येऊ नये, म्हणून शेतकरी विविध उपाय करतात. बुजगावणे उभे करणे, शेताच्या धुऱ्याला विविध रंगांचे कापड लावणे आदी केले जाते; पण वन्यप्राण्यांच्या त्रासापासून सुटका होत नाही. याचा अभ्यास करून वन्यप्राण्यांना आळा बसावा सेवाग्राम येथील बा.दे. अभियांत्रिकी महा.च्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील निलेश ठाकरे, स्वप्नील कुरेकर, श्रुती पुण्यप्रेड्डीवार, सरिता कुमारी या विद्यार्थ्यांनी सौर उर्जेचा वापर करून सौर ऊर्जा कुंपण व ध्वनी लहरी विस्करण यंत्र विकसित केले. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने रात्रीतून पीक नष्ट होते. यावर उपाय करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांशी चर्चा करून अभ्यास सुरू केला. वन्यप्राणी व पक्ष्यांना इजा होणार नाही व ते शेतात येणार नाही, असे ध्वनीकंपन यंत्र विकसित करण्याचे ठरले. विविध बाबींचा अभ्यास करून आवाजाची तिव्रता लक्षात घेतल्याचे मार्गदर्शक प्रा. निखील बोबडे यांनी सांगितले.एक एकर परिसर या यंत्राच्या अधिपत्यात येणार आहे. शेताच्या मध्यभागी हे यंत्र लावले येईल. सौरऊर्जेचा उपयोग केल्याने विजेची बचत होईल. रात्री ७ ते ८ तास चालेल एवढा बॅटरी बॅकअप राहणार असून यंत्रातून निघणाऱ्या अल्ट्रा साऊंडमुळे कोणताही प्राणी शेतात फिरकू शकणार नाही. ध्वनीकंपनाने एखादा प्राणी जुमानला नाही आणि शेतापर्यंत पोहोचलाच तर कुंपणाला स्पर्श होताच दूर फेकला जाईल. यासाठी ४ हजार वॅटचा डिसी सप्लाय देण्यात आला आहे. यामुळे प्राण्यांना इजा होणार नाही. केवळ प्राणी दूर होईल, अशी व्यवस्था यंत्रामध्ये करण्यात आली आहे. यातून प्राण्यांचे रक्षण ही बाबही लक्षात घेण्यात आली आहे. कुंपण तोडण्याचा प्रयत्न केल्यास सायरण तर वजेलच; पण याबाबत संदेश शेत मालकाला भ्रमणध्वनीवर मिळेल. यासाठी जीआरपीएस सिस्टम वापरले आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायक असे या यंत्राचे प्रात्यक्षिक शेतात घेण्यात आले असून ते यशस्वी झाल्याचे निलेश ठाकरे याने सांगितले. संचालक समीर देशमुख, प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या शेतीपयोगी यंत्राचे कौतुक करीत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवून शेतीक्षेत्र प्रगत करण्याचा चांगला प्रयत्न असल्याचे सांगितले. यात विभागप्रमुख डॉ. दांडेकर, डॉ. इंगळे, प्रा. वझुरकर यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)२० किलो हर्टस् आवाजाने व्यक्ती होतो अस्वस्थसाधारणत: २० किलो हर्टस आवाजाने व्यक्ती बैचेन होतो. त्याला अस्वस्थता वाटू लागते आणि तो आवाज कधी बंद होतो, असे वाटायला लागले. प्राण्यांची आवाजाची क्षमता माणसांपेक्षा अधिक दिसून आली. माकड ५० किलो हर्टस, ससा ४२, रानडुक्कर ५०, गाय ३५, शेळी ३० फुलपाखरू ६ तर पक्षी ७.५ हर्टस आवाजाने दूर पळत असल्याचे निदर्शनास आले. याच आधारावर हे ध्वनीकंपन यंत्र विकसित करण्यासत आले आहे. या यंत्रामध्ये सायरन लावण्यात आले असून बॅटरी आणि सौरऊर्जा यंत्र बसविण्यात आले आहे. हे यंत्र रात्री सात ते आठ तास चालू शकेल एवढा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. सुरगावचे शेतकरी राजेंद्र वानखेडे यांनी हे यंत्र उपयोगी असून निश्चितपणे याचा फायदा होईल, असे सांगितले.