शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कापसाने चांगलाच खाल्ला भाव; आता खरीपात पेराही वाढणारच राव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

आनंद इंगोले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाकाळात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याने कपाशीची लागवड कमी करून ...

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाकाळात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याने कपाशीची लागवड कमी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. यावर्षी कपाशीने चांगलाच भाव खाल्ला असून १५ हजार रुपये क्विंटलच्या घरात भाव मिळत असल्याने येत्या खरीपामध्ये शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कृषी विभागाकडून कपाशीच्या वाढीव क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आहे. मान्सूनही आठ ते दहा दिवस आधी धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून कृषी विभागानेही खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. यावर्षी ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर खरीपाचे नियोजन असून यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर व ज्वारी हीच पिके अनुक्रमे आघाडीवर आहेत. गेल्यावर्षी ४ लाख ४२ हजार ७७३ हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती. यावरूनच यंदाच्या खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी कपाशीचे २ लाख ४ हजार २०३ हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात २ लाख १६ हजार ५५५ हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. हाच अंदाज विचारात घेऊन कृषी विभागाने मागील वर्षीपेक्षा यावर्षी नियोजनात वाढ केली आहे.

डिझेलच्या दरवाढीमुळे यांत्रिक खर्चात वाढ-    मागील काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत करण्याच्या खर्चात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. परिणामी शेतकरी बैलजोडीचा आधार घेत असल्याचे दिसून येते. 

यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी २ लाख ४२ हजार २०३ हेक्टरवर नियोजन होते. परंतु प्रत्यक्ष ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. यावर्षी ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक खतसाठा व बियाण्यांची मागणी करण्यात आली असून शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक खते व बियाण्यांची खरेदी करुन त्याच्या पावत्या जवळ ठेवाव्यात. कुठेही बोगसपणा आढळून आल्यास कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती