शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

रोहिणी नक्षत्रात कापूस लागवडीचे संकेत

By admin | Updated: May 24, 2015 02:29 IST

जिल्ह्यात कडकडीत ऊन्ह तापत आहे. अशात पावसाने अधूनमधून पावसाची हजेरी लावली.

विजय माहुरे सेलूजिल्ह्यात कडकडीत ऊन्ह तापत आहे. अशात पावसाने अधूनमधून पावसाची हजेरी लावली. यामुळे पाहता ओलिताची सोय असलेले शेतकरी रोहिणी नक्षत्रात कपाशीची पेरणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. गत तीन वर्षांपासून जिल्हातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. यातून सावरून शेतकरी पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन कपाशी लागवडीला सामोरा जात आहे. उन्हाळवाहीची कामे सुरू असताना एप्रिल व मे महिन्यात पावसाने हजेरी लावली. आलेल्या पावसामुळे नांगरणी केलेल्या शेतात पुन्हा तण उगवायला सुरुवात झाली. परिणामी शेतकऱ्यांना दुबार नागरणीच्या खर्चाला सामोरे जावे लागले.बहुतांश शेतकरी कपाशी लागवड व सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्रात दमदार पावसानंतरच करतात. पण ओलिताची सोय असलेले शेतकरी हवामानाचा अंदाज घेत अवघ्या काही दिवसांनी सुरू होणाऱ्या रोहिणी नक्षत्रातच ठिबक व तुषार सिंचनावर कपाशी लागवडीची तयारी करीत आहे. रोहिणी नक्षत्रात कपाशीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना रोपटे जगविण्यासाठी त्रास घ्यावा लागत असला तरी अधिक उत्पन्न येण्याचे शेतकरी सांगत आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे. या नक्षत्रात पाऊत येतोच, असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे सेलू परिसरात अवघ्या काही दिवसांतच कपाशीच्या लागवडीला सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे.काही वर्षांपूर्वी पीक पेरणीपूर्वी धूळ पेरणी केली जात होती. पाऊस आला की पेरलेल्या बिजांना अंकूर फुटायचे. गत काही वर्षांपूर्वी ओलिताचे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत ठिबक व तुषार सिंचनाच्या सहाय्याने पीक घेतल्या जात आहे. या काही वर्षात धूळपेरणी हा प्रकार खूपच कमी झाला असून काहीच ठिकाणी धूळपेरणी केली जात आहे. वाढीव दरामुळे तुरीचा पेरातुरीला या वर्षी मिळालेला भाव पाहता तुुरीचा पेरा वाढणार असा अंदाजही शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा सोयाबीनचा पेरा वाढणारअधिक उत्पन्न मिळावे म्हणून कॅश क्रॉप असलेल्या ऊस लागवडीकडे कल वाढत आहे. ऊस लागवड करावयाची असल्यास आधी सोयाबीनची पेरणी करणे गरजेचे असते. त्यामुळे सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीनची मळणी होताच ऊस लागवड केली जाते. कृषी विभाग व शेतकऱ्यांत नियोजनाची तफावतकृषी विभागाने केलेल्या खरीपाच्या नियोजनात कपाशीचे लागवड क्षेत्रात वाढणार असे दर्शविले आहे, परंतु सतत तीन ते चार वर्षांपासून कापसामुळे शेतकरी आर्थिक गार्तेत सापडला आहे. यामुळे कापूस का लावावा असे मत जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. सोयाबीन पेरल्यास रब्बी हंगामात गहू, चणा, भूईमूंग व ऊस आदी पिके घेतली जातात. यामुळे कृषी विभागाच्यावतीने केलेल्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.