शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा साडेसातशे शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:25 IST

आता परतीच्या पावसाचा धडाका कायम असल्याने शेती जलमय झाली आहे. आठही तालुक्यांमध्ये जवळपास ५०५ हेक्टरवरील पिकांचे या परतीच्या पावसाने नुकसान झाले असून ७६२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

ठळक मुद्दे५०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसानरोगराईचा प्रादुर्भाव कायमच, आर्थिक घडी विस्कटली

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना यावर्षी सुरुवातीपासून अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला अतिवृष्टीने, तर आता परतीच्या पावसाचा धडाका कायम असल्याने शेती जलमय झाली आहे. आठही तालुक्यांमध्ये जवळपास ५०५ हेक्टरवरील पिकांचे या परतीच्या पावसाने नुकसान झाले असून ७६२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. यावर्षी निसर्गकोपामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित चांगलेच बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे कपाशी तर बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उत्पादकांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. अद्याप वरुणराजाची कृपादृष्टी कायम असल्याने सोयाबीन आणि कपाशीसह इतरही पिके धोक्यात आली आहेत. सप्टेंबरमधील परतीचा पाऊसही दरदिवसालाच धो-धो बरसत असल्याने शेतशिवारात पाणी साचलेले आहे. सोबतच रोगराईनेही डोके वर काढल्याने पिके जळायला लागली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ५०५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज असून प्रत्यक्षात ही आकडेवारी मोठी असल्याचे चित्र आहे.एक हजार हेक्टरवर झाली फळगळजिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा या तालुक्यामध्ये ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीची लागवड करण्यात आली आहे. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून या परिसराची ओळख आहे पण, यावर्षी ‘ब्राऊन रॉट’ या बुरशीजन्य रोगाने बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. या तिन्ही तालुक्यातील १ हजार १८७.५० हेक्टरवरील संत्रा, मोसंबीची फळगळ झाली आहे. सध्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.४३ हजार हेक्टरवरील सोयाबीन गेलेसततचा पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे सोयाबीन वाढले पण, झाडाला शेंगांचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये ट्रॅक्टर फिरविला आहे. सोबतच यलो मोझॅक, चक्रीभुंगा, अळी आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यातील ४३ हजार १४५ हेक्टरवरील सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

निम्न वर्धाचे बॅक वॉटरही शेतकऱ्यांच्या मुळावरयावर्षी सुरुवातीपासूनच दमदार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील मोठ्या ११ तर लघु व मध्यम २० जलाशये हाऊसफुल्ल झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पही भरला असून या प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे ३५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे ४५४ शेतकरी अडचणीत आले असून त्यांना दरवर्षीच या बॅक वॉटरचा मोठा फटका बसत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

टॅग्स :agricultureशेती