शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

पावसाची संततधार

By admin | Updated: September 8, 2014 01:29 IST

सतत पाठशिवणीचा खेळ खेळत असलेल्या पावसाचे अखेर शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा जोरदार आगमन झाले.

वर्धा : सतत पाठशिवणीचा खेळ खेळत असलेल्या पावसाचे अखेर शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा जोरदार आगमन झाले. त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलले आहे. शेतातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यासाठी तसेच मुरवता पाणी आवश्यक असल्याचे बोलल्या जात होते. रविवारी झालेल्या पावसामुळे कुठेही अप्रिय घटना घडल्याची नोंद नाही. पाऊस आल्याने पिकांना आधार मिळाला तरी यातून उत्पन्न होईलच याची ग्वाही देता येत नसल्याचे बोलल्या जात आहे.यंदा जिल्ह्यात पाहिजे तशा पावसाची नोंद नव्हती. सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने याचा विपरित परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. दुबार तिबार पेरणी करूनही ओलिताची सोय नसलेल्या शेतांमधील पिके करपण्याच्या मार्गावर होती. गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊस येईल असे वाटत होते; परंतु चांगला पाऊस कोसळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता कायम होती. अखेर शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे. कपाशीच्या तसेच तूर व सोयाबीनच्या चांगल्या वाढीसाठी चांगल्या पावसाची आवश्यकता होती.(लोकमत न्यूज नेटवर्क)