शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

यंदा कापसाने चांगलाच खाल्ला भाव; आता खरीपात पेराही वाढणारच राव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

आनंद इंगोले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाकाळात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याने कपाशीची लागवड कमी करून ...

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाकाळात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याने कपाशीची लागवड कमी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. यावर्षी कपाशीने चांगलाच भाव खाल्ला असून १५ हजार रुपये क्विंटलच्या घरात भाव मिळत असल्याने येत्या खरीपामध्ये शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कृषी विभागाकडून कपाशीच्या वाढीव क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आहे. मान्सूनही आठ ते दहा दिवस आधी धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून कृषी विभागानेही खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. यावर्षी ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर खरीपाचे नियोजन असून यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर व ज्वारी हीच पिके अनुक्रमे आघाडीवर आहेत. गेल्यावर्षी ४ लाख ४२ हजार ७७३ हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती. यावरूनच यंदाच्या खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी कपाशीचे २ लाख ४ हजार २०३ हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात २ लाख १६ हजार ५५५ हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. हाच अंदाज विचारात घेऊन कृषी विभागाने मागील वर्षीपेक्षा यावर्षी नियोजनात वाढ केली आहे.

डिझेलच्या दरवाढीमुळे यांत्रिक खर्चात वाढ-    मागील काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत करण्याच्या खर्चात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. परिणामी शेतकरी बैलजोडीचा आधार घेत असल्याचे दिसून येते. 

यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी २ लाख ४२ हजार २०३ हेक्टरवर नियोजन होते. परंतु प्रत्यक्ष ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. यावर्षी ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक खतसाठा व बियाण्यांची मागणी करण्यात आली असून शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक खते व बियाण्यांची खरेदी करुन त्याच्या पावत्या जवळ ठेवाव्यात. कुठेही बोगसपणा आढळून आल्यास कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती