शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

कृषी विभाग देणार शेतकर्‍यांना गावोगावी संदेश

By admin | Updated: May 20, 2014 23:49 IST

राज्यातील खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम नैसर्गिक प्रकोपाच्या दुष्टचक्रात सापडले़ यामुळे शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागले़ येत्या हंगामात तसे होऊ नये म्हणून शेतकर्‍यांना गावोगावी संदेश

सुरेंद्र डाफ - आर्वी

राज्यातील खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम नैसर्गिक प्रकोपाच्या दुष्टचक्रात सापडले़ यामुळे शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागले़ येत्या हंगामात तसे होऊ नये म्हणून शेतकर्‍यांना गावोगावी संदेश पोहोचविले जाणार आहेत़ यासाठी कृषी विभागाने विशेष योजना हाती घेतली आहे़ यात सोयाबीन बियाण्यांबाबत शेतकर्‍यांना माहिती दिली जाणार आहे़ खरीप हंगामात विदर्भातील सोयाबीन हे पीक सध्या महत्त्वाचे मानले जात आहे़ शेतकर्‍यांना शुद्ध व उत्पादीत सोयाबीन बियाणे मिळावे यासाठी राज्याच्या कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत़ बोगस बियाण्यांना व नियंत्रण ठेवण्यासाठी पथके निर्माण केली आहेत़ शेतकर्‍यांना आपल्याच शेतातील सोयाबीनची उगवणशक्ती तपासून पेरणी करण्यासाठी ग्रामीण भागातील गावोगावी संदेश कृषी विभागाद्वारे देण्यात येणार आहे़ राज्यातील शेतकर्‍यांचे खरीप व रब्बी, हे दोन्ही हंगाम व्यर्थ ठरले़ अतिवृष्टी व पावसाच्या फटक्याने तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीनला कोंब आले़ अनेकांचे सोयाबीनचे पीक पाण्याने खराब झाले़ यामुळे नुकसान सोसावे लागले़ अनेकांना झालेला खर्चही भरून काढता आला नाही़ प्रारंभी सोयाबीनला ३०० ते ३०६० पर्यंत भाव मिळाले़ मार्च अखेरपर्यंत ही भाववाढ न झाल्याने शेतकर्‍यांनी शेतातील सोयाबीन बाजारपेठेत विकले़ राज्यात सर्वत्र सोयाबीनला नैसर्गिक आपत्तीने झोडपले असताना निकोप, उत्कृष्ट व उपजावू शक्ती असलेले सोयाबीन बियाणे मिळणार काय, हा प्रश्नच आहे़ शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पेरणीसाठी राखूव ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाद्वारे केले जात आहे; पण शेतकर्‍यांकडे पेरणीयोग्य सोयाबीन नसल्याने तुटवडा भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ सोयाबीन बियाण्यांच्या भासणार्‍या तुटवड्याबाबत कृषी विभागाने बैठकी घेऊन खासगी व शासकीय कंपन्यांची बैठक घेतली़ यात सोयाबीन पिकाच्या बियाण्यांवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाधिक शेतकर्‍यांना निकोप व उत्पादन देणारे तसेच उगवण शक्ती असलेले बियाणे देण्याबाबत उपाययोजना करणे सुरू आहे़ राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा बघता काही बोगस बियाण्यांची विक्री कृषी केंद्रामार्फत केले जाण्याची शक्यता आहे़ यामुळे उपाययोजना म्हणून ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणे राखून ठेवले, त्यांनी त्या बियाण्यांची उगवण शक्ती तपासून लागवड करावी, असे संदेश दिले जाणार आहेत़ यासाठी गुणनियंत्रण पथक, तालुका जि़प़, पं़स स्तरावर नेमण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे़