शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

रोहिणी नक्षत्रात कापूस लागवडीचे संकेत

By admin | Updated: May 24, 2015 02:29 IST

जिल्ह्यात कडकडीत ऊन्ह तापत आहे. अशात पावसाने अधूनमधून पावसाची हजेरी लावली.

विजय माहुरे सेलूजिल्ह्यात कडकडीत ऊन्ह तापत आहे. अशात पावसाने अधूनमधून पावसाची हजेरी लावली. यामुळे पाहता ओलिताची सोय असलेले शेतकरी रोहिणी नक्षत्रात कपाशीची पेरणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. गत तीन वर्षांपासून जिल्हातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. यातून सावरून शेतकरी पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन कपाशी लागवडीला सामोरा जात आहे. उन्हाळवाहीची कामे सुरू असताना एप्रिल व मे महिन्यात पावसाने हजेरी लावली. आलेल्या पावसामुळे नांगरणी केलेल्या शेतात पुन्हा तण उगवायला सुरुवात झाली. परिणामी शेतकऱ्यांना दुबार नागरणीच्या खर्चाला सामोरे जावे लागले.बहुतांश शेतकरी कपाशी लागवड व सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्रात दमदार पावसानंतरच करतात. पण ओलिताची सोय असलेले शेतकरी हवामानाचा अंदाज घेत अवघ्या काही दिवसांनी सुरू होणाऱ्या रोहिणी नक्षत्रातच ठिबक व तुषार सिंचनावर कपाशी लागवडीची तयारी करीत आहे. रोहिणी नक्षत्रात कपाशीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना रोपटे जगविण्यासाठी त्रास घ्यावा लागत असला तरी अधिक उत्पन्न येण्याचे शेतकरी सांगत आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे. या नक्षत्रात पाऊत येतोच, असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे सेलू परिसरात अवघ्या काही दिवसांतच कपाशीच्या लागवडीला सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे.काही वर्षांपूर्वी पीक पेरणीपूर्वी धूळ पेरणी केली जात होती. पाऊस आला की पेरलेल्या बिजांना अंकूर फुटायचे. गत काही वर्षांपूर्वी ओलिताचे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत ठिबक व तुषार सिंचनाच्या सहाय्याने पीक घेतल्या जात आहे. या काही वर्षात धूळपेरणी हा प्रकार खूपच कमी झाला असून काहीच ठिकाणी धूळपेरणी केली जात आहे. वाढीव दरामुळे तुरीचा पेरातुरीला या वर्षी मिळालेला भाव पाहता तुुरीचा पेरा वाढणार असा अंदाजही शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा सोयाबीनचा पेरा वाढणारअधिक उत्पन्न मिळावे म्हणून कॅश क्रॉप असलेल्या ऊस लागवडीकडे कल वाढत आहे. ऊस लागवड करावयाची असल्यास आधी सोयाबीनची पेरणी करणे गरजेचे असते. त्यामुळे सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीनची मळणी होताच ऊस लागवड केली जाते. कृषी विभाग व शेतकऱ्यांत नियोजनाची तफावतकृषी विभागाने केलेल्या खरीपाच्या नियोजनात कपाशीचे लागवड क्षेत्रात वाढणार असे दर्शविले आहे, परंतु सतत तीन ते चार वर्षांपासून कापसामुळे शेतकरी आर्थिक गार्तेत सापडला आहे. यामुळे कापूस का लावावा असे मत जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. सोयाबीन पेरल्यास रब्बी हंगामात गहू, चणा, भूईमूंग व ऊस आदी पिके घेतली जातात. यामुळे कृषी विभागाच्यावतीने केलेल्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.