शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ब्रीद’चा विसर

By admin | Updated: August 30, 2014 23:59 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसवरील मोनोवर ‘प्रवाशांच्या सेवेत’ हे गोंडस ब्रीदवाक्य लिहून ठेवले आहे; पण खरोखरच परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आहे काय,

पुलगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसवरील मोनोवर ‘प्रवाशांच्या सेवेत’ हे गोंडस ब्रीदवाक्य लिहून ठेवले आहे; पण खरोखरच परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आहे काय, असा सवाल संतप्त प्रवासी उपस्थित करीत आहेत़ गत दहा वर्षांत प्रवास भाडेवाढ, भंगार अवस्थेतील बसेस, अनियमितता, हात दाखवा बस थांबवाला हरताळ, विनंती थांब्यावर बस न थांबविणे आदी प्रकारामुळे प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे़ राज्य परिवहन मंडळाची स्थापना होऊन जवळपास ६ दशके होत आहेत़ या सहा दशकांत आणि आजही आरामदायी व सुरक्षित प्रवासाकरिता प्रवाशी परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना प्राधान्य देतात़ मध्यंतरी खासगी प्रवासी वाहनांमध्ये अनेक प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याने व आकर्षक आरामदायी गाड्यांमुळे प्रवासी खासगी बसकडे आकर्षित झाले होते़ यामुळे परिवहन महामंडळ आर्थिक डबघाईस आले; पण परिवहन मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षात संगीतमय व मनोरंजनात्मक प्रवासासाठी अनेक बसमध्ये स्टिरिओ व व्हीडिओ सेवा सुरू करून प्रवाशांचे लक्ष वेधले़ स्थानिक आगारानेही पुलगाव ते अंजनगाव (सुर्जी) ही व्हीडीओकोच सेवा सुरू केली होती; पण काही महिन्यांतच या योजनेचा फज्जा उडाला़ पुढे प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवून प्रवासी जोडो अभियान, सुरक्षा सप्ताह, हात दाखवा बस थांबवा, अलिकडेच सौजन्यपूर्ण वागणुकीसाठी चालक व वाहकांनी बसच्या गेटवर प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत करावे, असे अनेक उपक्रम प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेत; पण अनेक चालक, वाहक या उपक्रमांना बगल देत असल्याचे दिसून येते़गत १० वर्षांमध्ये परिवहन महामंडळाने प्रवाशी भाड्यात जवळपास दुपटीने वाढ केली आहे़ वास्तविक, भाडेवाढ करणे गरजेचे आहे; पण त्याच्या तुलनेत योग्य सेवा देणेही तेवढेच गरजेचे आहे़ सध्या असलेल्या भंगार गाड्या, चालक, वाहकांची प्रवाशांशी वागण्याची पद्धत, वेळापत्रकानुसार न चालणाऱ्या गाड्या, सुट्या पैशांसाठी होणारे वाद, बसस्थानकावरील अव्यवस्था आदी बाबी प्रवाशांना क्लेषदायक ठरत आहेत़ प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याचे सार्थक करायचे असेल व परिवहन महामंडळाला भरभराटीचे दिवस आणायचे असतील तर परिवहन महामंडळाने या बाबींकडे गांर्भीयाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे़ किमान अनियमित सुटणाऱ्या बसेसही तालावर आणल्या तरी प्रवाशांना हायसे होणार आहे़(तालुका प्रतिनिधी)