शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वन्यप्राण्यांना बसणार ‘आवाजाचा’ चाप

By admin | Updated: March 27, 2017 01:08 IST

शेतकरी कायम संकटांनी घेरलेला असतो. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वन्यप्राण्यांचा उपद्रव होतो.

बा.दे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग : सौर उर्जेवरील कुंपण आणि ध्वनी लहरी विस्करण यंत्रवर्धा : शेतकरी कायम संकटांनी घेरलेला असतो. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वन्यप्राण्यांचा उपद्रव होतो. वन्यप्राण्यांच्या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्ती व्हावी म्हणून बा.दे. अभियांत्रिकी महा.च्या इलेक्ट्रॉनिक शाखेतील विद्यार्थ्यांनी एक यंत्र विकसित केले आहे. सौर उर्जा वापरून ‘सौर ऊर्जा कुंपण’ व ‘ध्वनी लहरी विस्करण’ असे यंत्राचे नाव आहे. यातील ध्वनी कंपनामुळे वन्य प्राणी, पक्षी शेतातील पिकांकडे फिरकणार नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.वन्यप्राणी, पक्षी शेतात येऊ नये, म्हणून शेतकरी विविध उपाय करतात. बुजगावणे उभे करणे, शेताच्या धुऱ्याला विविध रंगांचे कापड लावणे आदी केले जाते; पण वन्यप्राण्यांच्या त्रासापासून सुटका होत नाही. याचा अभ्यास करून वन्यप्राण्यांना आळा बसावा सेवाग्राम येथील बा.दे. अभियांत्रिकी महा.च्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील निलेश ठाकरे, स्वप्नील कुरेकर, श्रुती पुण्यप्रेड्डीवार, सरिता कुमारी या विद्यार्थ्यांनी सौर उर्जेचा वापर करून सौर ऊर्जा कुंपण व ध्वनी लहरी विस्करण यंत्र विकसित केले. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने रात्रीतून पीक नष्ट होते. यावर उपाय करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांशी चर्चा करून अभ्यास सुरू केला. वन्यप्राणी व पक्ष्यांना इजा होणार नाही व ते शेतात येणार नाही, असे ध्वनीकंपन यंत्र विकसित करण्याचे ठरले. विविध बाबींचा अभ्यास करून आवाजाची तिव्रता लक्षात घेतल्याचे मार्गदर्शक प्रा. निखील बोबडे यांनी सांगितले.एक एकर परिसर या यंत्राच्या अधिपत्यात येणार आहे. शेताच्या मध्यभागी हे यंत्र लावले येईल. सौरऊर्जेचा उपयोग केल्याने विजेची बचत होईल. रात्री ७ ते ८ तास चालेल एवढा बॅटरी बॅकअप राहणार असून यंत्रातून निघणाऱ्या अल्ट्रा साऊंडमुळे कोणताही प्राणी शेतात फिरकू शकणार नाही. ध्वनीकंपनाने एखादा प्राणी जुमानला नाही आणि शेतापर्यंत पोहोचलाच तर कुंपणाला स्पर्श होताच दूर फेकला जाईल. यासाठी ४ हजार वॅटचा डिसी सप्लाय देण्यात आला आहे. यामुळे प्राण्यांना इजा होणार नाही. केवळ प्राणी दूर होईल, अशी व्यवस्था यंत्रामध्ये करण्यात आली आहे. यातून प्राण्यांचे रक्षण ही बाबही लक्षात घेण्यात आली आहे. कुंपण तोडण्याचा प्रयत्न केल्यास सायरण तर वजेलच; पण याबाबत संदेश शेत मालकाला भ्रमणध्वनीवर मिळेल. यासाठी जीआरपीएस सिस्टम वापरले आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायक असे या यंत्राचे प्रात्यक्षिक शेतात घेण्यात आले असून ते यशस्वी झाल्याचे निलेश ठाकरे याने सांगितले. संचालक समीर देशमुख, प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या शेतीपयोगी यंत्राचे कौतुक करीत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवून शेतीक्षेत्र प्रगत करण्याचा चांगला प्रयत्न असल्याचे सांगितले. यात विभागप्रमुख डॉ. दांडेकर, डॉ. इंगळे, प्रा. वझुरकर यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)२० किलो हर्टस् आवाजाने व्यक्ती होतो अस्वस्थसाधारणत: २० किलो हर्टस आवाजाने व्यक्ती बैचेन होतो. त्याला अस्वस्थता वाटू लागते आणि तो आवाज कधी बंद होतो, असे वाटायला लागले. प्राण्यांची आवाजाची क्षमता माणसांपेक्षा अधिक दिसून आली. माकड ५० किलो हर्टस, ससा ४२, रानडुक्कर ५०, गाय ३५, शेळी ३० फुलपाखरू ६ तर पक्षी ७.५ हर्टस आवाजाने दूर पळत असल्याचे निदर्शनास आले. याच आधारावर हे ध्वनीकंपन यंत्र विकसित करण्यासत आले आहे. या यंत्रामध्ये सायरन लावण्यात आले असून बॅटरी आणि सौरऊर्जा यंत्र बसविण्यात आले आहे. हे यंत्र रात्री सात ते आठ तास चालू शकेल एवढा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. सुरगावचे शेतकरी राजेंद्र वानखेडे यांनी हे यंत्र उपयोगी असून निश्चितपणे याचा फायदा होईल, असे सांगितले.