शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

कृषी विभाग देणार शेतकर्‍यांना गावोगावी संदेश

By admin | Updated: May 20, 2014 23:49 IST

राज्यातील खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम नैसर्गिक प्रकोपाच्या दुष्टचक्रात सापडले़ यामुळे शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागले़ येत्या हंगामात तसे होऊ नये म्हणून शेतकर्‍यांना गावोगावी संदेश

सुरेंद्र डाफ - आर्वी

राज्यातील खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम नैसर्गिक प्रकोपाच्या दुष्टचक्रात सापडले़ यामुळे शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागले़ येत्या हंगामात तसे होऊ नये म्हणून शेतकर्‍यांना गावोगावी संदेश पोहोचविले जाणार आहेत़ यासाठी कृषी विभागाने विशेष योजना हाती घेतली आहे़ यात सोयाबीन बियाण्यांबाबत शेतकर्‍यांना माहिती दिली जाणार आहे़ खरीप हंगामात विदर्भातील सोयाबीन हे पीक सध्या महत्त्वाचे मानले जात आहे़ शेतकर्‍यांना शुद्ध व उत्पादीत सोयाबीन बियाणे मिळावे यासाठी राज्याच्या कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत़ बोगस बियाण्यांना व नियंत्रण ठेवण्यासाठी पथके निर्माण केली आहेत़ शेतकर्‍यांना आपल्याच शेतातील सोयाबीनची उगवणशक्ती तपासून पेरणी करण्यासाठी ग्रामीण भागातील गावोगावी संदेश कृषी विभागाद्वारे देण्यात येणार आहे़ राज्यातील शेतकर्‍यांचे खरीप व रब्बी, हे दोन्ही हंगाम व्यर्थ ठरले़ अतिवृष्टी व पावसाच्या फटक्याने तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीनला कोंब आले़ अनेकांचे सोयाबीनचे पीक पाण्याने खराब झाले़ यामुळे नुकसान सोसावे लागले़ अनेकांना झालेला खर्चही भरून काढता आला नाही़ प्रारंभी सोयाबीनला ३०० ते ३०६० पर्यंत भाव मिळाले़ मार्च अखेरपर्यंत ही भाववाढ न झाल्याने शेतकर्‍यांनी शेतातील सोयाबीन बाजारपेठेत विकले़ राज्यात सर्वत्र सोयाबीनला नैसर्गिक आपत्तीने झोडपले असताना निकोप, उत्कृष्ट व उपजावू शक्ती असलेले सोयाबीन बियाणे मिळणार काय, हा प्रश्नच आहे़ शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पेरणीसाठी राखूव ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाद्वारे केले जात आहे; पण शेतकर्‍यांकडे पेरणीयोग्य सोयाबीन नसल्याने तुटवडा भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ सोयाबीन बियाण्यांच्या भासणार्‍या तुटवड्याबाबत कृषी विभागाने बैठकी घेऊन खासगी व शासकीय कंपन्यांची बैठक घेतली़ यात सोयाबीन पिकाच्या बियाण्यांवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाधिक शेतकर्‍यांना निकोप व उत्पादन देणारे तसेच उगवण शक्ती असलेले बियाणे देण्याबाबत उपाययोजना करणे सुरू आहे़ राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा बघता काही बोगस बियाण्यांची विक्री कृषी केंद्रामार्फत केले जाण्याची शक्यता आहे़ यामुळे उपाययोजना म्हणून ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणे राखून ठेवले, त्यांनी त्या बियाण्यांची उगवण शक्ती तपासून लागवड करावी, असे संदेश दिले जाणार आहेत़ यासाठी गुणनियंत्रण पथक, तालुका जि़प़, पं़स स्तरावर नेमण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे़