शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शेवटपर्यंत स्वावलंबीच राहणार

By admin | Updated: February 22, 2015 01:52 IST

साठ वर्षांचे परसराम उईकार बोलायला तसे अघळपघळ. २५ वर्षांपासून ते आरती टॉकीज परिसरात चपला, बूट शिवण्याचा व्यवसाय करतात.

पराग मगर वर्धासाठ वर्षांचे परसराम उईकार बोलायला तसे अघळपघळ. २५ वर्षांपासून ते आरती टॉकीज परिसरात चपला, बूट शिवण्याचा व्यवसाय करतात. चपला आल्या की शिवायच्या नाहीतर निवांत झोप काढायची हा त्यांचा दिनक्रम. हिंदी मराठी असं मिक्स भाषेत बोलण ही त्यांची खासियत. वय होत चाललय पण शेवटपर्यंत स्वावलंबी राहण्याचा त्यांचा आत्मविश्वास तरुणांनाही लाजवेल असाच आहे. आरती चौक या वर्दळीच्या चौकात परसराम उन्ह, वारा पावसात चपला बुटं शिवण्याचे काम करतात. समजायला लागलं तेव्हापासूनच ते चपला शिवत असल्याचे सांगतात. आधी गोपुरी येथील चर्मालयात चपला बनविन्याचे काम ते करायचे. पण चर्मालय बंद पडले. त्यामुळे काय करावे, कुटुंबाला कसे पोसावे हा प्रश्न होतात. चपला बनविणे व शिवणे एकढच माहिती होतं. त्याच भरवशावर आरती चौकात त्यांनी कापड बांधून तात्पुरते दुकान सुरू केले. तेव्हा लोक चपला पुरवून पुरवून वापरायचे. त्यामुळे चपला शिवायलाही पुष्कळ जण यायचे. उन्हाळा व हिवाळा तर कसाबसा निधून जायचा; पण पावसाळ्यात मात्र खूप कसरत व्हायची. तरीही दिवसं काढले. काहीच वर्षापूर्वी पंचायत समितीमध्ये चर्मालय ग्रामोद्योगासाठी मिळत असलेल्या लोखंडी शेडसाठी अर्ज केला. त्याला वर्ष लागले. पण मिळाले यात धन्यता. शासनाने कर्ज उपलब्ध करुन द्यावेआतापर्यंत मेहनत करूनच पोट भरलं. कुणापुढे कधी हात पसरले नाही. त्यामुळे शासनाने मदत दिलीच तर आपल्याला कर्ज द्यावं एवढीच माफक अपेक्षा असल्याचे उईकार सांगतात. त्या पैशातून जास्त माल आणता येईल. दुकान वाढविता येईल.अजून २५ वर्ष काम करायचंयपरसराम यांच वय आज ६० वर्षांच्यावर आहे. पण आपल्याला अजून २५ वर्ष काम करायच आहे, असे ते विश्वासाने सांगतात. दोन मुलं आहेत. ते ही आपापल्या व्यवसायात आहेत. पण त्यांच्याकडून आपल्या कुठल्याही अपेक्षा नाही. आपण स्वत:च पोट भरण्यासाठी सक्षम असल्याचं ते सांगतात.आता लोकांना चपलींचे महत्त्व वाटत नाहीआधी लोक एकच चप्पल पुरवून पुरवून वापरायचे. फाटली किंवा तुटली तरी शक्य तितकी शिऊन वापरायचे; पण आता मात्र लोक एक नाही दहा चपला घालतात. तरही चपला शिऊन घालणारेही असतात. अशांवरच आमचा व्यवसाय चालत असल्याचे परसराम सांगतात.